शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेच्या निर्णयाने भूमाफियांचे दणाणले धाबे, महापालिकेच्या १ हजार ६४ मालमत्तांना मिळणार सनद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 19:20 IST

Ulhasnagar Municipal Corporation News: महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर - महापालिका मालमत्तेचे अतिक्रमणा पासून सरंक्षण करण्यासाठी, १ हजार ६४ मलमत्तेला सनद मिळण्यासाठी मंगळवारी आयुक्तांसोबत उपविभागीय अधिकाऱ्याचे प्रतिनिधी, तहसिलदार व भूमापन अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक झाली. यामध्ये महापालिकेचे विविध कार्यालये, शाळा, मैदाने, उद्याने, समाजमंदिर, शौचालये आदी मालमत्तेचा समावेश आहे.

 उल्हासनगर महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ७० टक्के आरक्षित भूखंडावर यापुर्वीच अतिक्रमण झाले असून भूमाफियांनी आपला मोर्चा शाळा इमारत, उद्याने, शौचालये, खुल्या जागेवर वळविला. तसेच शहरातील जागेवर राज्य शासनाची मालकीहक्क असल्याने, विकासकामा वेळी महापालिकेला अडथळ्यांची शर्यत पूर्ण करावी लागत आहे. दरम्यान कबरस्थानचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर तत्कालीन महापौर पंचम कलानी यांनी आयडीआय कंपनी जवळील भूखंड हा कबरस्थानसाठी, गोलमैदान, महापालिका मुख्यालय, तरणतलाव, हिराघाट बोट क्लब, इंदिरा गांधी भाजी मार्केट, व्हिटीसी ग्राऊंड यांच्यासह उद्याने, मैदाने, शाळा, प्रभाग कार्यालये असे एकून १६५ मालमत्ताना सनद देण्याची मागणी उपविभागीय कार्यालय, राज्य शासनाकडे केली. आजपर्यंत फक्त ८ मालमत्ताना सनद म्हणजे मालकीहक्क मिळाली आहे.

 महापालिका उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी यापुढे एकपाऊल पुढे टाकून, आयुक्त डॉ राजा दयानिधी, महापौर लिलाबाई अशान, उपमहापौर भगवान भालेराव, स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी यांच्यासह प्रभाग व विशेष सभापती, विविध पक्षाचे गटनेते व नगरसेवकांना विश्वासात घेऊन महापालिका ताब्यातील तब्बल १ हजार ६४ मालमत्ताना सनद मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या मालमत्ताना सनद मिळाल्यास या मालमत्ता अतिक्रमण व भूमाफिया पासून वाचणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. यासाठी एका सल्लागार पथकाची नियुक्त केली असून सुरवातीला सल्लागार पथक तीन महिन्यात १६५ मालमत्ताचा आराखडा उपविभागीय कार्यलयाला सनद मिळण्यासाठी सादर करणार असल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली. 

महापालिका मालमत्तेचे होणार सरंक्षणमहापालिकेने मालमत्ता सरंक्षणासाठी सुरू केलेल्या कारवाईचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. मालमत्ताना सनद मिळाल्यास त्यावरील अतिक्रमनाचा धोका टळणार असून विकासासाठीचे अडथळे दूर होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे