शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रवेशाच्या "नीट" परीक्षेत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीयमंत्र्यांचा दिलासा

By नितीन पंडित | Updated: September 6, 2022 17:58 IST

या परीक्षेचा निकाल ३१ ऑगष्ट रोजी जाहीर झाला.परंतु त्यामध्ये या परीक्षा केंद्रावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही.व उत्तरपत्रिकाहि पाहण्यास उपलब्ध झाली नाही.

भिवंडी : वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर नीट परीक्षा घेतली जाते परंतु या परीक्षेतील तांत्रिक चुकीमुळे शेकडो विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न भंगले असल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपली कैफियत केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासमोर मांडली. त्यावेळी, त्यांनी तातडीने पावले उचलत या बाबत मार्ग काढल्याने नुकसान झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण दिसत असल्याने मंगळवारी पालकांसह विद्यार्थ्यांनी मंत्री पाटील यांचे आभार मानले.        

१७ जुलै रोजी नीटची परीक्षा देशभरात पार पडली.या वेळी ठाणे येथील आनंद विश्व गुरुकुल या परीक्षा केंद्रासह काही परीक्षा केंद्रांवर इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका यांचे संच दिले.विद्यार्थ्यांनी या गोंधळा बाबत तक्रार केल्या नंतर हिंदी प्रश्नसंच काढून घेत इंग्रजी प्रश्नसंच दिले गेले परंतु उत्तरपत्रिका संच हिंदीच ठेवल्याने दोन्हीवरील अनुक्रमणिका जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा पुन्हा गोंधळ झाल्याने ऑप्टिकल मार्क रेकग्निशन ओएमआर जुळत नसल्याने विद्यार्थ्यांचा वेळ वाया गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन वैद्यकीय प्रवेशा पासून ते विद्यार्थी मुकणार होते.असे असतानाही सायंकाळी ८ वाजे पर्यंत मुलांना परीक्षा केंद्रावर थांबवून त्यांच्या कडून परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असून कोणताही त्रास झाला नाही असे लिहून घेण्यात आले होते.          

या परीक्षेचा निकाल ३१ ऑगष्ट रोजी जाहीर झाला.परंतु त्यामध्ये या परीक्षा केंद्रावरील ४०० हुन अधिक विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर झाला नाही.व उत्तरपत्रिकाहि पाहण्यास उपलब्ध झाली नाही. त्यामुळे भयग्रस्त झालेल्या पालकांपैकी अलका पालकर यांनी केंद्रीय पंचयातराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधून न्याय मिळवून देण्याची मागणी केली.कपिल पाटील यांनी तात्काळ नीट परीक्षेचे प्रमुख संचालक मणिपूर येथील विनीत जोशी यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांचा प्रश्न त्यांच्या समोर मांडला व त्या मधून मार्ग काढण्याची मागणी करीत पाठपुरावा केल्या नंतर नीट परीक्षा मंडळाने प्रथम त्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा प्रस्ताव दिला.परंतु वेळे अभावी तो दिलेला प्रस्ताव व्यवहार्य नसल्याने अखेर विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे मार्क व आताचे मार्क यापैकी अधिक असलेले मार्क ग्राह्य धरण्याचा बेस्ट ऑफ टू अथवा पुनः परीक्षा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण दिसून येत आहे.त्यामुळे मंत्री कपिल पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याची प्रतिक्रिया परीक्षार्थी रौनक राजेंद्रन व पालक अलका पालकर यांनी दिली आहे.

मी काही वेगळं केलं नसून अन्याय झालेले पालक व विद्यार्थी वेळेत माझ्याकडे आल्याने मी त्यासाठी संबंधित यंत्रणेकडे हा प्रश्न लावून धरला.वेगळं काही नाही केलं पण लोकप्रतिनिधी म्हणून जे करणं शक्य होत ते केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान टाळण्यात यशस्वी झालो याचे समाधान आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालdoctorडॉक्टरthaneठाणेbhiwandiभिवंडी