शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

प्लॅस्टीक पिशवीत सापडलेला टायगर झाला ३ वर्षाचा, वाढदिवस साजरा, दत्तक प्रक्रिया सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:37 IST

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेणुका सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात तीन वर्षांपूर्वी ३० डिसेंबरला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज काही महिलांना आला

ठळक मुद्देशहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना टायगरची तब्येत खालावल्याने, मुंबई येथील वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : तीन वर्षांपूर्वी नालीत प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडलेल्या टायगर तीन वर्षांचा झाला असून त्याचा तिसरा वाढदिवस नवीमुंबईतील विश्वबालक केंद्रात समाजसेवक रगडे कुटुंबांनी सहकाऱ्यांसह साजरा केला. टायगरला जीवनदान देण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार ज्योती कलानी, माजी महापौर पंचम कलानी यांनी पुढाकार घेतला होता. 

उल्हासनगर कॅम्प नं-३ रेणुका सोसायटी परिसरातून वाहणाऱ्या नाल्यात तीन वर्षांपूर्वी ३० डिसेंबरला सकाळी प्लास्टिकच्या पिशवीतून लहान बाळाचा रडण्याचा आवाज काही महिलांना आला. स्थानिक महिलांनी सदर माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांना दिल्यावर, रगडे यांनी याबाबतची माहिती मध्यवर्ती पोलिसांना दिली. तसेच उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले. नाल्यातील दूषित पाणी बाळाच्या डोळ्यात गेल्याने उपचार सुरू केले. दरम्यान मेंदूत संसर्ग झाल्याचे उपचारा दरम्यान उघड झाल्यावर, टायगरचा जीवन-मरणाचा प्रश्न उभा ठाकला. अश्यावेळी रगडे यांनी औषध उपचाराचा संपूर्ण खर्च उचलून बालन्यायालयाच्या आदेशाने टायगरला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविले. 

शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना टायगरची तब्येत खालावल्याने, मुंबई येथील वाडिया रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, महापौर पंचम कलानी यांची मदत कामी आली. सलग १८ दिवस टायगरला दूध देण्यात आल नाही. केवळ औषध व रक्त चढवण्यात चढविण्यात आले होते. मेंदूत संसर्ग झाल्याने, अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियासाठी निधी उभा करण्यासाठी रुग्णालयाने केटो या फँड रेजिंग एनजीओ बरोबर करार केला. अवघ्या २४ तासात १० लाख ४२ हजार रुग्णालयाचे खुल्या केलेल्या रुग्णालयात जमा झाले. ५ एप्रिलला टायगरला रुग्णालयातून सुट्टी मिळाली तरी धोका कायम होता. पोलीसांनी महिला बालकल्याण समितीच्या आदेशानुसार नवीमुंबई येथील नेरुळ मधील विश्व बालक केंद्र येथे टायगरचे पालनपोषण होत आहे. 

टायगर झाला सेलिब्रेटी, सलमान खानही दिवाना 

टायगर जिवंत राहण्यासाठी सर्वाधिक काळजी समाजसेवक शिवाजी रगडे कुटुंबांनी घेतली. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, तत्कालीन आमदार ज्योती कलानी, माजी महापौर पंचम कलानी, डॉक्टर, नर्स यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. टायगर जिवंतकथा ऐकल्यावर सिनेअभिनेता सलमान खान यांनीही भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र काही कारणामुळे भेट झाली नाही.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेSalman Khanसलमान खान