शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:38 IST

महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली.

उल्हासनगर : महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली. महापौर निवडणुकीत बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता होती. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून गेल्या महापौर निवडणुकीत सोबत असलेले रिपाइं-पीआरपीचे ३, राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस व भारिपचे प्रत्येकी एक तसेच साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७ असे एकूण ४० नगरसेवक गृहीत धरून साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे भाजपा-ओमी टीमचे ३०, साई पक्षाचे ५, राष्ट्रवादीचा १ बंडखोर नगरसेवक असे एकूण ३६ नगरसेवक भाजपा आघाडीकडे सुरुवातीला होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे डावपेच यशस्वी झाले नाही.साई पक्षाचा फुटीर गट स्वगृहीशिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपचे दोन व साई फुटीर गटातील सातपैकी दोन नगरसेवक भाजपाला मिळाल्याने शिवसेना व फुटीर साई गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाजपा नगरसेवकांची संख्या ३६ वरून ४०, तर शिवसेनेची ४० वरून ३६ झाली. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक शिवसेना नेते व साई पक्षाच्या नगरसेवकांची याबाबत खरडपट्टी काढली. बहुमत सिद्ध होणार नसल्याने निराश झालेले साई पक्षाच्या फुटीर गटाचे नगरसेवक स्वगृही परतले. जीवन इदनानी यांनी त्यांची समजूत काढून महापौरपदाचा अर्ज मागे घेण्यास लावले. त्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली.राज्यमंत्री चव्हाणांचे डावपेच यशस्वीभाजपा-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी अल्पमतात येऊन महापौर निवडणुकीत पंचम कलानी यांचा पराभव होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत:कडे सूत्रे घेतली. शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस व भारिपच्या दोन नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यात त्यांना यश आले.त्यामुळे भाजपा आघाडीची संख्या ३६ वरून ३८ झाली. तरीही, बहुमतासाठी एका नगरसेवकाची आवश्यकता होती. साई पक्षाच्या फुटीर गटाचे सात नगरसेवक गटनेत्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यापैकी शेरी लुंड आणि कांचन लुंड यांना भाजपाने परस्पर गोव्याला नेले. त्यामुळे शिवसेनेकडील सत्तेचे पारडे भाजपाकडे झुकले.लुंड बंधू शिवसेनेच्या रडारवरगेल्या महापौर निवडणुकीत साई पक्षातील लुंड गटाला महापौरपदाचे आमिष शिवसेनेने दाखवले होते. महापौरपदाचा अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळीच लुंड व चैनानी यांच्या घरी राज्यमंत्री व पालकमंत्री यांनी ठाण मांडले. त्यांच्यात तू-तू मैं-मैं होऊन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अखेर, लुंड यांना स्थायी समिती सभापतीपद देऊन भाजपाने बोळवण केली. यावेळी पुन्हा ऐनवेळेवर साई पक्षाच्या फुटीर गटातून लुंड बंधू बाहेर पडल्याने शिवसेनेची बाजू पलटली. त्यामुळे लुंड बंधू आता शिवसेनेच्या रडारवर आहेत.मराठी वादाची किनारसाई पक्षाच्या फुटीर गटाला पाठिंबा देऊन शिवसेना सत्तेत परतणार होती. शिवसेना व विरोधी पक्षाचे बहुतांश नगरसेवक मराठी, तर भाजपा व साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक सिंधी आहेत. ऐनवेळेवर सिंधी-मराठी राजकारण झाल्याने सत्तेचे पारडे भाजपा-ओमी टीम, साई पक्षाकडे झुकले.साईबाबांच्या दर्शनानंतर सांभाळणार महापौरपदाची सूत्रेमहापौरपदी निवडून आलेल्या पंचम कलानी यांनी कॅम्प नं.-३ येथील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी, माजी महापौर हरदास माखिजा, प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींच्या उपस्थितीत महापौरपदाची सूत्रे घेऊन शहर विकासाची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.राज्यमंत्र्यांचेफोटोसेशन चर्चेतपंचम कलानी महापौरपदी निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या फोटोसेशनमध्ये राज्यमंत्री चव्हाण यांचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर असल्याने चर्चेला उधाण आले.गोपीनाथ मुंडे हरले, भाजपा जिंकलीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची राहीली आहे. त्यामुळे वडिलांच्या चुकांची शिक्षा त्यांच्या पुत्राला कशाला, अशी भूमिका घेण्याची संधी भाजपाला नाही.खुद्द ओमी यांच्यावरही भाजपाचे पदाधिकारी शुक्रमणी यांच्या भाच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा होता. मात्र, भाजपाने त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेताना हे गुन्हे मागे घेतले गेले. उल्हासनगर महापालिका ही आजही गुन्हेगारी व सर्व अनैतिक गोष्टींचा अड्डा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांच्या कब्जात ही महापालिका आहे. म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची लढाई लढण्याकरिता उल्हासनगरात वाव आहे. मात्र, ते दूरच राहिले. आता भाजपाने पप्पू कलानी यांचा वारसा चालवणाऱ्यांना पोटाशी घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे म्हणून ओळखले गेले. उल्हासनगरात भाजपाच्या वतीने जुळवाजुळवी करत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या फडणवीस यांच्या गोतावळ्यात आहेत.चव्हाण यांनी मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला नसेल, पण फडणवीस यांनी तो नक्की पाहिला आहे. त्यामुळे एका महापालिकेतील सत्ता गेली तरी बेहत्तर, पण ज्या संघर्षाच्या पायावर पक्ष उभा राहिला, तो पाय उखडून टाकणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. मात्र, या साºयांनीच मुंडे यांचे चांगले पांग फेडले. मुंडे आज हयात असते, तर त्यांनी कलानी यांच्या विजयावर कोणती प्रतिक्रिया दिली असती? त्यामुळे उल्हासनगरात गोपीनाथ मुंडे मृत्यूपश्चात पराभूत झाले आणि भाजपा जिंकली, असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या