शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

वसईत रंगला मराठी गझल मुशायरा

By admin | Updated: April 19, 2016 01:38 IST

येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला

वसई : येथे गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शब्दवेल कलासाहित्य सांस्कृतिक परिषदेने १६ एप्रिल रोजी आयोजिलेला 'मराठी गझल मुशायरा' खूपच रंगला. महाराष्ट्रातील नामवंत शायरांचा सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. डॉ राम पंडीत, सदानंद डबीर, रमण रणदिवे, ज्योस्ना रजपुत, प्रमोद खराडे, ज्योती बालिगा राव यांनी आपल्या गजला सादर केल्या.संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ पल्लवी बनसोडे यांनी सुरेश भटांच्या 'फुलावया लागलीस तेव्हा मला कुठे देहभान होते, वसंत आला निघून गेला मला कुठे वर्तमान होते' या शेराने सुरूवात करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.'अंतयात्रा ज्या दिशेने जायला लागेल रे, धूळ ही रस्त्यातली त्या गायला लागेल रे, तो कवी होता न साधा एक झंझावात तो, शब्द सांभाळून त्याचा न्यायला लागेल रे' या सदानंद डबीर यांच्या सुरेश भटांवर लिहिलेल्या ओळींनी शब्दांची पालखी सजली आणि संपूर्ण वातावरण गझलमय झाले. मुशायरा उत्तरोत्तर रंगतच गेला. रमण रणदिवे यांच्या 'होकार आज देते, तेव्हा नकार होता. तो जीव घ्यावयाचा पहिला प्रकार होता ‘अशा प्रत्येक शेराने रसिकांची मने जिंकून घेतली 'वादळाने आज थोडे शांत व्हाया पाहिजे, या मनाला सावराया वेळ द्याया पाहिजे' या ज्योस्ना रजपूत यांच्या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली, त्यांची 'बोलबाला वेदनांचा फार झाला भावनांचा केव्हढा व्यापार झाला' ही गझल देखील रसिकांनी उचलून धरली तर प्रमोद खराडे यांच्या 'हे जसे होते तसे तू कर पुन्हा जीवनाचा रिक्त प्याला भर पुन्हा' या गझलेलाही रसिकांनी दाद दिली.सदानंद डबीर यांच्या 'आसवे टाळतां आली पण हसतां आले नाही, मी नुसते सलाम म्हटले मज झुकतां आले नाही'या गझलांनी मुशायरा बहारदार केला. गझलेच्या वषार्वात गझलप्रेमी चिंब भिजले. ज्योती बालिगा राव यांच्या सुत्रसंचालनाने बहार आणली. कार्यक्रमास वसईतील नामांकित, संगीतकार अच्युत ठाकुर, गायक नरेंद्र कोथंबीकर, प्राचार्य दुतोंडे सर, प्रा.उत्तम भगत, प्रा.आत्माराम गोडबोले, प्रा प्रदिप पाटील, प्रा विभुते, जयंत बर्वे, संदीप राऊत, सुरेश वर्तक, कवी नंदन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. जेष्ठ कवयित्री वैजयंतीमाला मदने यांच्या समारोपीय सुंदर भाषणाने कार्यक्रमाची सांगतां झाली. (प्रतिनिधी)