शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

‘पेसा’च्या ५६.२४ कोटींतून उत्थान; आदिवासींसाठी विकासकामे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 02:09 IST

राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.

- नारायण जाधवठाणे : राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील अर्थात, आदिवासी ग्रामपंचायतींना पेसा कायद्यांतर्गत ५ टक्के निधीतून ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील ७०८ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील १,३१३ आदिवासी गावपाड्यांना ५६ कोटी २३ लाख ६५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. यातून त्या गावपाड्यांतील आदिवासींसाठी विकासकामे करणे शक्य होणार आहे.पेसा ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील आदिवासीपाड्यांच्या उत्थानासाठी आदिवासी विकास विभागाकडून हे दरडोई लोकसंख्येनुसार अनुदान देण्यात येते. यानुसार, २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी आदिवासी विकास विभागाने २१४ कोटी ३० लाख ८७ हजार रुपयांची तरतूद केली होती. यातून हे अनुदान ठाणे-पालघर जिल्ह्यांतील पेसा ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे.यात ठाणे जिल्ह्यातील २०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ४०४ आदिवासीपाड्यांच्या क्षेत्रात राहणाऱ्या १ लाख ७९ हजार ५६२ लोकसंख्येकरिता ८ कोटी ७१ लाख १७ हजार रुपये देण्यात आले आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासीपाड्यांत राहणाºया ९ लाख ७९ हजार ५६३ लोकसंख्येकरिता ४७ कोटी ५२ लाख ४८ हजार रुपये दरडोई ४८५.१६ रुपयांप्रमाणे देण्यात आले आहेत. या माध्यमाचा आदिवासींना फायदा होणार आहे.तालुकानिहाय आदिवासी गावपाडे- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १०१ आदिवासी गावपाडे, भिवंडीच्या ३९ ग्रामपंचायतींच्याक्षेत्रातील ७२ आणि शहापूर तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील २८० आदिवासी गावपाड्यांचा यात समावेश आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७७ आदिवासी गावपाडे, तलासरीच्या ४१ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ६१, पालघरच्या१०८ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील १७१, वसईच्या ६४ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ७६, मोखाड्याच्या २७ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ५६, जव्हारच्या ५० ग्रामपंचायतींतील १०८, वाड्यातील ८४ ग्रामपंचायतींतील १६८ आणि विक्रमगड तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील ९३ अशा ५०४ ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील ९१० आदिवासी गावपाड्यांचा समावेश आहे.लोकसंख्येचे प्रमाणयात ठाणे जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या ४ लाख ५३ हजार ७६६ असून, त्यात आदिवासींची लोकसंख्या १ लाख ७९ हजार ५६२ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ३९.५७ टक्के आहे, तर पालघर जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींची एकूण लोकसंख्या १३ लाख २४ हजार ५७ असून, त्यात ९ लाख ७९ हजार ५६३ इतकी आहे. टक्केवारीत हे प्रमाण ७३.९८ टक्के आहे.

टॅग्स :thaneठाणे