शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमधील वालधुनी झाली गुलाबी नदी; प्रदूषण कमी होण्याची चिन्हेच नाहीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 07:20 IST

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता.

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीचे प्रदूषण कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. सर्व सांडपाणी  नदीत सोडले जात असतानाच सोमवारी दुपारी अचानक वालधुनी नदीतील पाणी गुलाबी झाले होते. 

अंबरनाथमधून वाहणारी वालधुनी नदी गेल्या काही वर्षात सर्वाधिक प्रदूषित नदीत समाविष्ट झाली आहे. गेल्या वर्षी सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेच्या मदतीने नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प राबवला होता. मात्र तरीदेखील नदीचे प्रदूषण कमी झाले नाही. अंबरनाथ आनंदनगर एमआयडीसीतील काही कारखान्यांनी सर्व सांडपाणी या नदीत सोडल्याने आजही  नदी प्रदूषितच आहे. यासोबतच अंबरनाथ आणि उल्हासनगरमधील काही जीन्स कंपन्या थेट त्यांचे सांडपाणी नदी सोडत असल्याने या नदीचे रंगदेखील बदलत आहे. सोमवारी दुपारी वालधुनी नदीने गुलाबी रंग परिधान केला होता. संपूर्ण पाणी गुलाबी रंगाचे वाहत राहिल्याने प्रदूषणाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी, रासायनिक पाणी आणि अनेक जीन्स वॉश करणारे कारखानदारदेखील सर्व सांडपाणी वालधुनी नदीत सोडत असल्यामुळे या नदीच्या पाण्याचा रंग बदलत आहे.

वालधुनी नदीचे प्रदूषण सर्वज्ञात असतानादेखील प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे उघडपणे डोळेझाक करीत आहे. वालधुनी नदी प्रदूषित होण्यामागे प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सर्वांत मोठा हात राहिला आहे - शैलेश शिर्के,  सामाजिक कार्यकर्ते