शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

वसईत रंगला मराठी गझल मुशायरा

By admin | Updated: April 19, 2016 01:38 IST

येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला

वसई : येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला. महाराष्ट्रातील नामवंत शायरांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. डॉ राम पंडीत, सदानंद डबीर, रमण रणदिवे, ज्योस्ना रजपुत, प्रमोद खराडे, ज्योती बालिगा राव यांनी आपल्या गजला सादर केल्या.संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ पल्लवी बनसोडे यांनी सुरेश भटांच्या 'फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते, वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते' या शेराने सुरूवात करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.'अंतयात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे, धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल रे, तो कवी होता न साधा एक झंझावात तो, शब्द सांभाळून त्याचा न्यायला लागेल रे' या सदानंद डबीर यांच्या सुरेश भटांवर लिहिलेल्या ओळींनी शब्दांची पालखी सजली आणि संपूर्ण वातावरण गझलमय झाले. मुशायरा उत्तरोत्तर रंगतच गेला. रमण रणदिवे यांच्या 'होकार आज देते, तेव्हा नकार होता. तो जीव घ्यावयाचा पहिला प्रकार होता ‘अशा प्रत्येक शेराने रसिकांची मने जिंकून घेतली 'वादळाने आज थोडे शांत व्हाया पाहिजे, या मनाला सावराया वेळ द्याया पाहिजे' या ज्योस्ना रजपूत यांच्या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली, त्यांची 'बोलबाला वेदनांचा फार झाला भावनांचा केव्हढा व्यापार झाला' ही गझल देखील रसिकांनी उचलून धरली तर प्रमोद खराडे यांच्या 'हे जसे होते तसे तू कर पुन्हा जीवनाचा रिक्त प्याला भर पुन्हा' या गझलेलाही रसिकांनी दाद दिली.सदानंद डबीर यांच्या 'आसवे टाळतां आली पण हसतां आले नाही, मी नुसते सलाम म्हटले मज झुकतां आले नाही'या गझलांनी मुशायरा बहारदार केला. गझलेच्या वषार्वात गझलप्रेमी चिंब भिजले. ज्योती बालिगा राव यांच्या सुत्रसंचालनाने बहार आणली. कार्यक्रमास वसईतील नामांकित, संगीतकार अच्युत ठाकुर, गायक नरेंद्र कोथंबीकर, प्राचार्य दुतोंडे सर, प्रा.उत्तम भगत, प्रा.आत्माराम गोडबोले, प्रा प्रदिप पाटील, प्रा विभुते, जयंत बर्वे, संदीप राऊत, सुरेश वर्तक, कवी नंदन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ कवयित्री वैजयंतीमाला मदने यांच्या समारोपीय सुंदर भाषणाने कार्यक्रमाची सांगतां झाली. (प्रतिनिधी)