शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:53 IST

स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देस्मशानभुमीच्या मागणीसाठी पाच रहिवासी रस्त्यावरलवकरच पाहणी दौरा केला जाणार

ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. परंतु सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी या स्मशानभुमीच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार रहिवासी सहभागी झाले होते. हा मोर्चा जरी नागरिकांचा असला तरी, या मोर्चाच्या माध्यमातून सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.                मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी विधिमंडळात उपस्थित केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर या दोन्ही स्मशानभूमी संदर्भातील ठराव मंजुर झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अभियंत्यांनी या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.       परंतु या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. परंतु याच स्मशानभुमीला त्यांच्याच पक्षातील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी विरोध केल्याने स्मशानभुमीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हावाट्यावर  आला आहे.        स्मशानभूमीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता ठाणे महापालिका शाळा क्र .४७ वर्तक नगर ते महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे स्मशानभूमी बचाव समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वर्तकनगर येथून निघालेला मोर्चा दुपारी साडेबारा वाजता महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमवेत स्मशान बचाव समितीने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. समता नगर ते टिकुजिनीवाडी या परिसरात गेल्या ८ ते १० वर्षात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या पट्ट्यात एकही स्मशानभूमी नाही. केवळ वागळेला स्मशानभूमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. तर हा नागरिकांचा मोर्चा असून यात पक्षाचा काही संबंध नसल्याची प्रतिक्र या आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या १९ तारखेला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग उद्यान मुल्ला बाग येथील आरक्षित जागेचा पर्याय सुचवण्यात आला असून दोन महिन्यात स्मशानभूमीच्या कामाला सुरु वात करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMorchaमोर्चा