शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

देशाचे लोकतंत्र वाचवण्यासाठी ठाण्यातील विविध संघटनांचे राष्ट्रपतींना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 17:24 IST

नवीन शैक्षणिक धोरण लादून सामान्य माणसाला शिक्षणापासून दूर लोटण्याचे षडयंत्र रचले आदी स्वरूपाचे आरोप या निवेदनात या संघटनांनी केले आहे. 

ठाणे - शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला व सामाजिक न्यायासाठी होणारी आंदोलने केंद्र शासनाकडून दडपली जात आहे, असे आरोप करीत देशाचे संवैधानिक सार्वभोमत्व, जनतेचे लोकशाही अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी खुद्द केंद्र सरकार करीत आहे आदी स्वरुपांचे आरोप करुन देशाचे लोकतंत्र वाचवण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांनी पुढे येण्याची अपेक्षा येथील जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व जन आंदोलनांची संघर्ष समितीमधील विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यांचे हे निवेदन या संघटनांच्या शिष्टमंडळाने ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील,यांच्याकडे शुक्रवारी सुपुर्द केले.

 राज्यपालांकडे शनिवारी राज्यभरातील संघटनांच्या माध्यमातून लोकतंत्र वाचवण्यासाठी आंदोलन करण्यात येणार. त्यास अनुसरून आज येथील संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींना साकडे घालणारे निवेदन दिले. देश पातळीवर शेतकरी आंदोलन सतत सात महिने सुरू असतानाही  केंद्र सरकारने देशातील अन्न दातांच्या प्रश्नावर चर्चा न करता एकतर्फी हुकूमशाही पध्दतीने शेती विषयक तीन कायदे लादल्याच्या आरोपसह कामगार कायदे नेस्तनाबूत करीत चार कोड बनवून मालक धार्जीणो धोरण लादले, नवीन शैक्षणिक धोरण लादून सामान्य माणसाला शिक्षणापासून दूर लोटण्याचे षडयंत्र रचले आदी स्वरूपाचे आरोप या निवेदनात या संघटनांनी केले आहे.      केंद्र सरकार कोणत्याही प्रकारची लोकशाही प्रक्रिया न राबवता शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाला विकासाच्या परिघाबाहेर ढकलण्याचा मनमानी, भांडवलदारांच्या हितासाठी सत्तेचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप या संघाने राष्ट्रपतींना दिलल्या निवेदनात केला आहे. देशात अप्रत्यक्षपणो आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी निवेदनात नमुद केला आहे. सरकार विरोधात कोणी ही भूमिका घेतली तर त्याविरोधात सूडबुद्धीने, शासकीय यंत्रणोचा दुरूपयोग मनमानी केली जात असल्याची भावना त्यांनी निवेदनात कथन केली आहे.

राष्ट्रपती या नात्याने लोकतंत्र वाचवण्यासाठी राष्ट्रपतींनी पुढे येऊन आपली संवैधानिक जबाबदारी पार पाडावी,अशी मागणी या जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय व जन आंदोलनांची संघर्ष समितीमधील संघटनांनी निवेदनाव्दारे राष्ट्रपतींकडे केली  आहे. यासाठी या संघटनेच्या शिष्टमंडळाने ठाण्याचे निवासी जिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांची भेट घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद, यांच्या नावे निवेदन दिले. या शिष्टमंडळात जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वयाचे समन्वयक जगदीश खैरालिया,शासकीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस भास्कर गव्हाळे, बाल्मिकी विकास नरेश भगवाने,भारतीय महिला फेडरेशनच्या निर्मला पवार, समता विचार प्रसारकचे अजय भोसले आदींचा समावेश होता.