शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

उल्हासनगरवासीयांवर ३५ कोटींच्या करवाढीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:30 IST

महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे. घनकचरा व्यवस्थापनकराला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका स्पष्ट केली असून व्यापारी संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.उल्हासनगरातील कचरा उचलण्यावर वर्षाकाठी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो. सफाई कर्मचाºयांचा पगार आणि इतर खर्चही भरपूर असल्याने शासन धोरणानुसार स्वच्छता अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनकर लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनापोटी ३५ कोटी रुपयांची करवाढ निश्चित केली. तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कचरा व्यवस्थापन करवाढीचा प्रस्ताव यापूर्वीही महासभेत आणला होता. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने प्रस्ताव फेटाळला होता. शून्यकचरा संकल्पनेवर कचºयाचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असतानाही कचºयाचे ढीग शहरात आहेत. कोणार्क कंपनी अटी आणि शर्तींचे सर्रास उल्लंघन करत असून कंपनीवर कारवाई केली जात नसल्याने पालिकेवर टीका होत आहे.शहर हगणदारीमुक्त व स्वच्छ होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही केला होता. मध्यंतरी, सहा कोटी रुपयांच्या निधीतून शहरात कचºयाचे डबे पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. सार्वजनिक शौचालयाच्या साफसफाईसाठी वर्षाला पाच कोटींचा ठेका देण्याचेही ठरले होते. मात्र, त्यावरही टीका झाल्याने दोन्ही प्रस्ताव रखडले. शहरातील चौक, मुख्य रस्ते, मैदान आदी ठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी ठेवलेल्या कचरापेट्यांची काही महिन्यांतच दुरवस्था झाली आहे.>व्यापाºयांचा विरोध, रस्त्यांवर उतरण्याचे संकेत : शहरात कचºयाचे ढीग असताना कचरा व्यवस्थापन करवाढ कशाची, असा प्रश्न व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी केला. कचरा व्यवस्थापन करवाढीला विरोध करून यासाठी व्यापारी रस्त्यांवर उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर