शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

आंबेडकर स्मारकाचा निवडणुकीपुरता वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:59 IST

निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली.

कल्याण : निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली. आमच्यात गटबाजी असेल, पण समाजाला हात लावाल तर हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.साहित्य परिषदेची ठाणे जिल्हा शाखा आणि नालंदा बुध्द विहाराने महात्मा फुले साहित्यनगरीत हे एकदिवसीय संमेलन आयोजित केले होते. संविधान यात्रेने त्याची सुरूवात झाली. आंबेडकरांचा अपमान केल्यास आम्ही काय करतो हे रमाबाई आंबडेकरनगर प्रकरणातून सगळ््यांनी पाहिले आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद््घाटनावेळी दिला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, महापौर राजेंद्र देवळेकर,आमदार नरेंद्र पवार, साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, श्रीरंग कुडुक, ललिता गवांदे, नगरसेविका शीतल गायकवाड, महेंद्र गायकवाड, शरद गोेरे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवलीचा बुध्दीबळपट्टू आर्यन जोशी याला आठवले यांच्या हस्ते एक लाखांची मदत देण्यात आली.देशात काळा पैसा वाढू नये असे वाटत असेल, तर दर १० वर्षांनी चलन बदलण्याची सूचना डॉ. आंबेडकरांनी केली होती, याचा दाखला देत आठवले म्हणाले, मोदींनी तो बदल केला. आपल्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. त्याची चिंता करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले.कोपर्डी प्रकरणात मी सर्वप्रथम तेथे गेलो, असे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, मी फाशीच्या विरोधात असलो, तरी कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचा मला आनंद झाला. पण कोपडीच्या निकालानंतर जो आनंद व्यक्त करणाºया समाजाने मराठा तरूणीवर प्रेम केले म्हणून हत्या झालेल्या नितीन आगे या दलित तरूणाच्या खटल्यातील आरोपी सुटल्यावेळी दु:ख व्यक्त केले नाही. याची चर्चा आंबेडकरी संमेलनाच्या व्यासपीठावरुन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नरेंद्र पवार यांनी एनआरसी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले; तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मोहोने येथील रूग्णालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.... तर आठवले मुख्यमंत्री!म्हणून कर्जमाफीला उशीर : जानकरसरकारने शेतकºयांची ३४ कोटीची कर्जे माफ केली. पण ती चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून त्याला वेळ लागत असल्याचा दावा मंत्री महादेव जानकर यांनी केला.संमेलनात पाच ठरावइंदू मिलच्या जागेतील आंबडेकरांचे स्मारक तातडीने उभारावे.मोहनेतील एनआरसीच्या कामगारांना थकीत देणी द्यावी.राज्य सरकारने शेतकºयांना व्याजासह कर्जमाफी देत सातबारा कोरा करावा.मुंबई विद्यापीठात लक्ष घालून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.मोहने येथे सामान्यांसाठी रुग्णालय उभारावे.

 

टॅग्स :thaneठाणे