शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतीसाठी अखंड वीज हा मूलभूत अधिकार; उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 05:15 IST

वीज कापल्याने शेतकऱ्यांनी केली होती याचिका

खुशालचंद बाहेतीअलाहाबाद : वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे शेतीला पाणी देण्यात अडचणी येतात आणि हे घटनेच्या अनुच्छेद १९ अन्वये दिलेल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश गोविंद माथूर आणि सौरभ शामशेरी यांच्या खंडपीठाने दिला आहे.

उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील बेछुरा गावच्या लाभक्षेत्रातील ट्युबवेलचे वीज कनेक्शन कापण्यात आले होते. याविरुद्ध १५ शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. वीज खंडित करणे हे बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. यामुळे पिकांना पाणी देता येत नाही व याचा परिणाम शेती उत्पादनावर होतो, असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात मांडला. १८ फेब्रुवारी २०२० रोजी उच्च न्यायालयाने वीज मंडळास म्हणणे मांडण्यास सांगितले. यावेळी वीज मंडळाने वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यात आल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनीही हे मान्य केले. मात्र प्रशासन वारंवार वीज कनेक्शन तोडते आणि ट्यूबवेलची कोणतीच देखरेख करत नाही. सर्व शेती ट्युबवेलवर अवलंबून आहे, असे सांगितले.

हा तर मूलभूत हक्कांचा भंगलाभक्षेत्रात शेतीला पाणी देण्यात येणारे अडथळे हे शेतकऱ्यांना घटनेने दिलेल्या अनुच्छेद १९ अन्वये (मुक्त व्यवसायाचे स्वातंत्र्य) या मूलभूत हक्काचा भंग आहे, असे मत व्यक्त केले. शासनाच्या जबाबदार यंत्रणांनी साधारण परिस्थितीत वीज तोडण्यात येणार नाही आणि ट्युबवेलची देखभाल व्यवस्थित होईल याकडे लक्ष द्यावे, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले.