शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यातील अवेळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:35 IST

कडधान्ये, पेंढा व विटांचे नुकसान ; आरोग्य धोक्यात येण्याची भीती

वाडा : पालघरमधील वाडा तालुक्यासह इतरही तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम झालेल्या पावसाचा रविवारी सकाळी मात्र जोर थोडा वाढला. या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे पीक तर खराब झाले, परंतु गवत, पावली भिजल्याने तेही वाया गेले. जिल्ह्यातील वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकूणच अवेळी पावसाने शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.सध्या रब्बी हंगाम असून हरभरा, मूग, वाल यासारख्या पिकांवर या अवेळी पावसाचा दुष्परिणाम होणार आहे. तर गवार, मेथी, वांगा, मुळा, मिरची आदी लागवड केलेला भाजीपाला वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच झोडणी करून विक्रीसाठी गंजी रचून ठेवलेला पेंढा या पावसात काळा पडल्याने तो व्यावसायिक सहसा खरेदी करत नाहीत. नुकत्याच सुरू झालेल्या वीटभट्टी व्यावसायिकांचेही अवेळी पावसाने नुकसान होणार असून कच्च्या विटा विरघळून जाण्याची भीती आहे.गेले तीन दिवस वातावरणातील सततच्या बदलामुळे सर्दी, खोकला, ताप व इतर साथींचे आजार बळावण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आधीच कोरोनामुळे घाबरलेली जनता या पावसामुळे बदललेल्या वातावरणाने अधिक चिंताग्रस्त झाली आहे.कासात वीटभट्टी व्यावसायिकांचे नुकसानकासा : डहाणू तालुक्यातील कासा भागात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे वीट उद्योजक, पावली व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून रोगराई पसरण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यात ढगाळ वातावरण असून पाऊस रिमझिम स्वरूपात पडत आहेत. त्यामुळे भाजीपाला लागवड व इतर पिकांवर त्याचा परिणाम होऊन मोठे नुकसान होणार आहे. कासा येथे मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. त्यामुळे गवत पावली विक्रीचा व्यवसाय अनेक जण करतात. मात्र पावसामुळे गवत पावली भिजली असून पाऊस चालू राहिला तर ती कुजण्याची शक्यता व्यावसायिक सुनील पाटील यांनी व्यक्त केली. यामुळे गाई-म्हशींच्या उन्हाळ्यातील चाऱ्याचा प्रश्नही निर्माण होणार आहे. दुसरीकडे वीट व्यावसायिकांचेही नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून साधारण व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. विटा पाडण्याचे काम आताच सुरू केल्याने फडावर उभ्या असणाऱ्या विटा भाजण्याच्या आधीच भिजून गेल्या आहेत, तर काही फड कोसळून पडला आहे. त्यामुळे वीट व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही विटांवरील नक्षीचे कामही तुटून गेले आहे.कासा येथे भाजीपाला लागवड त्याचप्रमाणे कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. चालू वर्षी कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे देऊन उत्पादन वाढवण्यासाठी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली होती. भाजीपाला व मिरची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते. मात्र अवेळी पाऊस आणि खराब हवामान यामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचे शेतकरी मंगेश केदार यांनी सांगितले. परिणामी उत्पादनात घट होण्याची शक्यता असून शेतीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.