शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2023 17:30 IST

उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथील जलकुंभाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. वेळीच जलकुंभाची दुरुस्ती केली नाहीतर, मोठा अपघात होण्याची भीती काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके यांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरातीलपाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. योजने अंतर्गत शहरातील जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, बुस्टर पंप, पाणी मीटर बसविण्यात आले होते. याच योजनेतील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथे उंच जलकुंभ बांधले आहे. या जलकुंभातून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही महिन्यांपासून जलकुंभाला पाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. महापालिकेने वेळीच पाणी गळती बंद करायला हवी होती. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी किशोर धडके यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे जलकुंभ पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे. 

शहरातील खडी मशीन येथील जलकुंभा प्रमाणे इतर जलकुंभालाही पाणी गळती लागली आहे. सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाची हीच परिस्थिती आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकीकडे महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकत असतांना, दुसरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी खाली जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका