शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2021 10:45 IST

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.

पारोळ/मीरा रोड : भाईंदर खाडीवरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. या काळात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खाडीपूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या काळात हलक्या वाहनांना पुलावरून एन्ट्री असली तरी या वाहनांसाठी केवळ एकच मार्गिका खुली असणार आहे. पुलाचे काम सलग तीन दिवस चालणार असल्याने येणाऱ्या तीन दिवसांत मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.

भाईंदर खाडीपूल हा तसा जुना झाला आहे. मध्यंतरी या पुलाच्या एका बाजूच्या गर्डरला तडे गेल्याने मोठ्या कालावधीसाठी पूल दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आला होता, मात्र त्यानंतरही अधूनमधून या पुलाचे काम निघतच आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून याआधी हाती घेण्यात आले होते, मात्र ठाण्यातील वाहतूककोंडीचा जटिल तिढा समोर आल्याने पुलाचे काम करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना महामार्ग प्राधिकरणला दोन वेळा रद्द करावी लागली आहे.

याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवल्याने ही अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा पूल बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुन्हा ही अधिसूचना रद्द करावी लागली. आता १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही अधिसूचना काढून पुलाचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात पुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पर्यायी मार्गावर  वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवणार आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकroad transportरस्ते वाहतूक