शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

वडवली भाजी मंडईचा झाला वाहनतळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 03:33 IST

अंबरनाथमधील फेरीवाल्यांनी रस्ता रिकामा केलाच नाही; नियमित देखभालीअभावी दुर्दशा

अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या वडवली मार्केटच्या शेजारच्या मोकळ्या जागेत पालिकेने चार वर्षांपूर्वी खुली भाजी मंडई उभारली होती. स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांसाठी ही जागा देण्यात येणार होती. मात्र, स्टेशन परिसरातील फेरीवाले न उठल्याने ही मंडई केवळ नावापुरती राहिली आहे. आता तर या खुल्या भाजी मंडईचा चक्क वाहनतळ झाला आहे. स्थानिक रहिवासी, तर आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्या येथे पार्क करत आहेत.अंबरनाथ नगर परिषदेच्या बेजबाबदारपणाचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. अंबरनाथ नगर परिषदेने कोट्यवधींचा खर्च करत वडवली भागात व्यापारी तत्त्वावर वडवली मार्केटची उभारणी केली होती. या वडवली मार्केटमध्ये अनेक गाळे हे पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेदेखील आहेत. मात्र, या मार्केटची अवस्था आज बिकट झाली आहे. या मार्केटची नियमित देखभाल दुरुस्ती होत नसल्याने संपूर्ण मार्केटला गळती लागली आहे. अनेक ठिकाणी प्लास्टर निघाले असून काही ठिकाणी मुख्य पिलरचे स्टीलदेखील गंजलेले आहे. अनेक वर्षांपासून त्याची दुरुस्तीच झालेली नाही. मार्केटवरील छत गळत असल्याने संपूर्ण इमारतीलाच धोका निर्माण झाला आहे. इमारतीच्या देखभालीसंदर्भात पत्रव्यवहार करूनही त्याची दुरुस्ती होत नाही. याच इमारतीत पालिकेने स्वत:च्या सफाई कामगारांचे हजेरीशेडही उभारले आहे. कामगारांचा वावर असतानाही ही इमारत दुर्लक्षित राहिली आहे. इमारतीला वीजपुरवठा करणारा बॉक्सदेखील खुला ठेवण्यात आल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इमारतीच्या परिसराची स्वच्छताही नियमित होत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असतानाच अंबरनाथ पालिकेने चार वर्षांपूर्वी वडवली मार्केटच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत पालिकेचे फिश मार्केट प्रस्तावित केले होते. मात्र, स्थानिक रहिवाशांनी फिश मार्केटमुळे दुर्गंधी पसरेल, या भीतीने त्यास विरोध केला. फिश मार्केटला विरोध झाल्यावर पालिकेने याच मार्केटच्या जागेवर मोठी शेड उभारली. येथे खुली भाजी मंडई उभारण्यात आली. त्याचे उद्घाटनही करण्यात आले. मात्र, खुल्या भाजी मंडईचे उद्घाटन झाल्यापासून एकही भाजीविक्रेता येथे बसलेला नाही.अंबरनाथ स्टेशन परिसरात भाजीविक्रेते बसत असल्याने त्यांच्यावर कारवाई केल्यावर त्यांना बसण्यासाठी येथे शेड उभारली होती. मात्र, पालिकेने ना भाजीविक्रेत्यांवर कारवाई केली, ना भाजीविक्रेते येथे आले. या शेडचा वापर इतर कामासाठीही पालिका प्रशासन करू शकते, याची कल्पना आहे. मात्र, तरीही त्याचा वापर पालिका प्रशासन करत नाही. अनेक वर्षांपासून या शेडचा वापर स्थानिक रहिवासी आपल्या चारचाकी आणि दुचाकी गाडी ठेवण्यासाठी करत आहेत. पावसाळा असो वा उन्हाळा, येथे सर्व शेडही गाड्यांनी भरलेली असते.जागेच्या पाहणीअंती होणार निर्णयपालिकेच्या नियोजनशून्य कामाचा फटका या शेडला बसला आहे. या शेडचा वापर पालिकेने आपल्या उपक्रमासाठी करावा. येथे भाजीविक्रेत्यांना जागा दिल्यास स्टेशनवर पडणारा भार कमी होण्यास मदत होईल.- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते, अंबरनाथया जागेची पाहणी करून नव्याने या ठिकाणी काही करणे शक्य असल्यास त्याबाबत विचार केला जाईल. पालिका अधिकारी या जागेसंदर्भात कोणता प्रस्ताव तयार करतात, त्यावरून पुढील निर्णय घेतला जाईल.- मनीषा वाळेकर,नगराध्यक्ष, अंबरनाथ

टॅग्स :Parkingपार्किंगambernathअंबरनाथ