शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

आंबेडकर स्मारकाचा निवडणुकीपुरता वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 06:59 IST

निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली.

कल्याण : निवडणुका आल्या, की मते मिळविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वापर केला जातो, अशी टीका मोहने येथे आयोजित राज्यस्तरीय आंबेडकर साहित्य संमेलनात शुक्रवारी करण्यात आली. आमच्यात गटबाजी असेल, पण समाजाला हात लावाल तर हे सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.साहित्य परिषदेची ठाणे जिल्हा शाखा आणि नालंदा बुध्द विहाराने महात्मा फुले साहित्यनगरीत हे एकदिवसीय संमेलन आयोजित केले होते. संविधान यात्रेने त्याची सुरूवात झाली. आंबेडकरांचा अपमान केल्यास आम्ही काय करतो हे रमाबाई आंबडेकरनगर प्रकरणातून सगळ््यांनी पाहिले आहे, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद््घाटनावेळी दिला. यावेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष भालचंद्र मुणगेकर, दुग्धविकासमंत्री महादेव जानकर, महापौर राजेंद्र देवळेकर,आमदार नरेंद्र पवार, साहित्यिक जयप्रकाश घुमटकर, श्रीरंग कुडुक, ललिता गवांदे, नगरसेविका शीतल गायकवाड, महेंद्र गायकवाड, शरद गोेरे आदी मान्यवर उपस्थित होते. डोंबिवलीचा बुध्दीबळपट्टू आर्यन जोशी याला आठवले यांच्या हस्ते एक लाखांची मदत देण्यात आली.देशात काळा पैसा वाढू नये असे वाटत असेल, तर दर १० वर्षांनी चलन बदलण्याची सूचना डॉ. आंबेडकरांनी केली होती, याचा दाखला देत आठवले म्हणाले, मोदींनी तो बदल केला. आपल्या आरक्षणाला कोणी हात लावणार नाही. त्याची चिंता करू नका, असे आश्वासन त्यांनी दिले.कोपर्डी प्रकरणात मी सर्वप्रथम तेथे गेलो, असे सांगून डॉ. मुणगेकर म्हणाले, मी फाशीच्या विरोधात असलो, तरी कोपर्डीतील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचा मला आनंद झाला. पण कोपडीच्या निकालानंतर जो आनंद व्यक्त करणाºया समाजाने मराठा तरूणीवर प्रेम केले म्हणून हत्या झालेल्या नितीन आगे या दलित तरूणाच्या खटल्यातील आरोपी सुटल्यावेळी दु:ख व्यक्त केले नाही. याची चर्चा आंबेडकरी संमेलनाच्या व्यासपीठावरुन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.आमदार नरेंद्र पवार यांनी एनआरसी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले; तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी मोहोने येथील रूग्णालयासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.... तर आठवले मुख्यमंत्री!म्हणून कर्जमाफीला उशीर : जानकरसरकारने शेतकºयांची ३४ कोटीची कर्जे माफ केली. पण ती चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून त्याला वेळ लागत असल्याचा दावा मंत्री महादेव जानकर यांनी केला.संमेलनात पाच ठरावइंदू मिलच्या जागेतील आंबडेकरांचे स्मारक तातडीने उभारावे.मोहनेतील एनआरसीच्या कामगारांना थकीत देणी द्यावी.राज्य सरकारने शेतकºयांना व्याजासह कर्जमाफी देत सातबारा कोरा करावा.मुंबई विद्यापीठात लक्ष घालून विद्यार्थ्याना दिलासा द्यावा.मोहने येथे सामान्यांसाठी रुग्णालय उभारावे.

 

टॅग्स :thaneठाणे