शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

स्मशानभुमीच्या माध्यमातून सरनाईकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 15:53 IST

स्मशानभुमीच्या निमित्ताने सध्या ठाण्यात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. परंतु आता स्मशानभुमीच्या बाजूने तब्बल पाच रहिवाशांना रस्त्यावर उतरून सरनाईक यांनी आपल्याच पक्षातील नेत्याला अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शनाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देस्मशानभुमीच्या मागणीसाठी पाच रहिवासी रस्त्यावरलवकरच पाहणी दौरा केला जाणार

ठाणे - मागाली काही दिवसापासून स्मशानभुमीच्या मुद्यावरुन शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरु झाला आहे. परंतु सोमवारी आमदार प्रताप सरनाईक यांनी या स्मशानभुमीच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे पाच हजार रहिवासी सहभागी झाले होते. हा मोर्चा जरी नागरिकांचा असला तरी, या मोर्चाच्या माध्यमातून सरनाईक यांनी अप्रत्यक्षपणे जोरदार शक्तीप्रदर्शन केले असल्याची चर्चा मात्र सुरु झाली आहे.                मागील काही महिन्यांपासून ठाण्यात स्मशानभुमीच्या मुद्यावर चांगलेच वादळ उठले आहे. परंतु आता हे वादळ एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये रंगत असल्याचे दिसून आले आहे. काही महिन्यांपूर्वी आमदार प्रताप सरनाईक यांनी स्मशानभूमीच्या मागणीसाठी विधिमंडळात उपस्थित केलेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या समवेत झालेल्या बैठकीत पोखरण रोड नं.१ येथील रेप्टाकॉस कंपनीच्या सुविधा भूखंडावर व टिकुजीनी वाडी येथील मुल्लाबाग येथील सुविधा भूखंडावर प्रदूषणविरहित पर्यावरणपूरक स्मशानभूमीची निर्मिती करण्यास मान्यता मिळाली. त्यानंतर महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापलिकेच्या सर्वसाधारण सभेत सभागृह नेते नरेश म्हस्के व नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी सूचक व अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्यानंतर या दोन्ही स्मशानभूमी संदर्भातील ठराव मंजुर झाला आहे. त्यानुसार महापालिकेच्या अभियंत्यांनी या स्मशानभूमीसाठी प्रत्येकी ३ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.       परंतु या स्मशानभूमीच्या आसपास बांधकाम चालु असलेल्या काही बिल्डरांचे लागेबांधे महापालिकेतील काही लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांबरोबर असल्याने या परिसरातील काही मुठभर रहिवांशाना हाताशी धरून काही नगरसेवक या स्मशानभूमीला विरोध करू लागले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे. परंतु याच स्मशानभुमीला त्यांच्याच पक्षातील सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी विरोध केल्याने स्मशानभुमीच्या निमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हावाट्यावर  आला आहे.        स्मशानभूमीच्या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वाजता ठाणे महापालिका शाळा क्र .४७ वर्तक नगर ते महापालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे स्मशानभूमी बचाव समितीच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. वर्तकनगर येथून निघालेला मोर्चा दुपारी साडेबारा वाजता महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांच्यासमवेत स्मशान बचाव समितीने आयुक्तांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. समता नगर ते टिकुजिनीवाडी या परिसरात गेल्या ८ ते १० वर्षात अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत. मात्र एवढ्या मोठ्या पट्ट्यात एकही स्मशानभूमी नाही. केवळ वागळेला स्मशानभूमी आहे. त्यामुळे स्मशानभूमीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती समितीचे पदाधिकारी संजय कदम यांनी दिली आहे. तर हा नागरिकांचा मोर्चा असून यात पक्षाचा काही संबंध नसल्याची प्रतिक्र या आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या १९ तारखेला एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून निसर्ग उद्यान मुल्ला बाग येथील आरक्षित जागेचा पर्याय सुचवण्यात आला असून दोन महिन्यात स्मशानभूमीच्या कामाला सुरु वात करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले असल्याची माहिती कदम यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाMorchaमोर्चा