शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरचा ७२ वा वर्धापनदिन उत्सवात; कोनशिलेचे होणार सुशोभीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 17:52 IST

उल्हासनगरच्या ७२ व्या वर्धापनदिन निमित्त महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेली शहराची ऐतिहासिक कोनशिलेला फुलांनी सजविले आले होते.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : शहराचा ७२ व्या वर्धापनदिना निमित्त ऐतिहासिक कोनशिलेला आमदार कुमार आयलानी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, उपायुक्त अशोक नाईकवाडे आदींसह सामाजिक संघटना पदाधिकारी, नागरिकांनी पुष्पहार अर्पण केले. तर काँग्रेसच्या वतीने यावेळी लाडूचे वाटप करून एकमेकांना शहराच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

उल्हासनगरच्या ७२ व्या वर्धापनदिन निमित्त महापालिका मुख्यालय मागील तरण तलाव येथे ठेवण्यात आलेली शहराची ऐतिहासिक कोनशिलेला फुलांनी सजविले आले होते. कोनशिलेला महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, आमदार कुमार आयलानी यांच्यासह विविध पक्षाच्या नेते, नगरसेवक, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, नागरिक, शालेय मुले आदींनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी समाजसेवक शशिकांत दायमा यांनी वर्धापनदिनी येणाऱ्या नागरिकांना एक वही व पेन आणण्याचे आवाहन केले होते. आणलेल्या वह्या व पेन गोरगरीब व गरजू शालेय मुलांना देण्यात येणार असल्याचे दायमा म्हणाले. तर ऐतिहासिक कोनशिलेचे नुतनीकरण करण्याचे संकेत यावेळी उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिले. तर काँग्रेस पक्षाचे किशोर धडके, मैनिद्दीन शेख, शंकर आहुजा आदी पक्ष्याच्या कार्यकर्त्यानी लाडूचे वाटप केले. 

फाळणीच्या वेळी सिंधू प्रांतातील आलेल्या विस्थापित सिंधी बांधवासह इतरांना कल्याण शहराजवळील लष्करी ब्रिटिश छावणीतील बरेक व खुल्या जागेत वसविण्यात आले. छावणी शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरून विस्थापितांच्या वस्तीला देशाचे पाहिले गव्हर्नर सी राजगोपालाचारी यांनी ८ ऑगस्ट रोजी उल्हासनगर नाव देण्यात आले. तेंव्हा पासून शहराचा वर्धापनदिन ८ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येत आहे. ७२ वर्षात शहराने राज्यात नव्हेतर देश विदेशात नावलौकिक मिळविला. मात्र अद्यापही शहरात मूलभूत सुखसुविधा पासून वंचित आहे. पाणी टंचाई, रस्त्याची दुरावस्था, डम्पिंग ग्राऊंड, साफसफाई, आरोग्य सुविधा, अवैध व धोकादायक बांधकामे आदी अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. शहरात पुन्हा उल्हास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर