शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

प्राण्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ठाणे जिल्ह्यात स्मशानभूमीची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 01:10 IST

खासगी डॉक्टरांकडून पाळीव प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी लूट

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोनापाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूचाही शिरकाव झाला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यात पशुप्राण्यांसाठी एकही स्मशानभूमी नसल्याचे वास्तव समोर आले आहे. सध्या ठाण्यात मृत पक्ष्यांची विल्हेवाट घनकचऱ्याच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे ठाण्यातही पशुप्राण्यांसाठी स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी मनसेच्या जनहित व विधि विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी केली.

ठाणे शहरात सुमारे ४ हजार ३०० पाळीव, तर १० हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत. याशिवाय मांजर, पक्षी अशांची संख्या अधिक आहे. या पक्षी-प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे, हा यक्षप्रश्न प्राणिप्रेमींसमोर आहे. काही जण मुंबईच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करतात, तर काही जण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांमार्फत त्यांची विल्हेवाट लावतात. खासगी डॉक्टरांकडून यासाठी तीन हजारांपासून १० हजारांपर्यंत शुल्क आकारले जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिका हद्दीत प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी उपलब्ध करणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण ठाणे, पालघर आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये खास प्राण्यांसाठी अशी स्मशानभूमी अस्तित्वात नाही. दरम्यान, एक-दीड वर्षापूर्वी प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी जागा निश्चितीबाबत महासभेत विषय मांडण्यात आला होता. मात्र त्यास मंजुरी मिळालेली नाही. सध्या ठाण्यात मृत होणाऱ्या पक्ष्यांची विल्हेवाट ही घनकचऱ्याच्या माध्यमातून केली जात असल्याचे ठाणे महापालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठाण्यात प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यातदेखील प्राण्यांसाठी स्मशानभूमी लवकरात लवकर विकसित करण्यात यावी.        - स्वप्निल महिंद्रकर, मनसेठाणे जिल्ह्यात सध्या पशुप्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही. त्या-त्या महापालिकेच्या हद्दीतील प्रशासनाने ती उपाययोजना करावयाची असते.    - लक्ष्मण पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, जि.प. 

टॅग्स :thaneठाणे