शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापालिकेने ३ वर्षात ११ जणांना केले बडतर्फ, ४६ कर्मचारी होते बेपत्ता 

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2024 21:14 IST

उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती.

उल्हासनगर : बोगस कागदपत्र व बेपत्ता झालेल्या तब्बल ११ कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षात महापालिकेने बडतर्फ केल्याचा प्रकार उघड झाला. तर लाड-पागे वारसाहक्क नियुक्ती धोरणानुसार धनदांडग्यांनी गरीब व गरजू सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या लाटल्याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली असून कारवाईची मागणी होत आहे. 

उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती. अखेर तक्रारीनंतर महापालिकेने चौकशी केली असता, एका अधिकाऱ्यांसह दोन सफाई कामगार दोषी आढळले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी त्यांना बडतर्फ केले. त्यापाठोपाठ महापालिका आरोग्य विभागातील तब्बल ४६ सफाई कामगार काही वर्षांपासून गैरहजर असल्याचे उघड झाल्यावर, महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली. ४६ पैकी सुरवातीला २६ तर त्यानंतर ९ सफाई कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा व शोध लागल्यावर त्यांना महापालिका सेवेत रुजू होण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना जेजे रूग्णालय कडून फिटनेस प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती. फिटनेस सर्टिफिकेट आणल्यावर, त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेतल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

 महापालिकेच्या ४६ पैकी ३५ सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेतले असून त्यांच्या गैरहजरीचा कालावधी सेवाप्रयोजनार्थ लागू होणार नाही. तसेच त्या गैरहजर कालावधीचा सफाई कामगारांना कोणताही शासन लाभ मिळणार नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. ४६ पैकी इतर राहिलेल्या ११ कर्मचारी व अधिकाऱ्यां पैकी १ अधिकारी व २ सफाई कामगारांचे शालेय कागदपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यावर, त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ केले. तर ८ सफाई कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. महापालिकेने अश्या बेपत्ता सफाई कामगार व नातेवाईकांचा शोध घेऊन वृत्तपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या. बेपत्ता झालेले सफाई कर्मचारी गेल्या ९ वर्षापासून जास्त कालावधी पासून गैरहजर असून त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी महापालिकेसोबत एकदाही संपर्क केला नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी माहिती दिली आहे.

लाड-पागे वारसाहक्क नोकऱ्या वादात? -महापालिकेने ३ वर्षांपूर्वी लाड-पागे वारसाहक्क धोरणानुसार केलेल्या असंख्य नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. वारसाहक्कनुसार केलेल्या नियुक्त्या रक्ताचे व जातीचे कोणतेही नाते नसतांना धनदांडग्यांनी लाटल्या असून कामगारांचे खरे वारसदार महापालिका भोवती नोकरीसाठी चपला झिजवीत आहेत. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरEmployeeकर्मचारी