शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2023 17:30 IST

उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथील जलकुंभाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. वेळीच जलकुंभाची दुरुस्ती केली नाहीतर, मोठा अपघात होण्याची भीती काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके यांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरातीलपाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. योजने अंतर्गत शहरातील जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, बुस्टर पंप, पाणी मीटर बसविण्यात आले होते. याच योजनेतील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथे उंच जलकुंभ बांधले आहे. या जलकुंभातून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही महिन्यांपासून जलकुंभाला पाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. महापालिकेने वेळीच पाणी गळती बंद करायला हवी होती. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी किशोर धडके यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे जलकुंभ पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे. 

शहरातील खडी मशीन येथील जलकुंभा प्रमाणे इतर जलकुंभालाही पाणी गळती लागली आहे. सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाची हीच परिस्थिती आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकीकडे महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकत असतांना, दुसरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी खाली जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका