शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?

By admin | Updated: June 30, 2017 02:41 IST

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. आता या केंद्राचा शुभारंभ जुलैमध्ये होणार आहे. विद्यापीठाकडून शुभारंभाची आश्वासने पाळली जात नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कल्याण उपकेंद्राची इमारत बांधून झाल्याने ते सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंकडे माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगले यांनी केली होती. या मागणीपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यावर, उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जून संपत आला तरी हे केंद्र सुरू झालेले नाही. कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत, देवळेकर यांना विचारले असता, त्यांनी कुलगुरूंना फोन लावला. मात्र, रेंजअभावी त्यांच्याशी संभाषण झाले नाही.उपकेंद्राचा मुद्दा २००५ पासून गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रा. इंगळे हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. विद्यापीठाने ठाण्यातील उपकेंद्र सुरूही केले. कल्याणच्या उपकेंद्राच्या उभारणीत विद्यापीठाकडूनच दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यापीठाने उपकेंद्रासाठी सुरुवातीला एक कोटीची तरतूद केली होती. महापालिकेने उपकेंद्रासाठी गांधारे येथील जागा नाममात्र भाडेतत्त्वावर दिली. त्याच्या बदल्यात केवळ एक रुपया घेतला होता. जागा दिल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने शिवसेना सदस्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर, उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. हे उपकेंद्र दोन टप्प्यांत बांधले जाणार आहे. दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी २० कोटी याप्रमाणे ४० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करून तळ अधिक एक मजला अशी २५ खोल्यांची इमारत उभी राहिली आहे. ही इमारत शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. याठिकाणी एम-टेकची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाचे केंद्र सुरू केले जाणार आहे. कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भागांतील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याऐवजी कल्याणमध्ये ही सुविधा मिळणार आहे. जूनमध्ये हे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे निकाल लागले आहेत. अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणचे उपकेंद्र उपयुक्त ठरले असते. आता प्रवेशप्रक्रिया संपल्यावर उपकेंद्राचा शुभारंभ होऊन फायदा होईल का, याविषयी साशंकता आहे.