शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:30 IST

वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. हाच दिवस आता यापुढे बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे वाशीमच्या भक्तिधामात मेळाव्याचे आयोजन समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार ५ डिसेंबर रोजी वाशिमच्या पोहरादेवी येथे होणार मुहर्तमेढ

ठाणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. त्यानंतर, त्यांनी ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याचा नावलौकिक वाढवला. शिवाय, अखिल बंजारा समाजाला देखील प्रगतीपथाची दिशा दाखवली. याच दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बंजारा समाज ५ डिसेंबर हा दिन ‘बंजारा समाज गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. या गौरव दिनाची मुहूर्तमेढ बंजारा पोहरादेवी (जिल्हा वाशीम) येथील भक्तिधामात ५ डिसेंबर रोजी रोवली जाणार आहे. समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती बंजारा धर्मपीठाचे संस्थापक किसन राठोड यांनी दिली.राठोड यांनी ठाण्यातील समाजबांधवांना दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्याला हरितक्र ांतीचा मार्ग दाखवणाºया नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळला, तेव्हा महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याच काळातील दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रावर आलेले अस्मानी संकट होते. मात्र, त्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढून त्यांनी राज्यात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न केले. शेती आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दोघांनाही परिवर्तनाच्या मार्गावर नेले. अशाच समाजभूषण वसंतराव नाईक यांचा ५ डिसेंबर हा शपथविधी दिवस यंदापासून अखिल भारतीय बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा करणार आहे. या दिवसाची मुहूर्तमेढ बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा भक्तिधाम येथून रोवण्यात येत आहे. या वेळी भव्य रॅलीचे आयोजन केले असून ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोहरादेवी भक्तिधाम ते नाईकांचे जन्मस्थळ पुसदमार्गे गहुली स्मृतिस्थळ गौरवभूमी येथे रॅली जाईल. स्मृतिस्थळावर वसंतराव यांना अभिवादन करण्यात येईल. दुपारी भक्तिधाम येथे समाज गौरव दिन सोहळा होईल. या सोहळ्यात समाजातील सर्वपक्षीय नेते तसेच विचारवंत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामध्ये किसन राठोड, महसूलमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहर नाईक, मखराम पवार, माजी आमदार धोंडीराम राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, प्रदीप नाईक, तुषार राठोड आणि बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजूसिंग नायक आदी उपस्थित राहणार आहेत.-------एसटी प्रवर्गात समाविष्ट करा - राठोडसमाज गौरव दिन सोहळ्यात समाजाच्या आगामी काळातील संघर्षाची दिशा ठरवणार असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले. समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून जातीच्या दाखल्यांसाठी १९६१ पूर्वीची रहिवासी पुरावा अट रद्द करावी. तसेच मुंबईत बंजारा भवनसाठी जागा मिळावी, अशा प्रमुख मागण्या या सोहळ्यातून सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत. आगामी काळात समाज स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून त्याबाबतदेखील विचारमंथन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली......

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज