शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

By सुरेश लोखंडे | Updated: March 18, 2023 13:26 IST

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाणे - कांद्याला व शेती मालाला हमी भाव मिळवण्यासाठी नाशिक येथून मंत्रालयावर काढलेला किसान सभेच्या लॉंग मार्च हा शेतकऱ्यांचा मोर्चा २ दिवसापासून शहापूर तालुक्यातील वाशिंदमध्ये आडवण्यात आलेला आहे.  या शेतकऱ्यांमधील पुंडलिक आंबो जाधव (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री  दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले आहे. या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य शासनाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मोर्चेकरांची घटनास्थळी भेट घेतली. मोर्चा मागे घेतल्याने आता सर्व शेतकरी रेल्वेने घरी जायला निघाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

या मोर्चातील दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेत ले. त्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन दिले. यास अनुसरून हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्च मोर्चा चा आजचा सातवा दिवस आहे. मुंबई, ठाण्यात आगमन होण्यापूर्वी हा मोर्चा शहापूरच्या वासिंद येथील मैदानावर दोन दिवसांपासून थांबवून ठेवलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थ संक्लपीय अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडकण्यासाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या मुंबई,ठाणे महानगरातील वाहतुकीस अन्यही जनजीवनावर हा हजारो शेतकर्यांचा मोर्चा परिणाम करणारा ठरत असल्यामुळे त्यास वासिंद येथे अडवण्यात आले होते. पण या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे या मोर्चातील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे या शेतकर्यांचे नेते उमेश देशमुख यांनी स्पष्ट केले. या मोर्चातील शेतकर्यांना घरी पोहोच करण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था केली जात असल्याची चर्चा आहे.पण शेतकर्यांनी रेल्वेचे तिकीट घेऊन ते घरी जायला निघाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन