शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

उल्हासनगरवासीयांवर ३५ कोटींच्या करवाढीची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 03:30 IST

महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे.

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका प्रशासनाने ३५ कोटी रुपयांचा कचरा व घनकचरा व्यवस्थापनकराचा प्रस्ताव महासभेत आणल्याने, नागरिकांच्या डोक्यावर करवाढीची टांगती तलवार आहे. घनकचरा व्यवस्थापनकराला सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी विरोधाची भूमिका स्पष्ट केली असून व्यापारी संघटनेने रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.उल्हासनगरातील कचरा उचलण्यावर वर्षाकाठी २० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला जातो. सफाई कर्मचाºयांचा पगार आणि इतर खर्चही भरपूर असल्याने शासन धोरणानुसार स्वच्छता अभियानांतर्गत कचरा व्यवस्थापनकर लागू करण्याचा प्रस्ताव महासभेत आणण्यात आला. महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनापोटी ३५ कोटी रुपयांची करवाढ निश्चित केली. तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कचरा व्यवस्थापन करवाढीचा प्रस्ताव यापूर्वीही महासभेत आणला होता. त्यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमताने प्रस्ताव फेटाळला होता. शून्यकचरा संकल्पनेवर कचºयाचा ठेका कोणार्क कंपनीला दिला असतानाही कचºयाचे ढीग शहरात आहेत. कोणार्क कंपनी अटी आणि शर्तींचे सर्रास उल्लंघन करत असून कंपनीवर कारवाई केली जात नसल्याने पालिकेवर टीका होत आहे.शहर हगणदारीमुक्त व स्वच्छ होण्यासाठी तत्कालीन महापालिका आयुक्तांनी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याचा आरोप राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांनीही केला होता. मध्यंतरी, सहा कोटी रुपयांच्या निधीतून शहरात कचºयाचे डबे पुरवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. सार्वजनिक शौचालयाच्या साफसफाईसाठी वर्षाला पाच कोटींचा ठेका देण्याचेही ठरले होते. मात्र, त्यावरही टीका झाल्याने दोन्ही प्रस्ताव रखडले. शहरातील चौक, मुख्य रस्ते, मैदान आदी ठिकाणी ओला व सुका कचरा संकलनासाठी ठेवलेल्या कचरापेट्यांची काही महिन्यांतच दुरवस्था झाली आहे.>व्यापाºयांचा विरोध, रस्त्यांवर उतरण्याचे संकेत : शहरात कचºयाचे ढीग असताना कचरा व्यवस्थापन करवाढ कशाची, असा प्रश्न व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश तेजवानी यांनी केला. कचरा व्यवस्थापन करवाढीला विरोध करून यासाठी व्यापारी रस्त्यांवर उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर