शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वडवली भाजी मंडईचा झाला वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:33 IST

अंबरनाथमधील फेरीवाल्यांनी रस्ता रिकामा केलाच नाही; नियमित देखभालीअभावी दुर्दशा

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या वडवली मार्केटच्या शेजारच्या मोकळ्या जागेत पालिकेने चार वर्षांपूर्वी खुली भाजी मंडई उभारली होती. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसाठी ही जागा देण्यात येणार होती. मात्र, स्टेशन परिसरातील फेरीवाले न उठल्याने ही मंडई केवळ नावापुरती राहिली आहे. आता तर या खुल्या भाजी मंडईचा चक्क वाहनतळ झाला आहे. स्थानिक रहिवासी, तर आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या येथे पार्क करत आहेत.अंबरनाथ नगर परिषदेच्या बेजबाबदारपणाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. अंबरनाथ नगर परिषदेने कोट्यवधींचा खर्च करत वडवली भागात व्यापारी तत्त्वावर वडवली मार्केटची उभारणी केली होती. या वडवली मार्केटमध्ये अनेक गाळे हे पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेदेखील आहेत. मात्र, या मार्केटची अवस्था आज बिकट झाली आहे. या मार्केटची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने संपूर्ण मार्केटला गळती लागली आहे. अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले असून काही ठिकाणी मुख्य पिलरचे स्टीलदेखील गंजलेले आहे. अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्तीच झालेली नाही. मार्केटवरील छत गळत असल्याने संपूर्ण इमारतीलाच धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या देखभालीसंदर्भात पत्रव्यवहार करूनही त्याची दुरुस्ती होत नाही. याच इमारतीत पालिकेने स्वत:च्या सफाई कामगारांचे हजेरीशेडही उभारले आहे. कामगारांचा वावर असतानाही ही इमारत दुर्लक्षित राहिली आहे. इमारतीला वीजपुरवठा करणारा बॉक्सदेखील खुला ठेवण्यात आल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीच्या परिसराची स्वच्छताही नियमित होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असतानाच अंबरनाथ पालिकेने चार वर्षांपूर्वी वडवली मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पालिकेचे फिश मार्केट प्रस्तावित केले होते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी फिश मार्केटमुळे दुर्गंधी पसरेल, या भीतीने त्यास विरोध केला. फिश मार्केटला विरोध झाल्यावर पालिकेने याच मार्केटच्या जागेवर मोठी शेड उभारली. येथे खुली भाजी मंडई उभारण्यात आली. त्याचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, खुल्या भाजी मंडईचे उद्घाटन झाल्यापासून एकही भाजीविक्रेता येथे बसलेला नाही.अंबरनाथ स्टेशन परिसरात भाजीविक्रेते बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्यावर त्यांना बसण्यासाठी येथे शेड उभारली होती. मात्र, पालिकेने ना भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली, ना भाजीविक्रेते येथे आले. या शेडचा वापर इतर कामासाठीही पालिका प्रशासन करू शकते, याची कल्पना आहे. मात्र, तरीही त्याचा वापर पालिका प्रशासन करत नाही. अनेक वर्षांपासून या शेडचा वापर स्थानिक रहिवासी आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाडी ठेवण्यासाठी करत आहेत. पावसाळा असो वा उन्हाळा, येथे सर्व शेडही गाड्यांनी भरलेली असते.जागेच्या पाहणीअंती होणार निर्णयपालिकेच्या नियोजनशून्य कामाचा फटका या शेडला बसला आहे. या शेडचा वापर पालिकेने आपल्या उपक्रमासाठी करावा. येथे भाजीविक्रेत्यांना जागा दिल्यास स्टेशनवर पडणारा भार कमी होण्यास मदत होईल.- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते, अंबरनाथया जागेची पाहणी करून नव्याने या ठिकाणी काही करणे शक्य असल्यास त्याबाबत विचार केला जाईल. पालिका अधिकारी या जागेसंदर्भात कोणता प्रस्ताव तयार करतात, त्यावरून पुढील निर्णय घेतला जाईल.- मनीषा वाळेकर,नगराध्यक्ष, अंबरनाथ

टॅग्स :Parkingपार्किंगambernathअंबरनाथ