शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

वरसावे पुलामध्ये पर्यावरण धोरणाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:08 IST

पर्यावरण विभागाची परवानगीच घेतली नाही, पुलाची दुरुस्ती अडचणीत येण्याची शक्यता

- राजू काळे भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या वरसावे येथे नवीन वाहतूक पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या कामासाठी पर्यावरण विभागाची परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या पुलाचे बांधकाम सीआरझेड बाधित नसलेल्या क्षेत्रात सुरु असल्याने अडचण नाही; मात्र सीआरझेड क्षेत्रातील बांधकाम सुरु करताना पर्यावरण विभागाच्या परवानगीचा मुद्दा निश्चित समोर येणार आहे.वरसावे येथील वाहतूक बेटावर मुंबई, ठाणे व वसई-विरारहून मोठी वर्दळ असते. येथून गुजरातला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १९७६ व २००२ मध्ये अनुक्रमे दोनपदरी दोन वाहतूक पूल बांधले. गेल्या ६ वर्षांपासून या दोन्ही पुलांच्या दुरुस्तीने डोके वर काढल्याने अनेकदा वाहतूक बंद करावी लागली. याला पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने तिसरा चारपदरी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमीपुजन १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुलाचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश सर्व सरकारी यंत्रणांना दिले. हा पूल येथील घोडबंदर नदीवर बांधण्यात येणार असून, नदीच्या दुतर्फा तिवर क्षेत्र आहे. त्यामुळे नदीतील बांधकामासह तिवर क्षेत्रातील बांधकामासाठीही पर्यावरण विभागाची परवानगी अत्यावश्यक आहे; मात्र ती न घेताच भूमीपुजन उरकण्यात आले. सध्या या पूलाचे बांधकाम सीआरझेड बाधित नसलेल्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सीआरझेड बाधित क्षेत्रातील बांधकामाच्या परवानगीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असला तरी, हा प्रस्ताव अद्यापही लालफितीत अडकून पडला आहे. त्यामुळे या पुलाचे घाईघाईने केलेले भूमीपुजन फसवे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुलाचे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात होण्यासाठी पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान तयार झाल्यानंतर परवानगीची कार्यवाही होऊन, बांधकामाला गती देण्यात येईल.- दिनेश अग्रवाल, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपूल सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येणार असल्याने पर्यावरण विभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते. पुलाचे काम सरकारी यंत्रणेकडूनच होत असताना पर्यावरण विभागाची परवानगी नसेल, तर ते दुर्दैवी आहे.- विवेक पंडीत, संस्थापक, श्रमजीवी संघटना

टॅग्स :bhayandarभाइंदर