शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

By अनिकेत घमंडी | Updated: December 5, 2017 18:07 IST

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला.

ठळक मुद्दे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला फटका महिनाभरात दुस-यांदा शेतमालाला फटकाऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आला

डोंबिवली: सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला. वातावरणातील बदलामुळे महिनाभरात लागोलग दुस-यांदा फटका बसल्याने शेतक-यासमोर नेमके कोणते आणि किती पिक घ्यावे हा मोठा पेच निर्माण झाला असून शेतमाल खरेदी करणारे व्यापारीदेखिल हवालदील झाले आहेत.मंगळवारी समितीत १८३९ क्वींटल सर्व भाज्या, पालेभाज्या २९ क्विंटल, कांदे-बटाटे २५४०, फळे १७२ क्विंटल, फुले २३५ क्विंटल असा एकूण माल आला. भाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली, ती ऐरव्ही २२०० ते २५०० क्विंटल असते. पावसाचा जोर आणि वातावरण असेच राहीले तर मात्र मागणीवर असाच परिणाम राहणार असून पुढील दोन दिवस तरी भाजीपाल्याची आवक तुलेनेने कमी असेल असेही सांगण्यात आले. मार्गशिर्ष महिन्यात गुरुवारी महिलांच्या विविध व्रत वैकल्यांमुळेही त्या दिवशी भाजीची मागणी घटते, त्या तुलनेत फळांच्या मागणीत फारशी वाढ होत नाही हे दिसून आले. एकंदरितच या पावसाचा फटका शेतक-यांना बसणार असून शेतक-यांसह कृषी उत्पन्न समितीसमोर मोठा पेच उभा राहतो. सातत्याने होत असलेले बदल यामुळे सर्वसामान्यांसह होलसेल विक्रेत्यांच्या मानसीकेतवर नकारात्मक परिणाम होत असल्याचाही फटका खरेदी- विक्रीवर होत असल्याचे ते म्हणाले.समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवार रात्री पावसाला सुरुवात झाली. त्याआधी शनिवार-रविवार होता. त्यामुळे या दोन दिवसांत भाज्यांना मागणी नव्हती, त्यात सोमवारी रात्रभर पावसाचा कमी अधिक जोर, पहाटेच्या वेळेत धुके यामुळे भाजीपाला येण्यास अडथळे आले. तसेच मागणीही कमी आली, त्याचा फटका बाजारावर झाला. गेले आठवडाभर भाज्यांचे भाव स्थिर होते, त्यामुळे होलसेल विक्रेत्यासह सामान्य ग्राहकाला दिलासा मिळाल होता. सोमवारच्या अचानक आलेल्या पावसामुळे गारठा वाढला, आणि आवक घटली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्लीbadlapurबदलापूर