शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील अवेळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:35 IST

कडधान्ये, पेंढा व विटांचे नुकसान ; आरोग्य धोक्यात येण्याची भीती

वाडा : पालघरमधील वाडा तालुक्यासह इतरही तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम झालेल्या पावसाचा रविवारी सकाळी मात्र जोर थोडा वाढला. या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक तर खराब झाले, परंतु गवत, पावली भिजल्याने तेही वाया गेले. जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकूणच अवेळी पावसाने शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.सध्या रब्बी हंगाम असून हरभरा, मूग, वाल यासारख्या पिकांवर या अवेळी पावसाचा दुष्परिणाम होणार आहे. तर गवार, मेथी, वांगा, मुळा, मिरची आदी लागवड केलेला भाजीपाला वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच झोडणी करून विक्रीसाठी गंजी रचून ठेवलेला पेंढा या पावसात काळा पडल्याने तो व्यावसायिक सहसा खरेदी करत नाहीत. नुकत्याच सुरू झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचेही अवेळी पावसाने नुकसान होणार असून कच्च्या विटा विरघळून जाण्याची भीती आहे.गेले तीन दिवस वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप व इतर साथींचे आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आधीच कोरोनामुळे घाबरलेली जनता या पावसामुळे बदललेल्या वातावरणाने अधिक चिंताग्रस्त झाली आहे.कासात वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसानकासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीट उद्योजक, पावली व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात ढगाळ वातावरण असून पाऊस रिमझिम स्वरूपात पडत आहेत. त्यामुळे भाजीपाला लागवड व इतर पिकांवर त्याचा परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. कासा येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे गवत पावली विक्रीचा व्यवसाय अनेक जण करतात. मात्र पावसामुळे गवत पावली भिजली असून पाऊस चालू राहिला तर ती कुजण्याची शक्यता व्यावसायिक सुनील पाटील यांनी व्यक्त केली. यामुळे गाई-म्हशींच्या उन्हाळ्यातील चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. दुसरीकडे वीट व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साधारण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. विटा पाडण्याचे काम आताच सुरू केल्याने फडावर उभ्या असणाऱ्या विटा भाजण्याच्या आधीच भिजून गेल्या आहेत, तर काही फड कोसळून पडला आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही विटांवरील नक्षीचे कामही तुटून गेले आहे.कासा येथे भाजीपाला लागवड त्याचप्रमाणे कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे देऊन उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. भाजीपाला व मिरची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. मात्र अवेळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे शेतकरी मंगेश केदार यांनी सांगितले. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.