शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी

By सुरेश लोखंडे | Updated: May 22, 2023 15:59 IST

जिल्हा पोलीस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देशमाने यांनी दिली.

ठाणे : जिल्ह्यात अंमली पदार्थांचा वापर, विक्री व साठा रोखण्यासाठी पाेलिसांकडून मुरबाड व शहापूर येथील बंद पडलेल्या औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी करण्यात येत असल्याची माहिती समाेर आलीआहे. त्यावर ठाणे जिल्हाधिकारी अशाेक शिनगारे यांनी जिल्ह्यातील बंद पडलेले कारखाने, गोदामे येथील तपासणी वाढवा, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा व इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करा. याशिवाय अंमली पदार्थांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा तयार करा, असे निर्देशही त्यांनी आज घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.

नार्को कोऑर्डिनेशन सेंटर समिती व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करता जिल्हाधिकारी की, अंमली पदार्थांमुळे तरुणांचे जीवन वाया जात असून त्यांच्या कुटुंबांवर सुद्धा त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अशा पदार्थांना रोखण्याची आपली जबाबदारी आहे. सर्व विभागांनी सतर्क राहून अंमली पदार्थांच्या वाहतूक, विक्री व सेवनावर आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी त्यांनी अधिकार्यांना सांगितले०

जिल्ह्यातील अंमली पदार्था चा शाेध घेण्यासाठी विशेष यंत्रणा तयार करा. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कारखाने, गोदामे आहेत. अशा ठिकाणांचा वापर अंमली पदार्थांच्या निर्मितीसाठी होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशी ठिकाणे शोधून कारवाई करण्यात यावी. उद्योग विभागाकडून जिल्ह्यातील बंद पडलेल्या, वापरात नसलेले कारखाने, गोदामे यांची माहिती घेऊन त्यासाठी सतत लक्ष ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. संभाव्य जागांवर स्थानिक लक्ष ठेवण्याचे निदेर्शही जिल्हाधिकार्यांनी यावे यावेळी अधिकार्यांना दिले.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधिक्षक विक्रम देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, उत्पादन शुल्क अधिक्षक निलेश सांगडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दीपक कुटे, अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त राजेश चौधरी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाली राठोड, वस्तू व सेवाकर अधिक्षक अंबरिश शिंदे, टपाल कार्यालयाच्या सहाय्यक अधिक्षक अमिता कुमारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक सुरेश मनोरे आदी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देशमाने यांनी दिली. जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर येथील औद्योगिक वसाहतींमध्ये तपासणी करण्यात येत असल्याचे या बैठकीत सांगितले. तर बाहेर देशातून येणाऱ्या टपालावर लक्ष ठेवण्यात येत आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती देऊन जनजागृती करण्यात येणार असल्याचे ही देशमाने यांनी या बैठकीत स्पष्ट केले.