शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

उल्हासनगर मनपा मुख्यालयाला मिळाली हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 01:31 IST

तरणतलावाचा मालकी हक्क मिळाला

- सदानंद नाईकउल्हासनगर : महापालिका मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडून महापालिकेला हस्तांतरण करण्यात आला. महापालिकेच्या ताब्यातील सर्वच मालमत्तेचे मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतर करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख आणि सभागृह नेते राजेंद्र चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क राज्य शासनाकडे असल्याने शहर विकासासाठी अडसर ठरत आहे. महापालिका मुख्यालय ज्या जागेवर उभे आहे, त्या जागेची मालकी राज्य शासनाकडे आहे. मुख्यालयाच्या जागेसह गोलमैदान आणि तरणतलाव तसेच इतर जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरण करण्याचा पाठपुरावा प्रांत कार्यालयामार्फत नगररचनाकार विभाग आणि मालमत्ता विभागाने केला. अखेर, त्याला यश येऊन मुख्यालयाच्या जागेसह तरणतलाव आणि गोलमैदानाच्या जागेची मालकी महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली.

प्रांताधिकारी जगतसिंग गिरासे यांनी याबाबतची कागदपत्रे आयुक्तांकडे दिली आहेत. यापूर्वी आयडीआय कंपनीजवळील कबरस्तानसाठी देण्यात आलेला भूखंड, व्हीटीसी मैदान, हिराघाट बोटक्लब अशा चार भूखंडांची मालकी पालिकेला मिळाली होती. उल्हासनगरातील जागेचा मालकी हक्क पालिकेकडे हस्तांतरण करायला हवा. तसे न झाल्याने, शहरात अवैध बांधकामांचा प्रश्न उभा राहून शहर विकास ठप्प पडल्याची टीका होत आहे. जागेच्या विकासाबाबत प्रत्येकवेळी शासनाची मंजुरी घ्यावी लागत असल्याने, आजही ९० टक्के शहरवासीयांकडे मालकी नाही.

उल्हासनगर महापालिका ताब्यातील उद्याने, मैदाने, समाजमंदिरे, खुल्या जागा, प्रभाग समिती कार्यालयांसह इतर कार्यालयांच्या जागेचा मालकी हक्क एकाच वेळी हस्तांतरण करण्याची मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे