शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

समृध्दी महामार्गाच्या भूसंपादनातील फसवणुकी विरोधात शेतकऱ्यांचेठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 17:58 IST

जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरीशेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरीवेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही

ठाणे : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्यां जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतकऱ्यांची मोठ्याप्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. येथील शासकीय विश्रामगृहासमोर या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. समृध्दी महामार्गातील भ्रष्टाचाराच्या विरोधात, शेतकऱ्यांच्या झालेल्या बेकायदेशीर खरेदीखत, संबंधीत अधिकाऱ्यांकडून होणारी मुजोरी व फसवणूक बाधित शेतकऱ्यांवर बेकायदेशीर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या विरोधात, जिल्ह्यातील समृध्दीत बाधीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे बेमुदत उपोषण सुरू केल्याचे येथील शेतकऱ्यांकडून नमुद करण्यात आले. या उपोषणाची त्वरीत दखल घेऊन संबंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे. यावेळी या उपोषणकर्त्यांना आमदार किसन कथोरे यांनी देखील भेट दिली. या व्यासपीठावर धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांच्यासह फसवणूक झालेले शेतकरी व समाजकार्यकर्त्यांनी देखील या उपोषणात सहभाग घेतला आहे.शेतकरख़यांची फसवणूक झाल्याचे संबंधीत अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाकडून न्याय मिळालेला नाही. मात्र संंबंधीत अधिकाऱ्यांच्या दलालांकडून मानिसक, शारीरिक आणि अर्थीक छळूक सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. यामुळे संबंधीत शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झालेला असतानाही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यचे या उपोषणकर्त्यांमधील भिवंडी येथील कैलास ढमणे यांनी सांगितले. आमच्या ढमणे परिवारासह जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कल्याण येथील फसवणूक झालेले शेतकरी देखील या बेमुदत उपोषणात सहभागी असल्याचे ढमणे यांनी सांगितले.समृध्दी मार्गाने बाधीत झालेल्या घरांचा मोबदला त्वरित देण्यात यावा, चिराड पाड्यात काही बेकायदेशीर केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द करावे, विशेष भूसंपादन अधिकारी, कमुनिकेटर प्रकाश गायकर, निलेश भोईर व इतर यांचे व त्यांचा नातेवाईकांचे सर्व आर्थिक व्यवहारांची स्वायत्त यंत्रने मार्फत चौकशी करण्यात यावी. भिवंडी आणि शहापूर तहसीलदारांची खोट्या व बोगस खरेदीखत प्रकरणी लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याची मागणी देखील या उपोषणाच्या माध्यमातून जोरधरू लागली आहे.

टॅग्स :thaneठाणेShetkari Jagar Manchशेतकरी जागर मंच