शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

भुयारी गटार योजना : कुणी कंत्राटदार देता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 06:19 IST

बदलापूरची ३०० कोटींची भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चेला आलेली असताना याच योजनेला लागून असलेल्या भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही.

- पंकज पाटीलबदलापूर - बदलापूरची ३०० कोटींची भुयारी गटार योजना ही भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चर्चेला आलेली असताना याच योजनेला लागून असलेल्या भुयारी गटाराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी एकही कंत्राटदार पुढे येत नाही. तीनवेळा निविदा मागवूनही कंत्राटदारांनी भरल्या नाही. बदलापूर पालिकेत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे आर्थिक हितासाठी कंत्राटदाराला त्रास देत असल्यानेच कोणताही कंत्राटदार पुढे येत नसल्याची चर्चा शहरात सुरू आहे. या कामासाठी पुन्हा चौथ्यांदा निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे पहिल्या टप्प्याचे ३०० कोटींच्या भुयारी गटार योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामाच्या बिलावरून पालिकेत वाद निर्माण झालेला आहे. या बिलाचे वाद सुरू असल्याने त्याचे पडसाद हे भुयारी गटार योजनेच्या दुसºया टप्प्यात उमटले आहेत. दुसºया टप्प्याचे काम हे ३१ कोटी ४४ लाखांचे आहे. या योजनेत उल्हास नदीला जाणारे सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेचे काम झाल्यास उल्हास नदीला जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन उल्हास नदीचे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.या कामाची पहिली निविदा १९ डिसेंबर २०१७ रोजी काढण्यात आली. मात्र, त्या निविदेला कोणीच साथ दिली नाही. कंत्राटदारांनी निविदेकडे पाठ फिरवल्यावर ९ फेब्रुवारी २०१८ रोजी पुन्हा ही निविदा मागवण्यात आली. मात्र, त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, १५ मार्चला पुन्हा निविदा मागवण्यात आली. या निविदेलाही कोणीच प्रतिसाद दिला नाही. तीन वेळा निविदा मागवूनदेखील कंत्राटदार पुढे येत नसल्याने या परिस्थितीची कारणे शोधण्याचे काम सुरू झाले आहे.प्रत्येक निविदेच्या प्रक्रियेत निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांची गर्दी होते. अनेक कंत्राटदार हे टेंडर मॅनेज करण्यात व्यस्त असतात. मात्र, बदलापुरातील दुसºया टप्प्यातील भुयारी गटार योजनेच्या कामात कंत्राटदार पुढे न येण्यामागे पालिका प्रशासन आणि नगरसेवक हेच जबाबदार असल्याचे समोर येत आहे. मोठ्या प्रकल्पांमध्ये आर्थिक लाभासाठी नगरसेवक आणि अधिकारी कंत्राटदारांना वेठीस धरतात, हे निदर्शनास आले आहे.नेत्यांनी केली चूक मान्यदरम्यान, बदलापूर पालिकेने दुसºया टप्प्याच्या कामासाठी ७८ कोटींचा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, जीवन प्राधिकरणाने तांत्रिक मंजुरीच्यावेळी या कामाची रक्कम थेट ३१ कोटी ४४ लाख रुपये केली. त्यात काही बदल केल्याने ही रक्कम कमी झाली होती. मात्र, नव्या प्रस्तावानुसार कंत्राटदार काम करण्यास तयार नाही. या प्रकरणात बदलापूरमधील बडे राजकारणीदेखील नगरसेवकांची चूक मान्य करत आहेत. कंत्राटदारांना नगरसेवक, अधिकारी आर्थिक लाभासाठी त्रास देतात, हे स्पष्ट झाले आहे. आधीच्या योजनेतदेखील संबंधित कंत्राटदाराला आर्थिक लाभासाठीच त्रास देण्याचा प्रकार केला आहे.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे