शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Video : श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 16:19 IST

सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.जंगलातील आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या.

ठाणे - सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सन 2019 चा भारतीय वन कायदा सुधारणा हे विधेयक रद्द करावे अशी मागणीच निवेदन देण्यात येणार आहे.  दुपारी बारा वाजता ठाण्यातील साकेत येथून हजारे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासींनी आपली पांरपांरिक वेशभूषा करून यामध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी जंगलातील रानमेवा, आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या आहेत.

केंद्र सरकारने जागतिक तापमान वाढीच्या नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा सुधारित वन कायदा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा )-2019 हे विधायक जाहीर केले आहे. सरकारच्या पर्यावरण, वन  व पर्यावरणातील बदल मंत्रालयाच्या वतीने वन कायद्याचे विधेयक जारी करण्यात आले असून सरकारचा हा वन कायदा म्हणजे आदिवासी व पारंपारिक वननिवासी यांच्या परंपरागत वन हक्कांवर आणलेली गदा आणल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने दिली आहे. 

श्रमजीवी संघटनेच्या उपाध्यक्षा आराध्या पंडित यांनी आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून काढून घेऊन वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदाराना कॅशक्रॉपची वन शेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबू पाहत असल्याचं म्हटलं आहे. आदिवासी व पारंपारिक वननिवासींच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत आहेत. व्यापारी उत्तेजन देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना अमर्यादा अधिकार देऊन आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणाऱ्या ग्रामसभेचे अधिकार कमी करुन ग्रामवनांची समांतर पद्धत आणू पाहणाऱ्या सरकारच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करत आहे. असा जुलमी कायदा श्रमजीवी संघटना कदापी होऊ देणार नाही अशी भूमिका आराध्या पंडित यांनी मांडली आहे. आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणे