शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

उल्हासनगर पालिका : मालमत्ताधारकांना अखेर ‘अभय’, तीन टप्प्यात योजना राबवणार, महासभेत मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 02:24 IST

मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून ११ ते २५ आॅक्टोबरपर्यंत ७५ तर त्यानंतर ५० व २५ टक्के दंड व व्याजदरात सूट देण्यात येणार आहे.

उल्हासनगर : मालमत्ता कर वसूल करण्यासाठी पुन्हा एकदा महापालिकेने अभय योजना जाहीर केली आहे. ही योजना तीन टप्प्यात राबवली जाणार असून ११ ते २५ आॅक्टोबरपर्यंत ७५ तर त्यानंतर ५० व २५ टक्के दंड व व्याजदरात सूट देण्यात येणार आहे. साई पक्षाचे टोणी सिरवानी व कविता पंजाबी यांनी आणलेल्या प्रस्तावाला बहुसंख्य सदस्यांनी पाठिंबा दिला असून उद्यापासून ही योजना लागू होणार आहे.उल्हासनगर महापालिकेत अनेकदा अभय योजना राबवली. मात्र नागरिकांचा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देत गेल्या महासभेत अभय योजनेची मागणी आयुक्तांनी फेटाळली. अखेर नागरिकांच्या मागणीनुसार सिरवानी व पंजाबी यांनी महासभेत अभय योजनेचा प्रस्ताव आणला. या योजनेला सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांचा नाईलाज झाला. त्यांनी १०० टक्के व्याज माफ करण्याऐवजी सुरूवातीला १५ दिवसात जे मालमत्ता कर भरतील त्यांना ७५ तर त्यानंतर १३ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कर भरणाºयांना ५० ते २५ टक्के व्याज माफ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर मीना आयलानी यांनी केले आहे.मालमत्ताकराची एकूण थकबाकी ३५० कोटीपेक्षा जास्त असून आयुक्त निंबाळकर यांनी अंदाजपत्रकात २८५ कोटीच्या वसुलीचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र मालमत्ता कर वसुलीचा इतिहास पाहता १०० कोटीपेक्षा जास्त वसुली आतापर्यंत झालेली नाही. २८५ कोटी वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी आयुक्तांनी बचत गटाच्या २०० महिलांना वसुलीसाठी नियुक्त केल आहे. मालमत्ता वसुलीत महिलांना अडथळा येऊ नये म्हणून त्यांना ओळखपत्र, वाहन व थकीत मालमत्तेला सील करण्याचे अधिकार दिले. मालमत्ता वसुली प्रकरणी ऐन दिवाळीत नागरिकात असंतोष निर्माण होऊ नये तसेच मालमत्ता कर वसुली व्हावी म्हणून अभय योजना राबवल्याचे बोलले जात आहे. १०० कोटीपेक्षा अधिक कर वसुलीचा अंदाज पालिका अधिकारी व्यक्त करत आहेत.अभय योजनेसाठी जनजागृतीमहापालिकेने लागू केलेल्या अभय योजनेचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी बहुतांश नगरसेवकांनी सोशल मीडियाचा वापर करत योजनेची माहिती प्रभागातील नागरिकांना देणे सुरू केले. तर काही नगरसेवक प्रभागातील नागरिकांमध्ये जाऊन अभय योजनेमुळे ७५ टक्के दंड व व्याज माफ होणार आहे. असे सांगून थकीत व चालू वर्षाचा मालमत्ता कर भरण्याचे आवाहन करत आहेत. नगरसेवकांसह पालिका अधिकारी व कर्मचाºयांनीही योजनेची जनजागृती सुरू केली.