शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

उल्हासनगर महापालिकेच्या निर्णयाने भूमाफियांचे दणाणले धाबे, महापालिकेच्या १ हजार ६४ मालमत्तांना मिळणार सनद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:20 IST

Ulhasnagar Municipal Corporation News: महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली. यामध्ये महापालिकेचे विविध कार्यालये, शाळा, मैदाने, उद्याने, समाजमंदिर, शौचालये आदी मालमत्तेचा समावेश आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ७० टक्के आरक्षित भूखंडावर यापुर्वीच अतिक्रमण झाले असून भूमाफियांनी आपला मोर्चा शाळा इमारत, उद्याने, शौचालये, खुल्या जागेवर वळविला. तसेच शहरातील जागेवर राज्य शासनाची मालकीहक्क असल्याने, विकासकामा वेळी महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागत आहे. दरम्यान कबरस्थानचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी आयडीआय कंपनी जवळील भूखंड हा कबरस्थानसाठी, गोलमैदान, महापालिका मुख्यालय, तरणतलाव, हिराघाट बोट क्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट, व्हिटीसी ग्राऊंड यांच्यासह उद्याने, मैदाने, शाळा, प्रभाग कार्यालये असे एकून १६५ मालमत्ताना सनद देण्याची मागणी उपविभागीय कार्यालय, राज्य शासनाकडे केली. आजपर्यंत फक्त ८ मालमत्ताना सनद म्हणजे मालकीहक्क मिळाली आहे.

 महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी यापुढे एकपाऊल पुढे टाकून, आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह प्रभाग व विशेष सभापती, विविध पक्षाचे गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन महापालिका ताब्यातील तब्बल १ हजार ६४ मालमत्ताना सनद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मालमत्ताना सनद मिळाल्यास या मालमत्ता अतिक्रमण व भूमाफिया पासून वाचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी एका सल्लागार पथकाची नियुक्त केली असून सुरवातीला सल्लागार पथक तीन महिन्यात १६५ मालमत्ताचा आराखडा उपविभागीय कार्यलयाला सनद मिळण्यासाठी सादर करणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

महापालिका मालमत्तेचे होणार सरंक्षणमहापालिकेने मालमत्ता सरंक्षणासाठी सुरू केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मालमत्ताना सनद मिळाल्यास त्यावरील अतिक्रमनाचा धोका टळणार असून विकासासाठीचे अडथळे दूर होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे