शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

उल्हासनगर महापालिकेने ३ वर्षात ११ जणांना केले बडतर्फ, ४६ कर्मचारी होते बेपत्ता 

By सदानंद नाईक | Updated: February 21, 2024 21:14 IST

उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती.

उल्हासनगर : बोगस कागदपत्र व बेपत्ता झालेल्या तब्बल ११ कर्मचाऱ्यांना गेल्या तीन वर्षात महापालिकेने बडतर्फ केल्याचा प्रकार उघड झाला. तर लाड-पागे वारसाहक्क नियुक्ती धोरणानुसार धनदांडग्यांनी गरीब व गरजू सफाई कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या लाटल्याची खमंग चर्चा महापालिकेत रंगली असून कारवाईची मागणी होत आहे. 

उल्हासनगर महापालिका कारभार नेहमी चर्चेचा विषय राहिला असून महापालिकेत बोगस कागदपत्र सादर करून नोकरी लाटणाऱ्याची चर्चा रंगली होती. अखेर तक्रारीनंतर महापालिकेने चौकशी केली असता, एका अधिकाऱ्यांसह दोन सफाई कामगार दोषी आढळले आहे. महापालिका आयुक्त अजीज शेख व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी त्यांना बडतर्फ केले. त्यापाठोपाठ महापालिका आरोग्य विभागातील तब्बल ४६ सफाई कामगार काही वर्षांपासून गैरहजर असल्याचे उघड झाल्यावर, महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू केली. ४६ पैकी सुरवातीला २६ तर त्यानंतर ९ सफाई कर्मचाऱ्यांचा ठावठिकाणा व शोध लागल्यावर त्यांना महापालिका सेवेत रुजू होण्यास सांगण्यात आले. त्यासाठी त्यांना जेजे रूग्णालय कडून फिटनेस प्रमाणपत्र आणण्याची अट घातली होती. फिटनेस सर्टिफिकेट आणल्यावर, त्यांना महापालिका सेवेत रुजू करून घेतल्याची माहिती उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिली.

 महापालिकेच्या ४६ पैकी ३५ सफाई कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेतले असून त्यांच्या गैरहजरीचा कालावधी सेवाप्रयोजनार्थ लागू होणार नाही. तसेच त्या गैरहजर कालावधीचा सफाई कामगारांना कोणताही शासन लाभ मिळणार नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी स्पष्ट केले. ४६ पैकी इतर राहिलेल्या ११ कर्मचारी व अधिकाऱ्यां पैकी १ अधिकारी व २ सफाई कामगारांचे शालेय कागदपत्र बनावट असल्याचे उघड झाल्यावर, त्यांना महापालिका सेवेतून बडतर्फ केले. तर ८ सफाई कर्मचारी अद्यापही बेपत्ता आहेत. महापालिकेने अश्या बेपत्ता सफाई कामगार व नातेवाईकांचा शोध घेऊन वृत्तपत्रात जाहिरातीही दिल्या होत्या. बेपत्ता झालेले सफाई कर्मचारी गेल्या ९ वर्षापासून जास्त कालावधी पासून गैरहजर असून त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांनी महापालिकेसोबत एकदाही संपर्क केला नसल्याचे उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी माहिती दिली आहे.

लाड-पागे वारसाहक्क नोकऱ्या वादात? -महापालिकेने ३ वर्षांपूर्वी लाड-पागे वारसाहक्क धोरणानुसार केलेल्या असंख्य नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. वारसाहक्कनुसार केलेल्या नियुक्त्या रक्ताचे व जातीचे कोणतेही नाते नसतांना धनदांडग्यांनी लाटल्या असून कामगारांचे खरे वारसदार महापालिका भोवती नोकरीसाठी चपला झिजवीत आहेत. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरEmployeeकर्मचारी