शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

विद्यापीठाच्या उपकेंद्राला जुलैचा मुहूर्त?

By admin | Updated: June 30, 2017 02:41 IST

मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुंबई विद्यापीठाच्या कल्याण येथील उपकेंद्राची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. हे केंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन कुलगुरूंनी दिले होते. मात्र, काही कारणास्तव ते अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. आता या केंद्राचा शुभारंभ जुलैमध्ये होणार आहे. विद्यापीठाकडून शुभारंभाची आश्वासने पाळली जात नसल्याची टीका विद्यार्थी संघटनांनी केली आहे. कल्याण उपकेंद्राची इमारत बांधून झाल्याने ते सुरू करावे, अशी मागणी कुलगुरूंकडे माजी सिनेट सदस्य प्रा. प्रशांत इंगले यांनी केली होती. या मागणीपाठोपाठ महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही कुलगुरूंची भेट घेतली होती. त्यावर, उपकेंद्र विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये खुले करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जून संपत आला तरी हे केंद्र सुरू झालेले नाही. कुलगुरूंचे आश्वासन हवेत विरले आहे. याबाबत, देवळेकर यांना विचारले असता, त्यांनी कुलगुरूंना फोन लावला. मात्र, रेंजअभावी त्यांच्याशी संभाषण झाले नाही.उपकेंद्राचा मुद्दा २००५ पासून गाजत आहे. २०१० मध्ये उपकेंद्राच्या जागेचे भूमिपूजन तत्कालीन उच्च शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते झाले. त्यानंतरही कामाला मुहूर्त मिळालेला नाही. जागेचा प्रश्न उपस्थित झाला होता. प्रा. इंगळे हे गेली अनेक वर्षे पाठपुरावा करत आहे. विद्यापीठाने ठाण्यातील उपकेंद्र सुरूही केले. कल्याणच्या उपकेंद्राच्या उभारणीत विद्यापीठाकडूनच दिरंगाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विद्यापीठाने उपकेंद्रासाठी सुरुवातीला एक कोटीची तरतूद केली होती. महापालिकेने उपकेंद्रासाठी गांधारे येथील जागा नाममात्र भाडेतत्त्वावर दिली. त्याच्या बदल्यात केवळ एक रुपया घेतला होता. जागा दिल्यानंतरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नसल्याने शिवसेना सदस्यांनी उपोषण केले होते. त्यानंतर, उपकेंद्राच्या कामाला सुरुवात झाली. हे उपकेंद्र दोन टप्प्यांत बांधले जाणार आहे. दोन टप्प्यांसाठी प्रत्येकी २० कोटी याप्रमाणे ४० कोटींची तरतूद केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २० कोटी रुपये खर्च करून तळ अधिक एक मजला अशी २५ खोल्यांची इमारत उभी राहिली आहे. ही इमारत शुभारंभाच्या प्रतीक्षेत आहे. याठिकाणी एम-टेकची परीक्षा घेणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर दूरस्थ शिक्षणाचे केंद्र सुरू केले जाणार आहे. कल्याण ते कर्जत, कल्याण ते कसारा या भागांतील विद्यार्थ्यांना मुंबईला जाण्याऐवजी कल्याणमध्ये ही सुविधा मिळणार आहे. जूनमध्ये हे केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. बारावीचे निकाल लागले आहेत. अभ्यासक्रमांच्या विविध शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणचे उपकेंद्र उपयुक्त ठरले असते. आता प्रवेशप्रक्रिया संपल्यावर उपकेंद्राचा शुभारंभ होऊन फायदा होईल का, याविषयी साशंकता आहे.