शहरं
Join us  
Trending Stories
1
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
2
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
3
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
6
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
7
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
8
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
9
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
10
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
11
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
12
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
13
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
14
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
15
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
16
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
19
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
20
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र

उल्हासनगर महापालिकेच्या जलकुंभाला गळती; हजारो लिटर पाणी जाते खाली

By सदानंद नाईक | Updated: May 27, 2023 17:30 IST

उल्हासनगरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली.

सदानंद नाईकउल्हासनगर : कॅम्प नं-५ खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथील जलकुंभाला गेल्या काही महिन्यांपासून गळती लागून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. वेळीच जलकुंभाची दुरुस्ती केली नाहीतर, मोठा अपघात होण्याची भीती काँग्रेसचे पदाधिकारी किशोर धडके यांनी व्यक्त केली आहे.

उल्हासनगरातीलपाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने महापालिकेने पाणी पुरवठा वितरण योजना राबविण्यात आली. योजने अंतर्गत शहरातील जलवाहिन्या नव्याने टाकण्यात आल्या असून ११ उंच जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभ, बुस्टर पंप, पाणी मीटर बसविण्यात आले होते. याच योजनेतील खडी मशीन डम्पिंग ग्राऊंड येथे उंच जलकुंभ बांधले आहे. या जलकुंभातून परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र काही महिन्यांपासून जलकुंभाला पाणी गळती लागली असून हजारो लिटर पाणी खाली जात आहे. महापालिकेने वेळीच पाणी गळती बंद करायला हवी होती. दरम्यान काँग्रेस पक्षाचे शहर पदाधिकारी किशोर धडके यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे जलकुंभ पाणी गळती बंद करण्याची मागणी केली आहे. 

शहरातील खडी मशीन येथील जलकुंभा प्रमाणे इतर जलकुंभालाही पाणी गळती लागली आहे. सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प येथील जलकुंभाची हीच परिस्थिती आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एकीकडे महिला पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकत असतांना, दुसरीकडे महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी खाली जात आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका