शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:05 IST

Thane News: भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानची दहशत वाढत असल्यामुळे गेल्या वर्षभरात शहरात साडेचार हजार जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या श्वानची संख्या झपाट्याने वाढू लागली असून ही एक मोठी समस्या बनली आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ठाण्यात सुमारे ७० हजार हून अधिक भटके श्वान असून त्यापैकी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने२०१४ ते १९ य वर्षात ५८ हजारहून अधिक श्वानांवर नसबंदी केली आहे. मात्र तरीही शहर परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या वतीने ही मोहीम न घेतल्यामुळे बऱ्याच श्वानांचा रेबीजमुळे मृत्यूदेखील झालेला आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नाही. ही मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने ही मोहीम  शहरात राबविण्यात आली. ही मोहिम शहरातील वसंत विहार, हिरानंदानी मेडोज, कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर, नौपाडा, जांभळी नाका, घोडबंदर रोड या सर्व परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ५०० श्वानांना अँटी रेबीजचे लसीकरण करण्यात आले तसेच लहान पिल्लांना नाईन इन  वन ची लसीकरण देण्यात आली, जेणेकरून त्यांना गॅस्ट्रो व डिस्टेंपर सारखे आजार होणार नाही. 

दरम्यान या मोहिमेअंतर्गत श्वान यांना त्यांच्या गळ्यात रेडियम ची बेल्ट देखील घालण्यात आलेले आहेत. जेणेकरून अंधारात त्यांचा अपघात होऊ नये. तसेच अपघातुळे मृत्यू होणाऱ्या श्वानाचे प्रमाण कमी होईल. दरवर्षी भटक्या श्वानांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना घडतात, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० श्वानांचे लसीकरण केले.  ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पालिकेमार्फत भटक्या श्वानांचे लसीकरण पुन्हा सुरू व्हावे.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे भटक्या प्राण्यांसाठी असणारे निर्जंतुकीकरण केंद्र जे गेल्या दोन वर्षापासून बंद आहे ते महानगरपालिका प्रशासनाने त्वरित सुरू करावे, जेणेकरून श्वानांची वाढणारी संख्येवर निर्बंध ठेवण्यात येऊ शकेल अशी स्वप्नील महिंद्रकर यांची मागणी आहे.

टॅग्स :thaneठाणेdogकुत्रा