शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

By अनिकेत घमंडी | Updated: December 5, 2017 18:07 IST

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला.

ठळक मुद्दे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला फटका महिनाभरात दुस-यांदा शेतमालाला फटकाऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आला

डोंबिवली: सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला. वातावरणातील बदलामुळे महिनाभरात लागोलग दुस-यांदा फटका बसल्याने शेतक-यासमोर नेमके कोणते आणि किती पिक घ्यावे हा मोठा पेच निर्माण झाला असून शेतमाल खरेदी करणारे व्यापारीदेखिल हवालदील झाले आहेत.मंगळवारी समितीत १८३९ क्वींटल सर्व भाज्या, पालेभाज्या २९ क्विंटल, कांदे-बटाटे २५४०, फळे १७२ क्विंटल, फुले २३५ क्विंटल असा एकूण माल आला. भाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली, ती ऐरव्ही २२०० ते २५०० क्विंटल असते. पावसाचा जोर आणि वातावरण असेच राहीले तर मात्र मागणीवर असाच परिणाम राहणार असून पुढील दोन दिवस तरी भाजीपाल्याची आवक तुलेनेने कमी असेल असेही सांगण्यात आले. मार्गशिर्ष महिन्यात गुरुवारी महिलांच्या विविध व्रत वैकल्यांमुळेही त्या दिवशी भाजीची मागणी घटते, त्या तुलनेत फळांच्या मागणीत फारशी वाढ होत नाही हे दिसून आले. एकंदरितच या पावसाचा फटका शेतक-यांना बसणार असून शेतक-यांसह कृषी उत्पन्न समितीसमोर मोठा पेच उभा राहतो. सातत्याने होत असलेले बदल यामुळे सर्वसामान्यांसह होलसेल विक्रेत्यांच्या मानसीकेतवर नकारात्मक परिणाम होत असल्याचाही फटका खरेदी- विक्रीवर होत असल्याचे ते म्हणाले.समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवार रात्री पावसाला सुरुवात झाली. त्याआधी शनिवार-रविवार होता. त्यामुळे या दोन दिवसांत भाज्यांना मागणी नव्हती, त्यात सोमवारी रात्रभर पावसाचा कमी अधिक जोर, पहाटेच्या वेळेत धुके यामुळे भाजीपाला येण्यास अडथळे आले. तसेच मागणीही कमी आली, त्याचा फटका बाजारावर झाला. गेले आठवडाभर भाज्यांचे भाव स्थिर होते, त्यामुळे होलसेल विक्रेत्यासह सामान्य ग्राहकाला दिलासा मिळाल होता. सोमवारच्या अचानक आलेल्या पावसामुळे गारठा वाढला, आणि आवक घटली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्लीbadlapurबदलापूर