शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० भटक्या श्वानांचे लसीकरण  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 13:05 IST

Thane News: भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. 

ठाणे : ठाणे जिल्ह्यात भटक्या श्वानची दहशत वाढत असल्यामुळे गेल्या वर्षभरात शहरात साडेचार हजार जणांना चावा घेतल्याची नोंद जिल्हा रूग्णालयात आहे. गेल्या काही वर्षांपासून शहरात भटक्या श्वानची संख्या झपाट्याने वाढू लागली असून ही एक मोठी समस्या बनली आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्या वतीने शहरातील ५०० श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण मोहीम राबवण्यात आली. ठाण्यात सुमारे ७० हजार हून अधिक भटके श्वान असून त्यापैकी महापालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने२०१४ ते १९ य वर्षात ५८ हजारहून अधिक श्वानांवर नसबंदी केली आहे. मात्र तरीही शहर परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढत आहे. गेल्या दोन वर्षापासून प्रशासनाच्या वतीने ही मोहीम न घेतल्यामुळे बऱ्याच श्वानांचा रेबीजमुळे मृत्यूदेखील झालेला आहे. भटक्या श्वानांना लस टोचली जात नाही किंवा त्यांना पकडून पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये लस टोचण्यासाठी पुढे येत नाही. ही मोहीम प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात नसल्यामुळे मनसे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या वतीने ही मोहीम  शहरात राबविण्यात आली. ही मोहिम शहरातील वसंत विहार, हिरानंदानी मेडोज, कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर, नौपाडा, जांभळी नाका, घोडबंदर रोड या सर्व परिसरात राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ५०० श्वानांना अँटी रेबीजचे लसीकरण करण्यात आले तसेच लहान पिल्लांना नाईन इन  वन ची लसीकरण देण्यात आली, जेणेकरून त्यांना गॅस्ट्रो व डिस्टेंपर सारखे आजार होणार नाही. 

दरम्यान या मोहिमेअंतर्गत श्वान यांना त्यांच्या गळ्यात रेडियम ची बेल्ट देखील घालण्यात आलेले आहेत. जेणेकरून अंधारात त्यांचा अपघात होऊ नये. तसेच अपघातुळे मृत्यू होणाऱ्या श्वानाचे प्रमाण कमी होईल. दरवर्षी भटक्या श्वानांचा चावा घेतल्याच्या अनेक घटना घडतात, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे ठाणे शहर मनसे व पॉज या संस्थेच्यावतीने ५०० श्वानांचे लसीकरण केले.  ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पालिकेमार्फत भटक्या श्वानांचे लसीकरण पुन्हा सुरू व्हावे.  सर्वात महत्त्वाचं म्हणजे भटक्या प्राण्यांसाठी असणारे निर्जंतुकीकरण केंद्र जे गेल्या दोन वर्षापासून बंद आहे ते महानगरपालिका प्रशासनाने त्वरित सुरू करावे, जेणेकरून श्वानांची वाढणारी संख्येवर निर्बंध ठेवण्यात येऊ शकेल अशी स्वप्नील महिंद्रकर यांची मागणी आहे.

टॅग्स :thaneठाणेdogकुत्रा