शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

उल्हासनगरचा विकास रखडला ; हाजीमलंगबाबांना साकडे,व्यापा-यांवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:12 IST

पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.

उल्हासनगर : शहराला पूर्वीचे वैभव मिळण्यासाठी व्यापारी संघटनेने हाजीमलंगबाबांना साकडे घालून चादर चढवली. व्यापा-यांवर उपासमारीची वेळ आली असून नागरिक स्थलांतर करत असल्याचा आरोप व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवती यांनी केला आहे.उल्हासनगर महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर शहर विकासाला चालना मिळणार असल्याचे आश्वासन भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले होते. हे गृहीत धरून व्यापा-यांनी कधी नव्हे तो भाजपाला पाठिंबा दिला. मात्र, सत्तेच्या एका वर्षानंतर शहरातील विकासकामे ठप्प पडली असून राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचा पाऊस पडत असल्याचा आरोप चक्रवर्ती यांनी केला.तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांच्या कालावधीत अडीच वर्षांपूर्वी अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे १०० फुटी रुंदीकरण झाले. रस्ता रुंदीकरणावेळी अंशत: बाधित व्यापाºयांना दोन मजली बांधकाम, तर पूर्णत: बाधित व्यापा-यांना पर्यायी जागा देण्याचे आश्वासन तत्कालीन आयुक्तांसह राजकीय नेत्यांनी दिले. मात्र, यापैकी कुठलेही आश्वासन महापालिका व राजकीय नेत्यांनी पूर्ण केले नाही.शहरातील जीन्स उद्योग बंद पडल्याने या उद्योगावर अवलंबून असलेले २५ हजारांपेक्षा अधिक कामगार बेकार झाले. त्यांच्यावर स्थलांतरित होण्याची वेळी आली असून जीन्स कारखाने भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर यासह ग्रामीण भागांत स्थलांतरित होत आहेत. त्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प पडून अनेक जीन्सची दुकाने बंद झाली आहेत. अंबरनाथ ते कल्याण रस्त्याचे रुंदीकरण झाल्यानंतर रस्त्याची कामे रखडली आहेत. दोनशेपेक्षा जास्त पूर्णत: बाधित व्यापाºयांना पर्यायी जागा दिली नसल्याने त्यांचे व्यवसाय बुडीत निघून उपासमारीची वेळ आली. अनेकांच्या मुलांनी शिक्षण सोडून नोकरी पत्करली आहे.पूर्ववैभवासाठी व्यापारी आक्रमक-शहराचे पूर्वीचे वैभव मिळवण्यासाठी देवाला साकडे घालण्याची वेळ व्यापारी संघटनेवर आली. गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नगरसेवकांकडून असहकार्याच्या धोरणामुळे शहराला देवही वाचवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी दिली होती. आयुक्तांच्या प्रतिक्रियेला सुमित चक्रवती यांनी पाठिंबा दिला असून शहराच्या विकासासाठी व्यापारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी हाजीमलंगबाबाला चादर चढवली आहे.चक्रवर्ती ओमी टीम समर्थकसुमित चक्रवर्ती ओमी कलानी यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. ओमी कलानी यांनी आयुक्तांच्या विविध कामांची स्तुती केली आहे. अशावेळी चक्रवर्ती यांनी महापालिकेच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत असून चक्रवर्ती यांच्याआड ओमी आयुक्तांवर निशाणा साधत तर नाही ना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर