शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?

By admin | Updated: June 30, 2017 02:41 IST

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. आता या केंद्राचा शुभारंभ जुलैमध्ये होणार आहे. विद्यापीठाकडून शुभारंभाची आश्वासने पाळली जात नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कल्याण उपकेंद्राची इमारत बांधून झाल्याने ते सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंकडे माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगले यांनी केली होती. या मागणीपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यावर, उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जून संपत आला तरी हे केंद्र सुरू झालेले नाही. कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत, देवळेकर यांना विचारले असता, त्यांनी कुलगुरूंना फोन लावला. मात्र, रेंजअभावी त्यांच्याशी संभाषण झाले नाही.उपकेंद्राचा मुद्दा २००५ पासून गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रा. इंगळे हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. विद्यापीठाने ठाण्यातील उपकेंद्र सुरूही केले. कल्याणच्या उपकेंद्राच्या उभारणीत विद्यापीठाकडूनच दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यापीठाने उपकेंद्रासाठी सुरुवातीला एक कोटीची तरतूद केली होती. महापालिकेने उपकेंद्रासाठी गांधारे येथील जागा नाममात्र भाडेतत्त्वावर दिली. त्याच्या बदल्यात केवळ एक रुपया घेतला होता. जागा दिल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने शिवसेना सदस्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर, उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. हे उपकेंद्र दोन टप्प्यांत बांधले जाणार आहे. दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी २० कोटी याप्रमाणे ४० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करून तळ अधिक एक मजला अशी २५ खोल्यांची इमारत उभी राहिली आहे. ही इमारत शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. याठिकाणी एम-टेकची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाचे केंद्र सुरू केले जाणार आहे. कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भागांतील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याऐवजी कल्याणमध्ये ही सुविधा मिळणार आहे. जूनमध्ये हे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे निकाल लागले आहेत. अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणचे उपकेंद्र उपयुक्त ठरले असते. आता प्रवेशप्रक्रिया संपल्यावर उपकेंद्राचा शुभारंभ होऊन फायदा होईल का, याविषयी साशंकता आहे.