शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

मनसेमुळे ठाणे, कल्याणमध्ये शिंदेसेनेत अस्वस्थता, विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतला धसका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 12:56 IST

मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे.

- अजित मांडके / अनिकेत घमंडी ठाणे / डोंबिवली : महायुतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एन्ट्रीमुळे ठाणे, डोंबिवली, कल्याण या शहरांत शिवसेनेच्या शिंदे गटात पडसाद उमटू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघात मनसेला थोडी थोडकी नव्हे, तर एक लाख ७० हजार मते मिळाली होती. ही मते महायुतीच्या उमेदवारांच्या पारड्यात पडणार का, याबाबत कुतूहल आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसेचे राजू पाटील यांना मागील वेळी यश मिळाले. या मतदारसंघातून यंदा विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना ती जागा महायुतीच्या वाटपात मनसेला जाणार, याची कल्पना आल्याने त्यांच्यातही अस्वस्थता आहे.

ठाणे लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत मनसेचे उमेदवार अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती.  त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या मतांत वाढ झाली. २०१९ मध्ये मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरात अविनाश जाधव यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीत मनसेने ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रचार केल्याने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेला खुलेआम मदत केली होती. शिवसेनेच्या काही स्थानिक नेत्यांनी युतीचा धर्म मोडत मनसेला छुपी मदत केल्याची चर्चा होती. त्यामुळेच जाधव यांना या मतदारसंघात ७२ हजार ८७४ मते मिळाली होती. 

ठाणे विधानसभेत दुसऱ्या क्रमांकाची मते २०१९ च्या विधानसभेत ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजिवडा, ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघातून मनसेला १ लाख ७० हजारांच्या आसपास मते मिळाली. ठाणे विधानसभा मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.  कोपरी-पाचपाखाडी आणि ओवळा-माजिवडा आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकाची मते मनसेला मिळाली होती. मीरा-भाईंदर आणि ऐरोली मतदारसंघात मनसे पिछाडीवर होती. 

कल्याण ग्रामीणवरून...कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेचे आमदार राजू पाटील मागीलवेळी विजयी झाले. शिवसेनेचे शिंदे गटाचे शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना पदाधिकारी, तालुका स्तरावरील नेते येत्या निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची स्वप्ने पाहत होते. मनसे महायुतीत आल्याने ती जागा मनसेला सोडल्यास आपली आमदारकीची स्वप्ने धुळीस मिळणार, या कल्पनेने शिवसेनेत अस्वस्थता आहे.

शिवसेनेत हे आहेत इच्छुकरमेश म्हात्रे, राजेश मोरे, रमाकांत मढवी, महेश पाटील, दीपेश म्हात्रे, राजेश कदम यांच्यासह अनेक जण कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. विधानसभेलाही मनसे महायुतीत राहिल्यास त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर बोळा फिरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेkalyanकल्याणmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४