शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
5
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
6
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
7
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
8
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
9
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
10
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
11
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
13
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
14
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
15
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
16
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
17
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
18
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
19
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
20
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

उर्दू अकादमी बरखास्तीची मागणी, साहित्यिकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:58 IST

उर्दू आणि मराठी साहित्याची देवाणघेवाण व्हावी तसेच उर्दू साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने उर्दू अकादमीची स्थापना केली असली, तरी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून अकादमीचे कामकाज थंड पडले आहे. उर्दू साहित्यिकांना त्यात स्थान दिले जात नसल्याने अकादमी बरखास्त करण्याची व तिचे पुनर्गठन करण्याची मागणी उर्दू साहित्यिकांकडून करण्यात आली आहे.

- मुरलीधर भवारकल्याण : उर्दू आणि मराठी साहित्याची देवाणघेवाण व्हावी तसेच उर्दू साहित्यनिर्मिती व्हावी, या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने उर्दू अकादमीची स्थापना केली असली, तरी राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार सत्तारूढ झाल्यापासून अकादमीचे कामकाज थंड पडले आहे. उर्दू साहित्यिकांना त्यात स्थान दिले जात नसल्याने अकादमी बरखास्त करण्याची व तिचे पुनर्गठन करण्याची मागणी उर्दू साहित्यिकांकडून करण्यात आली आहे. याकरिता, भिवंडीतील साहित्यिक एकवटले असून त्यांनी ही मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भिवंडीतील ज्येष्ठ उर्दू लेखक एम. मुबीन यांनी ही मोहीम छेडली आहे. तिला खलीकूज्जम नुसरत, कवी, शब्बीर अहमद शाद, शकील अहमद शकील, पत्रकार खान गर्व आलाम, शारीफ अन्सारी आणि एम. आबूबकर यांनी पाठिंबा दिला आहे. उर्दू अकादमी गेल्या ३० वर्षांपासून कार्यरत आहे. या अकादमीला वर्षाकाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली जाते. प्रत्यक्षात केवळ ८० लाख रुपयांचा निधी अकादमीला प्राप्त होतो. वर्षभरात उर्दू भाषा वर्ग, उर्दू साहित्याचा अनुवाद, उर्दू भाषेतील कवी व साहित्यांची पुस्तक छपाईअसे उपक्रम राबवणे अपेक्षित असते. तीन वर्षांपूर्वीपर्यंत अकादमीचे कामकाज योग्य प्रकारे सुरू होते. गेल्या तीन वर्षांपासून काम थंडावले आहे. सरकारकडून ८० लाखांचा निधी मिळतो. त्यापैकी ३० ते ४० लाख रुपये खर्च केले जातात. भरीव उपक्रम न राबवल्याने उर्वरित ४० लाखांचा निधी सरकारला परत केला जातो, याकडे उर्दू साहित्यिकांनी लक्ष वेधले.काही महिन्यांपूर्वी अकादमीचे अध्यक्ष अब्दुल रौफ यांचे निधन झाले. त्यांची जागा अद्याप सरकारने भरलेली नाही.अकादमीचे कार्यालय मुंबईतील ओल्ड कस्टम हाउसनजीक आहे. त्याठिकाणी उर्दू अकादमीसह हिंदी, सिंधी, गुजराती भाषांच्या अकादमीची कार्यालये आहेत. उर्दू अकादमीकरिता स्वतंत्र, सुसज्ज कार्यालय नाही. तसेच पुरेसा कर्मचारीवर्ग नाही. हिंदी अकादमीचे काम सुरळीत सुरू आहे. मात्र, उर्दू अकादमीचे काम थंडावले आहे. उर्दू भाषा महाराष्ट्रात मुंबईसह भिवंडी, मालेगाव, पुणे, औरंगाबाद याठिकाणी जास्त बोलली जाते. या भाषेतील जाणकार साहित्यिकांचे वास्तव्य उपरोक्त चार शहरांत जास्त आहे.या शहरातील उर्दू साहित्यिकांना अकादमीत प्रतिनिधित्व दिलेले नाही. हा उर्दू साहित्यिकांवरील अन्याय आहे. त्यांना डावलण्यात आलेले आहे. अकादमीतर्फे उर्दू भाषा साहित्याचे एक मासिक प्रसिद्ध केले जाते. त्याचे वर्षातून चार अंक प्रसिद्ध होणे अपेक्षित आहे. त्याचे केवळ दोनच अंक प्रसिद्ध झालेले आहे. निधी असताना ही कामे केली जात नाही, असे साहित्यिकांचे म्हणणे आहे.काय आहेत साहित्यिकांच्या प्रमुख मागण्याच् प्रत्येक भागातील उर्दू साहित्यिक व पत्रकारांना प्रतिनिधित्व मिळावे.च्उर्दू व मराठी साहित्यिकांचे एकत्रित कार्यक्रम पुण्याला व्हावेत.च् एक स्वतंत्र विभागसुरू करून सरकारी आदेश उर्दू भाषेत भाषांतरित करून ते लोकांपर्यंत पोहोचवण्यात यावेत.च्मराठी भाषेचा इतिहास उर्दूत भाषांतरित करावा.च् उर्दू साहित्यिकांच्या पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान द्यावे.च् उर्दू साहित्यिकांच्या पुरस्कारप्राप्त पुस्तकांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात यावी.च्राज्य सरकारकडून बांधण्यात येणारे उर्दू घर उर्दू भाषक जिल्ह्यात बांधले जावे. नागपूर, औरंगाबाद आणि मालेगाव अकादमींची शाखा सुरू करावी.च्उर्दू साहित्यिकांसाठी पेन्शन योजना सुरू करावी.च्पाठ्यपुस्तकांचा अनुवाद करण्यासाठी अनुवाद विभाग सुरू करण्यात यावा.च्उर्दू साहित्यिकांचे वर्षातून एकदा राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले जावे.रस्त्यावर अथवा न्यायालयातसंघर्षाचा इशाराआपल्या मागण्यांचा विचार केला नाही, तर साहित्यिक गांधीवादी पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करतील. सरकारने त्याची दखल घेतली नाहीतर न्यायालयात याचिका दाखल करू, असा इशारा उर्दू साहित्यिकांनी दिला आहे. उर्दू भाषेवर भाजपा, शिवसेना सत्तेत असताना होणारा अन्याय हा निव्वळ योगायोग नसल्याचे काही साहित्यिकांनी ‘लोकमत’ला खासगीत सांगितले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र