शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वसंतराव नाईकांचा शपथविधी दिवस ‘बंजारा गौरव दिन’ म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 21:35 IST

वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्री पदी ५ डिसेंबर रोजी शपथ घेतली होती. हाच दिवस आता यापुढे बंजारा गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त वाशिमच्या पोहरादेवी येथे एका रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे वाशीमच्या भक्तिधामात मेळाव्याचे आयोजन

ठाणे : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बंजारा समाजाचे नेते वसंतराव नाईक यांनी ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्टÑाच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली होती. त्यानंतर, त्यांनी ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवून राज्याचा नावलौकिक वाढवला. शिवाय, अखिल बंजारा समाजाला देखील प्रगतीपथाची दिशा दाखवली. याच दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय बंजारा समाज ५ डिसेंबर हा दिन ‘बंजारा समाज गौरव दिन’ म्हणून साजरा करणार आहे. या गौरव दिनाची मुहूर्तमेढ बंजारा पोहरादेवी (जिल्हा वाशीम) येथील भक्तिधामात ५ डिसेंबर रोजी रोवली जाणार आहे. समाजातील सर्वपक्षीय नेते यानिमित्त एकाच व्यासपीठावर येणार असल्याची माहिती बंजारा धर्मपीठाचे संस्थापक किसन राठोड यांनी दिली.राठोड यांनी ठाण्यातील समाजबांधवांना दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, राज्याला हरितक्र ांतीचा मार्ग दाखवणाºया नाईक यांनी मुख्यमंत्रीपदाचा भार सांभाळला, तेव्हा महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याच काळातील दुष्काळ म्हणजे महाराष्ट्रावर आलेले अस्मानी संकट होते. मात्र, त्याही बिकट परिस्थितीतून मार्ग काढून त्यांनी राज्यात हरितक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत संपन्न केले. शेती आणि समाज परिवर्तनासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करून दोघांनाही परिवर्तनाच्या मार्गावर नेले. अशाच समाजभूषण वसंतराव नाईक यांचा ५ डिसेंबर हा शपथविधी दिवस यंदापासून अखिल भारतीय बंजारा समाज गौरव दिवस म्हणून साजरा करणार आहे. या दिवसाची मुहूर्तमेढ बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथील बंजारा भक्तिधाम येथून रोवण्यात येत आहे. या वेळी भव्य रॅलीचे आयोजन केले असून ५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता पोहरादेवी भक्तिधाम ते नाईकांचे जन्मस्थळ पुसदमार्गे गहुली स्मृतिस्थळ गौरवभूमी येथे रॅली जाईल. स्मृतिस्थळावर वसंतराव यांना अभिवादन करण्यात येईल. दुपारी भक्तिधाम येथे समाज गौरव दिन सोहळा होईल. या सोहळ्यात समाजातील सर्वपक्षीय नेते तसेच विचारवंत एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामध्ये किसन राठोड, महसूलमंत्री संजय राठोड, माजी मंत्री मनोहर नाईक, मखराम पवार, माजी आमदार धोंडीराम राठोड, आमदार हरिभाऊ राठोड, प्रदीप नाईक, तुषार राठोड आणि बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष राजूसिंग नायक आदी उपस्थित राहणार आहेत.-------एसटी प्रवर्गात समाविष्ट करा - राठोडसमाज गौरव दिन सोहळ्यात समाजाच्या आगामी काळातील संघर्षाची दिशा ठरवणार असल्याचे किसन राठोड यांनी सांगितले. समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करून जातीच्या दाखल्यांसाठी १९६१ पूर्वीची रहिवासी पुरावा अट रद्द करावी. तसेच मुंबईत बंजारा भवनसाठी जागा मिळावी, अशा प्रमुख मागण्या या सोहळ्यातून सरकारपुढे ठेवण्यात येणार आहेत. आगामी काळात समाज स्वबळावर निवडणूक लढवण्याचा विचार करत असून त्याबाबतदेखील विचारमंथन केले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली......

टॅग्स :thaneठाणेcommunityसमाज