शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

वरसावे पुलामध्ये पर्यावरण धोरणाचा अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:08 IST

पर्यावरण विभागाची परवानगीच घेतली नाही, पुलाची दुरुस्ती अडचणीत येण्याची शक्यता

- राजू काळे भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीतील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर असलेल्या वरसावे येथे नवीन वाहतूक पुलाचे बांधकाम वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. या कामासाठी पर्यावरण विभागाची परवानगीच घेतली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सध्या पुलाचे बांधकाम सीआरझेड बाधित नसलेल्या क्षेत्रात सुरु असल्याने अडचण नाही; मात्र सीआरझेड क्षेत्रातील बांधकाम सुरु करताना पर्यावरण विभागाच्या परवानगीचा मुद्दा निश्चित समोर येणार आहे.वरसावे येथील वाहतूक बेटावर मुंबई, ठाणे व वसई-विरारहून मोठी वर्दळ असते. येथून गुजरातला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १९७६ व २००२ मध्ये अनुक्रमे दोनपदरी दोन वाहतूक पूल बांधले. गेल्या ६ वर्षांपासून या दोन्ही पुलांच्या दुरुस्तीने डोके वर काढल्याने अनेकदा वाहतूक बंद करावी लागली. याला पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने तिसरा चारपदरी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. त्याचे भूमीपुजन १० जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुलाचे बांधकाम १८ महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाला सहकार्य करण्याचे निर्देश सर्व सरकारी यंत्रणांना दिले. हा पूल येथील घोडबंदर नदीवर बांधण्यात येणार असून, नदीच्या दुतर्फा तिवर क्षेत्र आहे. त्यामुळे नदीतील बांधकामासह तिवर क्षेत्रातील बांधकामासाठीही पर्यावरण विभागाची परवानगी अत्यावश्यक आहे; मात्र ती न घेताच भूमीपुजन उरकण्यात आले. सध्या या पूलाचे बांधकाम सीआरझेड बाधित नसलेल्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सीआरझेड बाधित क्षेत्रातील बांधकामाच्या परवानगीसाठी राज्याच्या पर्यावरण विभागाकडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला असला तरी, हा प्रस्ताव अद्यापही लालफितीत अडकून पडला आहे. त्यामुळे या पुलाचे घाईघाईने केलेले भूमीपुजन फसवे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.पुलाचे बांधकाम सीआरझेड क्षेत्रात होण्यासाठी पर्यावरण विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लान तयार झाल्यानंतर परवानगीची कार्यवाही होऊन, बांधकामाला गती देण्यात येईल.- दिनेश अग्रवाल, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणपूल सीआरझेड क्षेत्रात बांधण्यात येणार असल्याने पर्यावरण विभागाची परवानगी घेणे अपेक्षित होते. पुलाचे काम सरकारी यंत्रणेकडूनच होत असताना पर्यावरण विभागाची परवानगी नसेल, तर ते दुर्दैवी आहे.- विवेक पंडीत, संस्थापक, श्रमजीवी संघटना

टॅग्स :bhayandarभाइंदर