शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

पोरक्या लेकरांच्या पालनपोषणासाठी विहिणबाई सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:52 IST

ठाणे : आमच्या या दोन्ही लेकरांचे मायबाप गेल्याने आम्ही दोघांचे पालनपोषण करायला तयार आहोत. एक मुलगा ११ तर एक ...

ठाणे : आमच्या या दोन्ही लेकरांचे मायबाप गेल्याने आम्ही दोघांचे पालनपोषण करायला तयार आहोत. एक मुलगा ११ तर एक मुलगा ३ वर्षांचा आहे. या वयात पण आम्ही त्यांना सांभाळू. फक्त आम्ही गेल्यानंतर त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, या लेकरांचे शिक्षण थांबता कामा नये, अशी भावनिक साद दोन्ही विहिणबाईंनी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांना घातली. कोविडमुळे ७१ वर्षांच्या आजीने आपली सून तर ६५ वर्षांच्या आजीबाईने तिचा जावई गमावला. ठाकूर यांच्याशी बोलताना दोघींना अश्रू अनावर झाले होते.

कोविड १९ मुळे अनाथ झालेल्या मुलांशी आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांशी सोमवारी ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे संवाद साधला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या संवादाने ठाकूर गहिवरून गेल्या होत्या. मी या दोन मुलांसोबत आली आहे त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे तो शासनाने सोडवावा, असा प्रश्न एका महिलेने विचारला तर मला पैशाची मदत नको पण मला नोकरी हवी आहे, अशी विनवणी एका १९ वर्षांच्या मुलीने केली. यावेळी तिचा बायोडेटा ठाकूर यांनी मागून घेतला. जी एक ते दोन वर्षांची मुले आहेत, त्यांची कागदपत्रे नाहीत अशांसाठी काय करता येईल?, दोन्ही मुलांची फी शाळा मागतेय त्या मुलांसाठी शासन सहकार्य करेल का? माझ्या आईवडिलांनी कर्ज काढले होते ज्यांच्याकडून कर्ज घेतले ते आता माझ्याकडे वारंवार विचारणा करीत आहेत. आमची विमा रक्कम मंजूर होत नाहीये, आईवडील गेल्यामुळे आम्हाला शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले, मला स्पर्धा परीक्षा द्यायची आहे त्यासाठी मदतीची गरज आहे, आईवडिलांचे पेन्शन आम्हाला मिळेल का? असे एक ना अनेक प्रश्न मुलांनी आणि त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांनी ठाकूर यांना विचारले. या सर्व प्रश्नांवर तोडगा निघेल असा विश्वास त्यांनी दिला. तसेच, आई वडिलांच्या मालमत्ता मुलांच्या नावावर जाऊ शकते. हेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.

पोरक्या बालकांसाठी या कॅबिनेटमध्ये निर्णय

प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे टास्क फोर्सच्या माध्यमातून प्रत्येकाला मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. दोन चिमुकल्यांना पाहून ठाकूर निःशब्द झाल्या आणि त्यांच्या पाठीवर मायेचा हात ठेवून त्यांच्या नातेवाईकांना आम्ही सोबत आहोत. असा आत्मविश्वास दिला. यात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या बालकांसोबत राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कॅबिनेटमध्ये बाल संगोपनाबाबत काही निर्णय घेतले जातील, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. एकाही मुलाला एकटे वाटणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असा आत्मविश्वासही त्यांनी दिला.