शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

By सुरेश लोखंडे | Updated: March 18, 2023 13:26 IST

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाणे - कांद्याला व शेती मालाला हमी भाव मिळवण्यासाठी नाशिक येथून मंत्रालयावर काढलेला किसान सभेच्या लॉंग मार्च हा शेतकऱ्यांचा मोर्चा २ दिवसापासून शहापूर तालुक्यातील वाशिंदमध्ये आडवण्यात आलेला आहे.  या शेतकऱ्यांमधील पुंडलिक आंबो जाधव (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री  दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले आहे. या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य शासनाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मोर्चेकरांची घटनास्थळी भेट घेतली. मोर्चा मागे घेतल्याने आता सर्व शेतकरी रेल्वेने घरी जायला निघाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

या मोर्चातील दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेत ले. त्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन दिले. यास अनुसरून हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्च मोर्चा चा आजचा सातवा दिवस आहे. मुंबई, ठाण्यात आगमन होण्यापूर्वी हा मोर्चा शहापूरच्या वासिंद येथील मैदानावर दोन दिवसांपासून थांबवून ठेवलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थ संक्लपीय अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडकण्यासाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या मुंबई,ठाणे महानगरातील वाहतुकीस अन्यही जनजीवनावर हा हजारो शेतकर्यांचा मोर्चा परिणाम करणारा ठरत असल्यामुळे त्यास वासिंद येथे अडवण्यात आले होते. पण या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे या मोर्चातील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे या शेतकर्यांचे नेते उमेश देशमुख यांनी स्पष्ट केले. या मोर्चातील शेतकर्यांना घरी पोहोच करण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था केली जात असल्याची चर्चा आहे.पण शेतकर्यांनी रेल्वेचे तिकीट घेऊन ते घरी जायला निघाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन