शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

‘पेसा’च्या ५६.२४ कोटींतून उत्थान; आदिवासींसाठी विकासकामे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:09 IST

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.पेसा ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील आदिवासीपाड्यांच्या उत्थानासाठी आदिवासी विकास विभागाकडून हे दरडोई लोकसंख्येनुसार अनुदान देण्यात येते. यानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाने २१४ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून हे अनुदान ठाणे-पालघर जिल्ह्यांतील पेसा ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.यात ठाणे जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ४०४ आदिवासीपाड्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या १ लाख ७९ हजार ५६२ लोकसंख्येकरिता ८ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासीपाड्यांत राहणाºया ९ लाख ७९ हजार ५६३ लोकसंख्येकरिता ४७ कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये दरडोई ४८५.१६ रुपयांप्रमाणे देण्यात आले आहेत. या माध्यमाचा आदिवासींना फायदा होणार आहे.तालुकानिहाय आदिवासी गावपाडे- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १०१ आदिवासी गावपाडे, भिवंडीच्या ३९ ग्रामपंचायतींच्याक्षेत्रातील ७२ आणि शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २८० आदिवासी गावपाड्यांचा यात समावेश आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७७ आदिवासी गावपाडे, तलासरीच्या ४१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ६१, पालघरच्या१०८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७१, वसईच्या ६४ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ७६, मोखाड्याच्या २७ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ५६, जव्हारच्या ५० ग्रामपंचायतींतील १०८, वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींतील १६८ आणि विक्रमगड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ९३ अशा ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासी गावपाड्यांचा समावेश आहे.लोकसंख्येचे प्रमाणयात ठाणे जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या ४ लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या १ लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३९.५७ टक्के आहे, तर पालघर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात ९ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७३.९८ टक्के आहे.

टॅग्स :thaneठाणे