शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

ठाणे जिल्ह्यातील दहावी-बारावीच्या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी दक्षता समिती सतर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 18:26 IST

 येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे१८ फेब्रुवारीपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चाबारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार जिल्ह्यात सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा

ठाणे : दहावीची व बारावीच्या विद्यार्थ्यांची माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा यंदा अनुक्रमे ३ मोर्च व १८ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या वर्षी बारावीला ९८ हजार ४२९ आणि दहावीला एक लाख २७ हजार १५६ विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. या सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती गठीत झाली आहे. या सतिमीने मंगळवारी बैठक घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांविषयी सविस्तर चर्चा सतर्कता दाखवली आहे.       येथीन जिल्हाधिकारी कार्यालयात या दक्षता समितीची बैठक उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, परीक्षा विभागीय मंडळ सचिव संदीप संगवे, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, एस.एन. परीट आदींच्या प्रमुख उपस्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. यंदा बारावीची परीक्षा १८ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या परीक्षेला यंदा जिल्ह्यात बारावीला विज्ञान शाखेतून २९ हजार६०९, कला शाखेतून १७ हजार ४८ , वाणिज्य शाखेतून ५० हजार ८३७ आणि एम.सी.व्ही. सी शाखेचे एक हजार ३५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीची ही परीक्षा १६७ परीक्षा केंद्रांवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.         बारावी प्रमाणेच दहावीची परीक्षा २३ माचपर्यंत पार पडणार आहे. यंदा दहावीची ही परीक्षा ३३० केंद्रांवर घेतली जाणार आहे.या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना सुरक्षित व निर्भयपणे सुरळीत परीक्षा देण्याचे नियोजन माध्यमिक शिक्षण विभागाव्दारे करण्यात आल्याच्या मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाली. या परीक्षेदरम्यान अनुचितप्रकार घडू नये यासाठी सनियंत्रण पथक व गैरप्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यात पाच भरारी पथकांचे गठन करण्यात आल्याचे या बैठकीत उघड झाले आहे. परीक्षा केंद्रांवर परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी सर्व विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सूचना भांडे पाटील यांनी केली. तसेच तालुका स्तरावर तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना बैठे पथकांच्या निर्मितीसाठी लवकरच सुचित करण्याच्या दृष्टीने चर्चा झाली. परीक्षेच्या या कालावधीत वीज मंडळालाही वीज पुरवठा सुरळीत राहण्या बाबत सुचना देण्यात आल्या.

टॅग्स :thaneठाणेexamपरीक्षा