शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:12 IST

पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.

उल्हासनगर : शहराला पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शहर विकासाला चालना मिळणार असल्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. हे गृहीत धरून व्यापा-यांनी कधी नव्हे तो भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, सत्तेच्या एका वर्षानंतर शहरातील विकासकामे ठप्प पडली असून राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला.तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या कालावधीत अडीच वर्षांपूर्वी अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणावेळी अंशत: बाधित व्यापाºयांना दोन मजली बांधकाम, तर पूर्णत: बाधित व्यापा-यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी दिले. मात्र, यापैकी कुठलेही आश्वासन महापालिका व राजकीय नेत्यांनी पूर्ण केले नाही.शहरातील जीन्स उद्योग बंद पडल्याने या उद्योगावर अवलंबून असलेले २५ हजारांपेक्षा अधिक कामगार बेकार झाले. त्यांच्यावर स्थलांतरित होण्याची वेळी आली असून जीन्स कारखाने भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर यासह ग्रामीण भागांत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडून अनेक जीन्सची दुकाने बंद झाली आहेत. अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याची कामे रखडली आहेत. दोनशेपेक्षा जास्त पूर्णत: बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा दिली नसल्याने त्यांचे व्यवसाय बुडीत निघून उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या मुलांनी शिक्षण सोडून नोकरी पत्करली आहे.पूर्ववैभवासाठी व्यापारी आक्रमक-शहराचे पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी देवाला साकडे घालण्याची वेळ व्यापारी संघटनेवर आली. गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नगरसेवकांकडून असहकार्याच्या धोरणामुळे शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली होती. आयुक्तांच्या प्रतिक्रियेला सुमित चक्रवती यांनी पाठिंबा दिला असून शहराच्या विकासासाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी हाजीमलंगबाबाला चादर चढवली आहे.चक्रवर्ती ओमी टीम समर्थकसुमित चक्रवर्ती ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी यांनी आयुक्तांच्या विविध कामांची स्तुती केली आहे. अशावेळी चक्रवर्ती यांनी महापालिकेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून चक्रवर्ती यांच्याआड ओमी आयुक्तांवर निशाणा साधत तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर