शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मोर्चातील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; वासिंदमधील घटना

By सुरेश लोखंडे | Updated: March 18, 2023 13:26 IST

गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

ठाणे - कांद्याला व शेती मालाला हमी भाव मिळवण्यासाठी नाशिक येथून मंत्रालयावर काढलेला किसान सभेच्या लॉंग मार्च हा शेतकऱ्यांचा मोर्चा २ दिवसापासून शहापूर तालुक्यातील वाशिंदमध्ये आडवण्यात आलेला आहे.  या शेतकऱ्यांमधील पुंडलिक आंबो जाधव (५५) या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रात्री  दाखल केले असता डाँक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषीत केले आहे. या मृत्यूमुळे प्रशासन खडबडून जागे झाले. राज्य शासनाच्यावतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी मोर्चेकरांची घटनास्थळी भेट घेतली. मोर्चा मागे घेतल्याने आता सर्व शेतकरी रेल्वेने घरी जायला निघाल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.

या मोर्चातील दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची दखल घेऊन राज्य शासनाच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोर्चेकरांचे म्हणणे ऐकून घेत ले. त्यांना मागण्या मंजुरीचे आश्वासन दिले. यास अनुसरून हा मोर्चा आता स्थगित करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून निघालेल्या शेतकऱ्यांच्या या लाँग मार्च मोर्चा चा आजचा सातवा दिवस आहे. मुंबई, ठाण्यात आगमन होण्यापूर्वी हा मोर्चा शहापूरच्या वासिंद येथील मैदानावर दोन दिवसांपासून थांबवून ठेवलेला आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थ संक्लपीय अधिवेशना दरम्यान मंत्रालयावर धडकण्यासाठी हा मोर्चा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. या मुंबई,ठाणे महानगरातील वाहतुकीस अन्यही जनजीवनावर हा हजारो शेतकर्यांचा मोर्चा परिणाम करणारा ठरत असल्यामुळे त्यास वासिंद येथे अडवण्यात आले होते. पण या शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यास राज्य शासन व प्रशासन जबाबदार असल्याचे या मोर्चातील शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे.

आता हा मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे या शेतकर्यांचे नेते उमेश देशमुख यांनी स्पष्ट केले. या मोर्चातील शेतकर्यांना घरी पोहोच करण्यासाठी दहा बसेसची व्यवस्था केली जात असल्याची चर्चा आहे.पण शेतकर्यांनी रेल्वेचे तिकीट घेऊन ते घरी जायला निघाल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मार्च हा नाशिकहून पायपिट करत मुंबईच्या दिशेने निघाला. गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मुंबईत मागण्याविषयी शिष्टमंडळाशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देऊन लॉंगमार्च स्थगित करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी केली होती. वन जमिनीचे प्रलंबित प्रश्न, घरकुल योजना, शेत मालाला हमीभाव, वीजबिल आणि कर्जमाफी आदी मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलनात्मक पवित्र घेतला. तूर्तास गेल्या दोन दिवसांपासून राज्य सरकारशी मागण्याविषयी चर्चा सरू असतानाच जाधव या शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलन