शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:38 IST

महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली.

उल्हासनगर : महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली. महापौर निवडणुकीत बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता होती. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून गेल्या महापौर निवडणुकीत सोबत असलेले रिपाइं-पीआरपीचे ३, राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस व भारिपचे प्रत्येकी एक तसेच साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७ असे एकूण ४० नगरसेवक गृहीत धरून साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे भाजपा-ओमी टीमचे ३०, साई पक्षाचे ५, राष्ट्रवादीचा १ बंडखोर नगरसेवक असे एकूण ३६ नगरसेवक भाजपा आघाडीकडे सुरुवातीला होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे डावपेच यशस्वी झाले नाही.साई पक्षाचा फुटीर गट स्वगृहीशिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपचे दोन व साई फुटीर गटातील सातपैकी दोन नगरसेवक भाजपाला मिळाल्याने शिवसेना व फुटीर साई गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाजपा नगरसेवकांची संख्या ३६ वरून ४०, तर शिवसेनेची ४० वरून ३६ झाली. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक शिवसेना नेते व साई पक्षाच्या नगरसेवकांची याबाबत खरडपट्टी काढली. बहुमत सिद्ध होणार नसल्याने निराश झालेले साई पक्षाच्या फुटीर गटाचे नगरसेवक स्वगृही परतले. जीवन इदनानी यांनी त्यांची समजूत काढून महापौरपदाचा अर्ज मागे घेण्यास लावले. त्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली.राज्यमंत्री चव्हाणांचे डावपेच यशस्वीभाजपा-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी अल्पमतात येऊन महापौर निवडणुकीत पंचम कलानी यांचा पराभव होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत:कडे सूत्रे घेतली. शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस व भारिपच्या दोन नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यात त्यांना यश आले.त्यामुळे भाजपा आघाडीची संख्या ३६ वरून ३८ झाली. तरीही, बहुमतासाठी एका नगरसेवकाची आवश्यकता होती. साई पक्षाच्या फुटीर गटाचे सात नगरसेवक गटनेत्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यापैकी शेरी लुंड आणि कांचन लुंड यांना भाजपाने परस्पर गोव्याला नेले. त्यामुळे शिवसेनेकडील सत्तेचे पारडे भाजपाकडे झुकले.लुंड बंधू शिवसेनेच्या रडारवरगेल्या महापौर निवडणुकीत साई पक्षातील लुंड गटाला महापौरपदाचे आमिष शिवसेनेने दाखवले होते. महापौरपदाचा अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळीच लुंड व चैनानी यांच्या घरी राज्यमंत्री व पालकमंत्री यांनी ठाण मांडले. त्यांच्यात तू-तू मैं-मैं होऊन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अखेर, लुंड यांना स्थायी समिती सभापतीपद देऊन भाजपाने बोळवण केली. यावेळी पुन्हा ऐनवेळेवर साई पक्षाच्या फुटीर गटातून लुंड बंधू बाहेर पडल्याने शिवसेनेची बाजू पलटली. त्यामुळे लुंड बंधू आता शिवसेनेच्या रडारवर आहेत.मराठी वादाची किनारसाई पक्षाच्या फुटीर गटाला पाठिंबा देऊन शिवसेना सत्तेत परतणार होती. शिवसेना व विरोधी पक्षाचे बहुतांश नगरसेवक मराठी, तर भाजपा व साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक सिंधी आहेत. ऐनवेळेवर सिंधी-मराठी राजकारण झाल्याने सत्तेचे पारडे भाजपा-ओमी टीम, साई पक्षाकडे झुकले.साईबाबांच्या दर्शनानंतर सांभाळणार महापौरपदाची सूत्रेमहापौरपदी निवडून आलेल्या पंचम कलानी यांनी कॅम्प नं.-३ येथील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी, माजी महापौर हरदास माखिजा, प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींच्या उपस्थितीत महापौरपदाची सूत्रे घेऊन शहर विकासाची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.राज्यमंत्र्यांचेफोटोसेशन चर्चेतपंचम कलानी महापौरपदी निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या फोटोसेशनमध्ये राज्यमंत्री चव्हाण यांचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर असल्याने चर्चेला उधाण आले.गोपीनाथ मुंडे हरले, भाजपा जिंकलीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची राहीली आहे. त्यामुळे वडिलांच्या चुकांची शिक्षा त्यांच्या पुत्राला कशाला, अशी भूमिका घेण्याची संधी भाजपाला नाही.खुद्द ओमी यांच्यावरही भाजपाचे पदाधिकारी शुक्रमणी यांच्या भाच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा होता. मात्र, भाजपाने त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेताना हे गुन्हे मागे घेतले गेले. उल्हासनगर महापालिका ही आजही गुन्हेगारी व सर्व अनैतिक गोष्टींचा अड्डा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांच्या कब्जात ही महापालिका आहे. म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची लढाई लढण्याकरिता उल्हासनगरात वाव आहे. मात्र, ते दूरच राहिले. आता भाजपाने पप्पू कलानी यांचा वारसा चालवणाऱ्यांना पोटाशी घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे म्हणून ओळखले गेले. उल्हासनगरात भाजपाच्या वतीने जुळवाजुळवी करत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या फडणवीस यांच्या गोतावळ्यात आहेत.चव्हाण यांनी मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला नसेल, पण फडणवीस यांनी तो नक्की पाहिला आहे. त्यामुळे एका महापालिकेतील सत्ता गेली तरी बेहत्तर, पण ज्या संघर्षाच्या पायावर पक्ष उभा राहिला, तो पाय उखडून टाकणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. मात्र, या साºयांनीच मुंडे यांचे चांगले पांग फेडले. मुंडे आज हयात असते, तर त्यांनी कलानी यांच्या विजयावर कोणती प्रतिक्रिया दिली असती? त्यामुळे उल्हासनगरात गोपीनाथ मुंडे मृत्यूपश्चात पराभूत झाले आणि भाजपा जिंकली, असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या