शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर पालिकेचा अजब कारभार; भरपावसात रस्त्याचे डांबरीकरण, विरोधकांनी केली टीका

By सदानंद नाईक | Updated: June 13, 2025 17:01 IST

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण भर पावसात गुरुवारी रात्री करण्याचा अजब प्रकार उघड झाला. तर डांबरीकरण करीत असताना पाऊस आल्याचा दावा महापालिका बांधकाम विभागाने करून, रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्याचे संकेत दिले आहे. 

उल्हासनगर महापालिका आयुक्तानी विकास कामे पूर्ण करण्याला ३१ मे ची डेडलाईन दिल्याचे बोलले जाते. त्यानंतरही विकास कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी कॅम्प नं-३ फॉरवर्ड लाईन रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी पाऊस आल्याने, डांबरीकरणाचे काम थांबाविण्या ऐवजी सुरु ठेवल्याचा आरोप मनसेसह अन्य पक्ष नेते व सामाजिक संघटनेने करून संबंधितावर कारवाईची मागणी केली. पावसाळा सुरु झाल्यानंतरही डांबरीकरणाचे काम कसे? असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला. शहरात रस्त्याची दुरावस्था झाली असून पाऊस पडताच खोदलेल्या रस्त्यामुळे रस्ते चिखलमय होत आहेत. खोदलेल्या खड्ड्यात गाड्या पडून अपघात होण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे मनसे जिल्हाप्रमुख बंडू देशमूख यांचे म्हणणे आहे.

 रस्त्याचे डांबरीकरण पुन्हा होणार महापालिका बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संदीप जाधव यांनी रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वी झाले. मात्र रस्ता खराब झाल्याने गॅरंटी वेळेत या रस्त्याचे गुरुवारी रात्री डांबरीकरण सुरु केले. मात्र अचानक पाऊस आल्याने, रस्ता डांबरीकरणाचे काम थांबविण्यात आले. रस्ता खराब झाल्यास, ठेकेदाराद्वारे पुन्हा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.

 भुयारी गटार योजनेचे काम अर्धवट शहरांत भुयारी गटार योजनेचे काम अद्याप अर्धवट असून काम ४० टक्केही झाले नाही. मात्र ठेकेदाराला १०० कोटी पेक्षा जास्त बिल अदा करण्यात आल्याची माहिती मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे यांनी दिली. तसेच खोदलेले रस्ते विशिष्ट पद्धतीने दुरस्ती न केल्याने, पावसाळ्यात रस्ते खचून अपघात होण्याची शक्यता आहे. 

१५० कोटीच्या निधीतील रस्त्याचे काम टांगलेले एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून शहरातील मुख्य ७ रस्त्याचे बांधकाम गेल्या ३ वर्षापासून सुरु आहे. मात्र अद्याप एकाही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. संथगतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्या ऐवजी त्यांना महापालिकेकडून अभय दिल्याचा आरोप विविध पक्षांकडून होत आहे.