शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण तालुक्यात भाज्यांचे भाव स्थिर पण खराब हवामानामुळे मागणी घटल्याने ५०० क्विंटल आवकही घटली

By अनिकेत घमंडी | Updated: December 5, 2017 18:07 IST

सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला.

ठळक मुद्दे कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला फटका महिनाभरात दुस-यांदा शेतमालाला फटकाऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आला

डोंबिवली: सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल येणारा भाजीपाला मंगळवारी १८०० क्विंटल आल्याने शेतमालाला मोठा फटका बसला. वातावरणातील बदलामुळे महिनाभरात लागोलग दुस-यांदा फटका बसल्याने शेतक-यासमोर नेमके कोणते आणि किती पिक घ्यावे हा मोठा पेच निर्माण झाला असून शेतमाल खरेदी करणारे व्यापारीदेखिल हवालदील झाले आहेत.मंगळवारी समितीत १८३९ क्वींटल सर्व भाज्या, पालेभाज्या २९ क्विंटल, कांदे-बटाटे २५४०, फळे १७२ क्विंटल, फुले २३५ क्विंटल असा एकूण माल आला. भाज्यांसह फळभाज्यांची आवक घटली, ती ऐरव्ही २२०० ते २५०० क्विंटल असते. पावसाचा जोर आणि वातावरण असेच राहीले तर मात्र मागणीवर असाच परिणाम राहणार असून पुढील दोन दिवस तरी भाजीपाल्याची आवक तुलेनेने कमी असेल असेही सांगण्यात आले. मार्गशिर्ष महिन्यात गुरुवारी महिलांच्या विविध व्रत वैकल्यांमुळेही त्या दिवशी भाजीची मागणी घटते, त्या तुलनेत फळांच्या मागणीत फारशी वाढ होत नाही हे दिसून आले. एकंदरितच या पावसाचा फटका शेतक-यांना बसणार असून शेतक-यांसह कृषी उत्पन्न समितीसमोर मोठा पेच उभा राहतो. सातत्याने होत असलेले बदल यामुळे सर्वसामान्यांसह होलसेल विक्रेत्यांच्या मानसीकेतवर नकारात्मक परिणाम होत असल्याचाही फटका खरेदी- विक्रीवर होत असल्याचे ते म्हणाले.समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिलेल्या माहितीनूसार सोमवार रात्री पावसाला सुरुवात झाली. त्याआधी शनिवार-रविवार होता. त्यामुळे या दोन दिवसांत भाज्यांना मागणी नव्हती, त्यात सोमवारी रात्रभर पावसाचा कमी अधिक जोर, पहाटेच्या वेळेत धुके यामुळे भाजीपाला येण्यास अडथळे आले. तसेच मागणीही कमी आली, त्याचा फटका बाजारावर झाला. गेले आठवडाभर भाज्यांचे भाव स्थिर होते, त्यामुळे होलसेल विक्रेत्यासह सामान्य ग्राहकाला दिलासा मिळाल होता. सोमवारच्या अचानक आलेल्या पावसामुळे गारठा वाढला, आणि आवक घटली.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणthakurliठाकुर्लीbadlapurबदलापूर