शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली, परतीच्या पावसाचा फटका, किरकोळ बाजारात भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:35 IST

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे.

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. ऐन आॅक्टोबर हीटमध्ये भाजीपाल्याच्या भाववाढीचाही चटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, जुन्नर, अहमदनगर, नाशिक या भागांतून दररोज ३०० गाड्यांमधून शेकडो टन भाजीपाला येतो. मात्र, बुधवारी केवळ ११२ गाड्या मालाची आवक झाली. ६० टक्के माल कमी आल्याने बाजार समितीचे उत्पन्न निम्मे घटले आहे. बाजारात विक्रीसाठी केवळ दोन हजार ५०० क्विंटल माल आला आहे. दररोज पाच हजार क्विंटल माल येतो. होलसेल बाजारातील हाच भाव किरकोळ बाजारात दीड पटीने जास्त असतो. एका किलोमागे १५ रुपये इतकी वाढ करून भाजीपाला विकला जातो. भाज्यांची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. त्याचा फायदा किरकोळ बाजारातील विक्रेते घेत आहेत. मात्र, ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. परतीच्या पावसाने विक्रेत्यांची चांदी, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे. परतीचा पाऊस, बदलते हवामान यामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. कल्याण बाजार समितीमध्ये होलसेल बाजार हा इतका चढ्या दराचा नसून किरकोळ बाजारपेठेत भाज्या महाग आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या तुलनेत कल्याण बाजार समितीतील भाजीपाल्याचे भाव तुलनेने कमी असल्याचे समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.कल्याण कृषी उत्पन्न बाजारात मटारचा भाव सगळ्यात जास्त आहे. मध्य प्रदेशातून मटारची बहुतांशी आवक होते. महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात त्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे मटारचा होलसेल बाजारातील भाव हा १०० ते १२५ रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ११५ ते १३५ रुपये किलोने विकला जात आहे. मटारला सामान्य ग्राहकांची पसंती कमी असली, तरी हॉटेलमालकांकडून त्याला चांगली मागणी आहे.मध्यंतरी, टोमॅटो हा लालबुंद झाला होता. १०० रुपये किलोला टोमॅटो विकला जात होता. हळूहळू टोमॅटोचा भाव आटोक्यात आला. आता भाज्यांचे भाव वाढूनही टोमॅटोचा होलसेल बाजारातील दर हा प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोंथबिरीची आवक वाढल्याने एक जुडी एक रुपयाने विकली गेली. काही शेतकºयांनी तर माल बाजार समितीत फेकून दिला होता. बाजारात आवक कमी व भाव वाढल्याने माल फेकून देण्याची स्थिती सध्या तरी विक्रेते व शेतमाल विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांवर आलेली नाही.ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, शेतमालाचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने होलसेल विक्रेत्याला जास्त दराने शेतमाल विकूनही पिकांचा खर्चदेखील भरून निघतो की नाही, याच विवंचनेत शेतकरी आहेत.>भाजीपाल्याचा भावभाजी दर (प्रतिकिलोत)वांगी १५ ते २० रुपयेफ्लॉवर २५ ते ३० रुपयेकोबी २० ते २५ रुपयेढोबळी मिरची ३० ते ४० रुपयेटोमॅटो २५ ते ३० रुपयेभेंडी २० ते २५ रुपयेगवार २५ ते ३० रुपयेघेवडा २५ ते ४० रुपयेकारली २० ते २५ रुपयेतोंडली २० ते २५ रुपयेमटार १०० ते १२५ रुपये

टॅग्स :kalyanकल्याण