शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली, परतीच्या पावसाचा फटका, किरकोळ बाजारात भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:35 IST

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे.

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. ऐन आॅक्टोबर हीटमध्ये भाजीपाल्याच्या भाववाढीचाही चटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, जुन्नर, अहमदनगर, नाशिक या भागांतून दररोज ३०० गाड्यांमधून शेकडो टन भाजीपाला येतो. मात्र, बुधवारी केवळ ११२ गाड्या मालाची आवक झाली. ६० टक्के माल कमी आल्याने बाजार समितीचे उत्पन्न निम्मे घटले आहे. बाजारात विक्रीसाठी केवळ दोन हजार ५०० क्विंटल माल आला आहे. दररोज पाच हजार क्विंटल माल येतो. होलसेल बाजारातील हाच भाव किरकोळ बाजारात दीड पटीने जास्त असतो. एका किलोमागे १५ रुपये इतकी वाढ करून भाजीपाला विकला जातो. भाज्यांची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. त्याचा फायदा किरकोळ बाजारातील विक्रेते घेत आहेत. मात्र, ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. परतीच्या पावसाने विक्रेत्यांची चांदी, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे. परतीचा पाऊस, बदलते हवामान यामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. कल्याण बाजार समितीमध्ये होलसेल बाजार हा इतका चढ्या दराचा नसून किरकोळ बाजारपेठेत भाज्या महाग आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या तुलनेत कल्याण बाजार समितीतील भाजीपाल्याचे भाव तुलनेने कमी असल्याचे समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.कल्याण कृषी उत्पन्न बाजारात मटारचा भाव सगळ्यात जास्त आहे. मध्य प्रदेशातून मटारची बहुतांशी आवक होते. महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात त्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे मटारचा होलसेल बाजारातील भाव हा १०० ते १२५ रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ११५ ते १३५ रुपये किलोने विकला जात आहे. मटारला सामान्य ग्राहकांची पसंती कमी असली, तरी हॉटेलमालकांकडून त्याला चांगली मागणी आहे.मध्यंतरी, टोमॅटो हा लालबुंद झाला होता. १०० रुपये किलोला टोमॅटो विकला जात होता. हळूहळू टोमॅटोचा भाव आटोक्यात आला. आता भाज्यांचे भाव वाढूनही टोमॅटोचा होलसेल बाजारातील दर हा प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोंथबिरीची आवक वाढल्याने एक जुडी एक रुपयाने विकली गेली. काही शेतकºयांनी तर माल बाजार समितीत फेकून दिला होता. बाजारात आवक कमी व भाव वाढल्याने माल फेकून देण्याची स्थिती सध्या तरी विक्रेते व शेतमाल विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांवर आलेली नाही.ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, शेतमालाचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने होलसेल विक्रेत्याला जास्त दराने शेतमाल विकूनही पिकांचा खर्चदेखील भरून निघतो की नाही, याच विवंचनेत शेतकरी आहेत.>भाजीपाल्याचा भावभाजी दर (प्रतिकिलोत)वांगी १५ ते २० रुपयेफ्लॉवर २५ ते ३० रुपयेकोबी २० ते २५ रुपयेढोबळी मिरची ३० ते ४० रुपयेटोमॅटो २५ ते ३० रुपयेभेंडी २० ते २५ रुपयेगवार २५ ते ३० रुपयेघेवडा २५ ते ४० रुपयेकारली २० ते २५ रुपयेतोंडली २० ते २५ रुपयेमटार १०० ते १२५ रुपये

टॅग्स :kalyanकल्याण