शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

भाजीपाल्याची आवक ६० टक्क्यांनी घटली, परतीच्या पावसाचा फटका, किरकोळ बाजारात भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:35 IST

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे.

कल्याण : परतीच्या पावसाचा फटका भाजीपाला शेतीला बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याची आवक निम्म्यावर आली आहे. ऐन आॅक्टोबर हीटमध्ये भाजीपाल्याच्या भाववाढीचाही चटका ग्राहकांना सोसावा लागत आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुणे, जुन्नर, अहमदनगर, नाशिक या भागांतून दररोज ३०० गाड्यांमधून शेकडो टन भाजीपाला येतो. मात्र, बुधवारी केवळ ११२ गाड्या मालाची आवक झाली. ६० टक्के माल कमी आल्याने बाजार समितीचे उत्पन्न निम्मे घटले आहे. बाजारात विक्रीसाठी केवळ दोन हजार ५०० क्विंटल माल आला आहे. दररोज पाच हजार क्विंटल माल येतो. होलसेल बाजारातील हाच भाव किरकोळ बाजारात दीड पटीने जास्त असतो. एका किलोमागे १५ रुपये इतकी वाढ करून भाजीपाला विकला जातो. भाज्यांची आवक घटल्याने भाव कडाडले आहेत. त्याचा फायदा किरकोळ बाजारातील विक्रेते घेत आहेत. मात्र, ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. परतीच्या पावसाने विक्रेत्यांची चांदी, तर ग्राहकांच्या खिशाला चटका बसला आहे. परतीचा पाऊस, बदलते हवामान यामुळे बाजारातील आवक मंदावली आहे. कल्याण बाजार समितीमध्ये होलसेल बाजार हा इतका चढ्या दराचा नसून किरकोळ बाजारपेठेत भाज्या महाग आहेत. नवी मुंबई बाजार समितीच्या तुलनेत कल्याण बाजार समितीतील भाजीपाल्याचे भाव तुलनेने कमी असल्याचे समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी सांगितले.कल्याण कृषी उत्पन्न बाजारात मटारचा भाव सगळ्यात जास्त आहे. मध्य प्रदेशातून मटारची बहुतांशी आवक होते. महाराष्ट्रात फार कमी प्रमाणात त्याचे पीक घेतले जाते. त्यामुळे मटारचा होलसेल बाजारातील भाव हा १०० ते १२५ रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ११५ ते १३५ रुपये किलोने विकला जात आहे. मटारला सामान्य ग्राहकांची पसंती कमी असली, तरी हॉटेलमालकांकडून त्याला चांगली मागणी आहे.मध्यंतरी, टोमॅटो हा लालबुंद झाला होता. १०० रुपये किलोला टोमॅटो विकला जात होता. हळूहळू टोमॅटोचा भाव आटोक्यात आला. आता भाज्यांचे भाव वाढूनही टोमॅटोचा होलसेल बाजारातील दर हा प्रतिकिलोला २५ ते ३० रुपये किलो आहे. तोच किरकोळ बाजारात ४० ते ४५ रुपये किलो दराने विकला जात आहे.दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोंथबिरीची आवक वाढल्याने एक जुडी एक रुपयाने विकली गेली. काही शेतकºयांनी तर माल बाजार समितीत फेकून दिला होता. बाजारात आवक कमी व भाव वाढल्याने माल फेकून देण्याची स्थिती सध्या तरी विक्रेते व शेतमाल विक्रीस घेऊन येणाºया शेतकºयांवर आलेली नाही.ही एक समाधानाची बाब आहे. मात्र, शेतमालाचे परतीच्या पावसाने नुकसान झाल्याने होलसेल विक्रेत्याला जास्त दराने शेतमाल विकूनही पिकांचा खर्चदेखील भरून निघतो की नाही, याच विवंचनेत शेतकरी आहेत.>भाजीपाल्याचा भावभाजी दर (प्रतिकिलोत)वांगी १५ ते २० रुपयेफ्लॉवर २५ ते ३० रुपयेकोबी २० ते २५ रुपयेढोबळी मिरची ३० ते ४० रुपयेटोमॅटो २५ ते ३० रुपयेभेंडी २० ते २५ रुपयेगवार २५ ते ३० रुपयेघेवडा २५ ते ४० रुपयेकारली २० ते २५ रुपयेतोंडली २० ते २५ रुपयेमटार १०० ते १२५ रुपये

टॅग्स :kalyanकल्याण