शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

उल्हासनगरातील शांतीप्रकाश आश्रमातील गौशाळेत रमले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर

By सदानंद नाईक | Updated: June 4, 2023 16:59 IST

उल्हासनगरच्या एकदिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी सिंधी समाजाचे पवित्र स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट देऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.

उल्हासनगर : एकदिवसीय शहर दौऱ्यात केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट दिल्यावर, त्यांनी गौशाळेला भेट दिली. यावेळी ते गौशाळेत रमल्याचे दिसले. त्यांच्या सोबत देवप्रकाश महाराज, आमदार कुमार आयलानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्ष पदाधिकारी उपस्थित होते. 

उल्हासनगरच्या एकदिवसीय दौऱ्यावर असलेले केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी सिंधी समाजाचे पवित्र स्वामी शांतीप्रकाश आश्रमाला भेट देऊन, उपस्थितांना मार्गदर्शन केले. आश्रमाचे प्रमुख देवप्रकाश महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांनी गौशाळेला भेट दिली. त्यानंतर साई वशनशाह दरबाराला भेट देऊन, दरबारच्या ट्रस्टी सोबत विविध समस्या बाबत चर्चा केली. सिंधी समाजाचे धार्मिकस्थळ असलेले चालिया मंदिराला भेट देऊन, मंदिरातील सतत ७३ वर्ष तेवणाऱ्या ज्योतीचे दर्शन घेतले. रामरक्षा हॉस्पिटल ट्रस्टी सोबत बैठक झाल्यावर, त्यांनी सिंधू युथ सर्कलला भेट देऊन सिंधी संस्कृती बाबत माहिती जाणून घेतली. त्यांनी सभेवर भर न देता सिंधी समाजाच्या पवित्रस्थळाला भेट देऊन दुपारी भाजप जिल्हा कार्यालयाचे उदघाटन ठाकूर यांच्या हस्ते झाले. 

कल्याण लोकसभेवर लक्ष केंद्रित करून अनुराग ठाकूर दौरा करीत असल्याचे शहरात बोलले जात असलेतरी, त्यांचा एकदिवसीय दौऱ्यात त्यांनी सिंधी समाजाच्या धार्मिकस्थळाला भेट देण्याचा कार्यक्रम असल्याचे उघड झाले. गेल्या दोन दौऱ्यात शहर विकासावरून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. तसेच विकास कामासाठी निधीचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांनी बोलणे टाळल्याचे एकून चित्र होते. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी टॉउन हॉल मध्ये शहरातील विविध व्यापारी संघटनेच्या सोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या समस्या एकून सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांच्या दौऱ्यावेळी आमदार कुमार आयलानी, शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, प्रदीप रामचंदानी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

शहरविकासाचा पडला विसर केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर यांनी गेल्या दोऱ्यात शहरातील खड्डे भरण्याचे आश्वासन दिले होते. तसेच विविध समस्याचा आढावा घेऊन, त्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या रविवारच्या दौऱ्यात या सर्वांचा विसर पडल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Anurag Thakurअनुराग ठाकुर