शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

निधीअभावी रखडणार भुयारी गटार योजना, भिवंडी पालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 00:51 IST

शहरात भुयारी गटाराचा पहिला टप्पा वादाच्या भोव-यात असताना तत्कालीन नगरसेवक आणि बांधकाम विभागातील अधिका-यांनी दुस-या टप्प्यातील कामेही अर्धवट केली आहेत.

भिवंडी : शहरात भुयारी गटाराचा पहिला टप्पा वादाच्या भोव-यात असताना तत्कालीन नगरसेवक आणि बांधकाम विभागातील अधिका-यांनी दुस-या टप्प्यातील कामेही अर्धवट केली आहेत. निधीअभावी रखडलेली ही कामे अमृत योजनेतून करण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या महासभेत मांडला असता नगरसेवकांनी विरोध केला. त्यामुळे ही योजनाही निधीअभावी रखडण्याच्या मार्गावर आहे.महापालिका क्षेत्रात भुयारी गटार टप्पा क्र. २ च्या कामासाठी जुलै २०१५ मध्ये ४२७.९८ कोटींचे कंत्राट ईगल इन्फ्रा इंडिया यांना दिले होते. मूळ मंजूर योजनेच्या किमतीवर सरकारचे अनुदान मिळणार आहे. अंदाजित रक्कम १७१.९९ कोटी असून भाववाढीसह प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सर्वसाधारणपणे ५७५.९२ कोटी इतकी रक्कम या प्रकल्पासाठी उपलब्ध करावी लागणार आहे. त्यापैकी सरकारने ४६० कोटी मंजूर केले आहेत. या कामासाठी पालिकेला ३९४.६५ कोटी रक्कम उभी करायची आहे. पालिकेची आर्थिक स्थिती बेताची असून पालिकेवर ८०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे हे काम बंद होण्याच्या मार्गावर आहे.अशा स्थितीत झालेल्या कामाचा त्रयस्थ संस्थेकडून व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक अहवाल घेऊन ही योजना सरकारच्या अमृत योजनेतून राबवल्यास सरकारचा निधी मिळेल व भाववाढीची रक्कम द्यावी लागणार नाही, असा प्रस्ताव आयुक्त योगेश म्हसे यांनी महासभेत मांडला. परंतु, भुयारी गटार योजना टप्पा क्र. १ व २ मध्ये काही नगरसेवकांनी पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकारी व अभियंत्यांना हाताशी धरून आपल्या प्रभागातील कामांसाठी स्वत: कंत्राटदार नेमले आहेत. त्यामुळे आपले पितळ उघड होईल, या भीतीने प्रस्तावास विरोध होत आहे.दरम्यान, शहरात कुठल्याही प्रकारचा विकास केला जात नसल्याने शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने चांगल्या सुविधा द्याव्यात अशी मागणी केली आहे.