शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

खासगी रुग्णालयातील लसीकरण जोमात; मात्र शासकीय रुग्णालयात कोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शासकीय लसीकरण अर्थात मोफत लसीकरण मोहिमेला मागील तीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : एकीकडे ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात शासकीय लसीकरण अर्थात मोफत लसीकरण मोहिमेला मागील तीन दिवसांपासून खोडा लागला आहे. किंबहुना शासकीय केंद्रावर तीन दिवसांपासून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद आहे. परंतु, खासगी रुग्णालयाच्या ठिकाणी लसीकरण मात्र सुरू आहे. शासकीय यंत्रणांनी लस नसल्याचे आणि पावसाचे कारण दिले असले तरीदेखील खासगी रुग्णालयात मात्र लसीकरण सुरू आहे. त्यामुळेच खासगी रुग्णालयात सुकाळ आणि सरकारीमध्ये लसींचा दुष्काळ अशीच म्हणण्याची वेळ आता आली आहे.

मागील काही दिवसांपासून ठाण्यासह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, मीरा-भाईदर आदींसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लसीकरण मोहीम थांबली आहे. मागील तीन दिवसांपासून शासकीय केंद्रावर लस देण्यात आलेली नाही. केवळ पाऊस जास्तीचा असल्याने प्रत्येक महापालिकेने लसीकरण बंद ठेवल्याचेही सांगितले आहे. मात्र, प्रत्यक्षात मागील तीन दिवसांपासून ठाण्यासह इतर कोणत्याही महापालिकांना लसींचा साठाच उपलब्ध झाला नसल्याची गंभीर बाबही समोर आली आहे. त्यामुळेही लसीकरण बंद आहे. एकीकडे शासकीय केंद्रावर आठवड्यातून एक ते तीन दिवस लसीकरण सुरू असताना खासगी रुग्णालयांत मात्र जोरात लसीकरण मोहीम सुरू आहे. खासगी रुग्णालयांतील रोजच्या रोज स्लॉट बुक होत असून नागरिक रांगा लावून तेथे त्यातही पैसे देऊन नाइलजास्तव लस घेत असल्याचे दिसत आहे. शासकीय यंत्रणांच्या ठिकाणी वारंवार लसींचा तुटवडा जाणवत आहे, त्यामुळे मोफत लस केव्हा मिळणार असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने आणि लसींचे दोन्ही डोस घेणाऱ्यांना रेल्वेतून प्रवासाची मुभा मिळणार असल्याने शासकीय लसीची वाट न बघता आणि खिशाला कात्री लावून खासगी केंद्रातून जाऊन लस घेत आहेत.

ठाण्यासह जिल्ह्याच्या इतर महापालिकांच्या ठिकाणी हीच परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे कोणी लस देता का लस अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. परंतु, खासगी रुग्णालयांना लस मिळत असताना शासकीय यंत्रणेला लस का मिळत नाहीत, असा सवालही सर्वसामान्य नागरिक करू लागले आहेत.

आतापर्यंत झालेले लसीकरण - २२,७८,०३५

पहिला डोस - १६,८०,७८४

दुसरा डोस - ५,९७,२५१

ठाणे जिल्ह्यात लाभार्थींची संख्या साधारणपणे ९९ लाख ४२ हजार ४०७ एवढी असून त्यातील केवळ २२ लाख ७८ हजार ३५ जणांचे लसीकरण झालेले आहे. त्यानुसार अजून ७६ लाख ६४ हजार ३७२ जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. तर एकही डोस न घेतलेले १८ ते ४४ वयोगटात ४१ लाख ७५ हजार ८११ लाभार्थी असून त्यातील ३ लाख ७१ हजार ८८१ जणांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यानुसार ३८ लाख ३ हजार ९३० जणांना अद्यापही लसच मिळालेली नाही. तर ४६ ते ५९ वयोगटातील १४ लाख १४ हजार ७८४ लसीकरण शिल्लक आहे.

शासकीय लसीकरण केंद्रात शून्य लस

मागील तीन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही लसींचा साठाच न आल्याने लसीकरण थांबले आहे. परंतु, पावसाचे कारण सांगून लसीकरण बंद ठेवण्यात येत असल्याचे महापालिकांचे म्हणणे आहे. परंतु, याच दिवसात खासगी केंद्रावर मात्र लसीकरण सुरू आहे. खासगी केंद्रावर कुठे रोजच्या रोज १०० तर कुठे ५० डोस दिले जात आहेत.

हेच का मोफत लसीकरण?

मागील जानेवारीपासून लस घेण्याची वाट बघत आहे. परंतु, अद्यापही लस घेता आलेली नाही. त्यात मागील काही दिवसांपासून शासकीय केंद्रावर लस मिळत नसताना खासगी रुग्णालयांत मात्र लस मिळत आहेत. त्यामुळे आता हेच का मोफत लसीकरण, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

(प्रशांत बनसोडे - नागरिक)

लस घ्यायची आहे, मात्र शासकीय केंद्रावरील रांगा पाहता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतरही तासनतास रांगेत उभे राहाण्याची भीती मनात आहे. त्यामुळे लस घ्यायची कशी, असा प्रश्न आम्हाला सतावत आहे. त्यात आता एक ते दोन दिवसच शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी अधिक होत आहे. यामुळेच सध्या तरी लस घेतलेली नाही.

(रोहित क्षीरसागर - तरुण)

मागील तीन दिवसांपासून लसींचा स्टॉक आलेला नाही. त्यामुळे आणि पाऊस जास्तीचा पडत असल्याने लसीकरण बंद ठेवले. लस उपलब्ध झाल्यावर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

(संजय हेरवाडे - अतिरिक्त आयुक्त, ठामपा)