शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

पावसाळ्यात १२०० वृक्षांचा बळी

By admin | Updated: June 29, 2017 02:50 IST

१ ते ७ जुलै दरम्यान तब्बल ४ कोटींची वृक्ष लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. मात्र, एकीकडे वृक्षलागवडीसाठी

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : १ ते ७ जुलै दरम्यान तब्बल ४ कोटींची वृक्ष लागवड करण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे. मात्र, एकीकडे वृक्षलागवडीसाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे ठाणे महापालिका अनेक वृक्षांना जीवदान देण्यात अपयशी ठरली आहे. नागरीकरणाच्या नादात तब्बल १२०० वृक्षांचा बळी गेला आहे.ठाणे महापालिका गेल्या वर्षापासून वेगवेगळ्या संकल्पना राबवत आहे. परंतु, दुसरीकडे जुन्या वृक्षांना जीवदान देण्याबाबत ती सपशेल अपयशी ठरली आहे. गेल्या तीन वर्षांचा आढावा घेतल्यास या कालावधीत तब्बल १ हजार १९९ वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यंदाही जून महिना संपत नाही तोवरच तब्बल १५० वृक्ष पडल्याच्या नोंदी पालिकेच्या दप्तरी आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व झाडांची मुळे सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे अतिशय कमकुवत झाली असून अजूनही या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्यास शहरातील जुनी झाडे नामशेष होण्याची भीती पर्यावरणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की, वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या तीन वर्षांत ते अधिकच वाढले आहे. २०१५-१६ या वर्षात ४४६ झाडे पडली होती, तर ५७ झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. २०१६-१७ या वर्षी ५९५ झाडे पडली, तर २०१७-१८ मध्ये पावसाळ्यातच १५० झाडे पडल्याची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे जी झाडे पडली, ती सर्व रस्त्याच्या कडेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकाराला शहरीकरण जबाबदार असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढले आहे. रुंदीकरणाबरोबरच विकासकामेही झाली आहेत. याचा सर्वाधिक फटका रस्त्याच्या कडेच्या जुन्या झाडांना बसला आहे. सिमेंट आणि काँक्रिटीकरणामुळे या सर्व झाडांची मुळे कमकुवत झाल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक कौस्तुभ दरवसे यांनी दिली. जी झाडे रस्त्याच्या कडेला लावली आहेत, त्यांच्या सभोवताली १ मीटर जागा सोडणे आवश्यक असताना कोणत्याच झाडाभोवती ती सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे झाडांच्या मुळांवर परिणाम झाला आहे. झाडांच्या फांद्यादेखील अशास्त्रीय पद्धतीने छाटत असल्याने झाडांचा तोल जाऊन ती पडण्याच्या घटना वाढल्याचे ते म्हणाले. फांद्या छाटताना पर्यावरण अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली छाटणे आवश्यक आहे. मात्र, केवळ लोकप्रतिनिधी किंवा कोणाची तक्रार आल्यास महापालिकेचे कर्मचारी शास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटतात.