शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेचा अजब कारभार; भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, विरोधकांनी केली टीका

By सदानंद नाईक | Updated: June 13, 2025 17:01 IST

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात गुरुवारी रात्री करण्याचा अजब प्रकार उघड झाला. तर डांबरीकरण करीत असताना पाऊस आल्याचा दावा महापालिका बांधकाम विभागाने करून, रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याचे संकेत दिले आहे. 

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी पाऊस आल्याने, डांबरीकरणाचे काम थांबाविण्या ऐवजी सुरु ठेवल्याचा आरोप मनसेसह अन्य पक्ष नेते व सामाजिक संघटनेने करून संबंधितावर कारवाईची मागणी केली. पावसाळा सुरु झाल्यानंतरही डांबरीकरणाचे काम कसे? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला. शहरात रस्त्याची दुरावस्था झाली असून पाऊस पडताच खोदलेल्या रस्त्यामुळे रस्ते चिखलमय होत आहेत. खोदलेल्या खड्ड्यात गाड्या पडून अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे मनसे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांचे म्हणणे आहे.

 रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा होणार महापालिका बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वी झाले. मात्र रस्ता खराब झाल्याने गॅरंटी वेळेत या रस्त्याचे गुरुवारी रात्री डांबरीकरण सुरु केले. मात्र अचानक पाऊस आल्याने, रस्ता डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले. रस्ता खराब झाल्यास, ठेकेदाराद्वारे पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

 भुयारी गटार योजनेचे काम अर्धवट शहरांत भुयारी गटार योजनेचे काम अद्याप अर्धवट असून काम ४० टक्केही झाले नाही. मात्र ठेकेदाराला १०० कोटी पेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी दिली. तसेच खोदलेले रस्ते विशिष्ट पद्धतीने दुरस्ती न केल्याने, पावसाळ्यात रस्ते खचून अपघात होण्याची शक्यता आहे. 

१५० कोटीच्या निधीतील रस्त्याचे काम टांगलेले एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून शहरातील मुख्य ७ रस्त्याचे बांधकाम गेल्या ३ वर्षापासून सुरु आहे. मात्र अद्याप एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना महापालिकेकडून अभय दिल्याचा आरोप विविध पक्षांकडून होत आहे.