शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Video : श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 16:19 IST

सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.जंगलातील आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या.

ठाणे - सरकारच्या वन कायद्याचा मसूदा रद्द करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी (4 जून) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यामध्ये श्रमजीवीचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन सन 2019 चा भारतीय वन कायदा सुधारणा हे विधेयक रद्द करावे अशी मागणीच निवेदन देण्यात येणार आहे.  दुपारी बारा वाजता ठाण्यातील साकेत येथून हजारे श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तसेच आदिवासींनी आपली पांरपांरिक वेशभूषा करून यामध्ये सहभाग घेतला आहे. यावेळी जंगलातील रानमेवा, आंबा, जांभूळ, करवंद घेऊन महिला सहभागी झाल्या आहेत.

केंद्र सरकारने जागतिक तापमान वाढीच्या नावाखाली जंगलातील आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जनतेच्या हक्कांवर गदा आणणारा सुधारित वन कायदा करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भारतीय वन कायदा (सुधारणा )-2019 हे विधायक जाहीर केले आहे. सरकारच्या पर्यावरण, वन  व पर्यावरणातील बदल मंत्रालयाच्या वतीने वन कायद्याचे विधेयक जारी करण्यात आले असून सरकारचा हा वन कायदा म्हणजे आदिवासी व पारंपारिक वननिवासी यांच्या परंपरागत वन हक्कांवर आणलेली गदा आणल्याची माहिती श्रमजीवी संघटनेने दिली आहे. 

श्रमजीवी संघटनेच्या उपाध्यक्षा आराध्या पंडित यांनी आपल्या उपजीविकेसाठी जंगलावर निर्भर असलेल्या आदिवासींच्या हातातून काढून घेऊन वनक्षेत्र वाढविण्याच्या नावाखाली बड्या भांडवलदाराना कॅशक्रॉपची वन शेती करता यावी यासाठी रान मोकळे करण्यासाठीचे धोरण सरकार अवलंबू पाहत असल्याचं म्हटलं आहे. आदिवासी व पारंपारिक वननिवासींच्या हिताच्या विरोधी भूमिका घेत आहेत. व्यापारी उत्तेजन देणाऱ्या वनअधिकाऱ्यांना अमर्यादा अधिकार देऊन आदिवासींचे वन हक्क डावलू पाहणाऱ्या ग्रामसभेचे अधिकार कमी करुन ग्रामवनांची समांतर पद्धत आणू पाहणाऱ्या सरकारच्या भूमिकेबद्दल खेद व्यक्त करत आहे. असा जुलमी कायदा श्रमजीवी संघटना कदापी होऊ देणार नाही अशी भूमिका आराध्या पंडित यांनी मांडली आहे. आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने मोर्चा काढण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणे