शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मास्क वापरल्याने ८० प्रकारच्या आजारांना बसला आळा; मास्क वापरून साथींचा फैलाव टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 23:11 IST

कोविडवर नियंत्रण : मास्क वापरून साथींचा फैलाव टाळा

जितेंद्र कालेकरठाणे :  कोविडसारख्या साथीच्या आजाराचा फैलाव थांबवण्यासाठी नियमित मास्क वापरणे, योग्य सामाजिक अंतर ठेवणे आणि वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. मास्कचा नियमित वापर केल्याने कोविडचाच नव्हे तर अशा सुमारे ८० ते ९० प्रकारच्या आजारांवर नियंत्रण येऊ शकते, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

नियमित मास्कचा वापर केल्यामुळे बाधित रुग्णामार्फत प्रादुर्भाव होणाऱ्या कोविड-१९ या साथीच्या आजारावर नियंत्रण आले आहे. त्यामुळे वेगाने पसरणाऱ्या या आजारापासून अनेकांचा बचाव झाला आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्याही आटोक्यात आहे.  मास्क नसल्यास कोरोनाच नव्हे तर स्वाइन फ्ल्यू तसेच विषाणूचा (व्हायरस) ताप, क्षय आदी आजारांचाही धोका संभवतो. याशिवाय, प्लेग, न्यूमोनिया (फुफ्फुसाचा संसर्ग) असे अनेक आजार असून त्यावर नियंत्रण येत असल्याचे ठाण्यातील एमडी फिजिशियन डॉ. राहुल पांडे यांनी सांगितले. त्यामुळे नियमित मास्क वापरून साथीच्या आजारांचा फैलाव टाळा, असे आवाहनही त्यांनी केले. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात मनपा व पोलीसही कारवाई करत आहेत.

अनेक साथीच्या आजारांना घातला आळा

मास्कच्या वापरामुळे अनेक साथीच्या आजारांसह फंगल इन्फेक्शन नियंत्रणात आले. अनेक दुर्धर आजारही त्यामुळे रोखले गेले. क्षय (टीबी) यासारखा दुर्धर आजार कमी झाला. सर्दी, खोकल्याचे तसेच न्यूमोनियाच्या रुग्णांची संख्याही आटोक्यात आली. दम्याच्या रुग्णांना वायुप्रदूषणाचा तसेच विषारी वायूचाही त्रास होतो. परंतु, मास्कच्या वापरामुळे अशा रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.

विषाणूजन्य आजार

मास्क न लावल्यामुळे धुळीतून पसरणारे आजार, श्वसनाद्वारे होणारे आजार, एच-१ एन-१, इन्फ्ल्युएन्झा, स्वाइन फ्ल्यू, क्षय, सर्दी, खोकला झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून होणाऱ्या कोरोनासह इतर आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेच परदेशातून येणाऱ्या कोरोनाचाही बचाव करण्यासाठी मास्कचा आवर्जून वापर करा, असे आवाहन जाधव यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस