शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरातील वालधुनी नदीपूल पूर्णत्वाकडे, शहर अभियंताकडून पुलाची पाहणी

By सदानंद नाईक | Updated: June 24, 2024 18:36 IST

Ulhasnagar News: उल्हासनगर शहर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुलाच्या कामाची पाहणी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली. येत्या काही दिवसात पूल नागरिकांना खुला करण्यात येणार असल्याचे सेवकांनी म्हणाले आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : शहर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदी पुलाच्या कामाची पाहणी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी केली. येत्या काही दिवसात पूल नागरिकांना खुला करण्यात येणार असल्याचे सेवकांनी म्हणाले आहे.

उल्हासनगर पश्चिम रेल्वे स्टेशनकडे जाणारा एकमेव वालधुनी नदीवरील जुना पूल धोकादायक झाल्याने, पुनर्बांधणीसाठो दोन वर्षांपूर्वी महापालिकेद्वारे पूल तोडण्यात आला? तेंव्हा पासून तांत्रिक कारणांमुळे पुलाचे काम रखडले होते. पुला शेजारील जलवाहिनेचे काम पूर्ण होताच पुलाच्या कामाला सुरुवात होऊन पूल बांधून पूर्ण झाला. रेल्वे स्टेशन पश्चिमकडे जाणार हा एकमेव पूल असून पुलावरून वाहनांची ये-जा थेट स्टेशन पर्यंत होणार आहे. महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता तरुण सेवकांनी स्थानिक कार्यकर्ते व माजी नगरसेवकासह पुलाची पाहणी केली. पुलाची डागडुजी झाल्यानंतर नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.

उल्हासनगर पश्चिम रेल्वेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वालधुनी नदीवरील पुल सर्वांना खुला झाल्यावर, सीएचएम कॉलेजकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्याच्या वालधुनी नदीवरील पुलाची पुनर्बांधणी होणार आहे. त्या पुलाचे काम सुरू होण्याचे संकेत महापालिका बांधकाम विभागाने दिले. दोन्ही पूल बांधून पूर्ण झाल्यावर, स्टेशन बाहेरील भूखंडावर महापालिका परिवहन बस सेवेचे मुख्य स्टेशन व आगार प्रस्तावित आहे. यासाठी केंद्राकडून १५ कोटीच्या निधीला मंजुरी मिळाली असून नदी किनारी संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे. आयुक्त अजीज शेख यांनी वालधुनी नदीवरील पुलाचे काम त्वरित पूर्ण होण्यासाठी स्वतः जातीने लक्ष दिले होते. एकीकडे शहर विकास कामाला गती आली असून दुसऱ्याकडे काही प्रकल्प रखडल्याचा आरोप होत आहे. वालधुनी नदीवरील पूल पूर्ण बांधून वाहतूकीस खुला करण्याचा मानस यावेळी शहर अभियंता तरुण सेवकांनी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे