शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

उल्हासनगर महापौरपद निवडणूक : शिवसेनेचे डावपेच ठरले अयशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 04:38 IST

महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली.

उल्हासनगर : महापालिकेत एकूण ७८ नगरसेवक असून भाजपाच्या पूजा भोईर आणि सोनू छापरू यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने सभागृहाची सदस्यसंख्या ७६ वर आली. महापौर निवडणुकीत बहुमतासाठी ३९ नगरसेवकांची आवश्यकता होती. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून गेल्या महापौर निवडणुकीत सोबत असलेले रिपाइं-पीआरपीचे ३, राष्ट्रवादीचे ३, काँग्रेस व भारिपचे प्रत्येकी एक तसेच साई पक्षाच्या फुटीर गटाचे ७ असे एकूण ४० नगरसेवक गृहीत धरून साई पक्षाच्या फुटीर गटाच्या ज्योती भटिजा यांना शिवसेनेने पाठिंबा जाहीर केला. दुसरीकडे भाजपा-ओमी टीमचे ३०, साई पक्षाचे ५, राष्ट्रवादीचा १ बंडखोर नगरसेवक असे एकूण ३६ नगरसेवक भाजपा आघाडीकडे सुरुवातीला होते. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे डावपेच यशस्वी झाले नाही.साई पक्षाचा फुटीर गट स्वगृहीशिवसेनेसोबत असलेले काँग्रेस आणि भारिपचे दोन व साई फुटीर गटातील सातपैकी दोन नगरसेवक भाजपाला मिळाल्याने शिवसेना व फुटीर साई गटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. भाजपा नगरसेवकांची संख्या ३६ वरून ४०, तर शिवसेनेची ४० वरून ३६ झाली. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक शिवसेना नेते व साई पक्षाच्या नगरसेवकांची याबाबत खरडपट्टी काढली. बहुमत सिद्ध होणार नसल्याने निराश झालेले साई पक्षाच्या फुटीर गटाचे नगरसेवक स्वगृही परतले. जीवन इदनानी यांनी त्यांची समजूत काढून महापौरपदाचा अर्ज मागे घेण्यास लावले. त्यामुळे शिवसेना तोंडघशी पडली.राज्यमंत्री चव्हाणांचे डावपेच यशस्वीभाजपा-ओमी टीम व साई पक्षाची आघाडी अल्पमतात येऊन महापौर निवडणुकीत पंचम कलानी यांचा पराभव होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी स्वत:कडे सूत्रे घेतली. शिवसेनेसोबत असलेल्या काँग्रेस व भारिपच्या दोन नगरसेवकांना आपल्या गोटात आणण्यात त्यांना यश आले.त्यामुळे भाजपा आघाडीची संख्या ३६ वरून ३८ झाली. तरीही, बहुमतासाठी एका नगरसेवकाची आवश्यकता होती. साई पक्षाच्या फुटीर गटाचे सात नगरसेवक गटनेत्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात गेले होते. त्यापैकी शेरी लुंड आणि कांचन लुंड यांना भाजपाने परस्पर गोव्याला नेले. त्यामुळे शिवसेनेकडील सत्तेचे पारडे भाजपाकडे झुकले.लुंड बंधू शिवसेनेच्या रडारवरगेल्या महापौर निवडणुकीत साई पक्षातील लुंड गटाला महापौरपदाचे आमिष शिवसेनेने दाखवले होते. महापौरपदाचा अर्ज भरण्याच्या दिवशी सकाळीच लुंड व चैनानी यांच्या घरी राज्यमंत्री व पालकमंत्री यांनी ठाण मांडले. त्यांच्यात तू-तू मैं-मैं होऊन परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. अखेर, लुंड यांना स्थायी समिती सभापतीपद देऊन भाजपाने बोळवण केली. यावेळी पुन्हा ऐनवेळेवर साई पक्षाच्या फुटीर गटातून लुंड बंधू बाहेर पडल्याने शिवसेनेची बाजू पलटली. त्यामुळे लुंड बंधू आता शिवसेनेच्या रडारवर आहेत.मराठी वादाची किनारसाई पक्षाच्या फुटीर गटाला पाठिंबा देऊन शिवसेना सत्तेत परतणार होती. शिवसेना व विरोधी पक्षाचे बहुतांश नगरसेवक मराठी, तर भाजपा व साई पक्षाचे बहुतांश नगरसेवक सिंधी आहेत. ऐनवेळेवर सिंधी-मराठी राजकारण झाल्याने सत्तेचे पारडे भाजपा-ओमी टीम, साई पक्षाकडे झुकले.साईबाबांच्या दर्शनानंतर सांभाळणार महापौरपदाची सूत्रेमहापौरपदी निवडून आलेल्या पंचम कलानी यांनी कॅम्प नं.-३ येथील साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर आमदार ज्योती कलानी, ओमी कलानी, माजी महापौर हरदास माखिजा, प्रकाश माखिजा, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी आदींच्या उपस्थितीत महापौरपदाची सूत्रे घेऊन शहर विकासाची कामे करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.राज्यमंत्र्यांचेफोटोसेशन चर्चेतपंचम कलानी महापौरपदी निवडून आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. यावेळी झालेल्या फोटोसेशनमध्ये राज्यमंत्री चव्हाण यांचा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खांद्यावर असल्याने चर्चेला उधाण आले.गोपीनाथ मुंडे हरले, भाजपा जिंकलीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : पप्पु कलानी यांचे पुत्र ओमी यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची राहीली आहे. त्यामुळे वडिलांच्या चुकांची शिक्षा त्यांच्या पुत्राला कशाला, अशी भूमिका घेण्याची संधी भाजपाला नाही.खुद्द ओमी यांच्यावरही भाजपाचे पदाधिकारी शुक्रमणी यांच्या भाच्यावर हल्ला केल्याचा गुन्हा होता. मात्र, भाजपाने त्यांना आपल्या छत्रछायेखाली घेताना हे गुन्हे मागे घेतले गेले. उल्हासनगर महापालिका ही आजही गुन्हेगारी व सर्व अनैतिक गोष्टींचा अड्डा आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांच्या कब्जात ही महापालिका आहे. म्हणजे, गोपीनाथ मुंडे यांची राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाची लढाई लढण्याकरिता उल्हासनगरात वाव आहे. मात्र, ते दूरच राहिले. आता भाजपाने पप्पू कलानी यांचा वारसा चालवणाऱ्यांना पोटाशी घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंडे गटाचे म्हणून ओळखले गेले. उल्हासनगरात भाजपाच्या वतीने जुळवाजुळवी करत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे सध्या फडणवीस यांच्या गोतावळ्यात आहेत.चव्हाण यांनी मुंडे यांचा संघर्ष जवळून पाहिला नसेल, पण फडणवीस यांनी तो नक्की पाहिला आहे. त्यामुळे एका महापालिकेतील सत्ता गेली तरी बेहत्तर, पण ज्या संघर्षाच्या पायावर पक्ष उभा राहिला, तो पाय उखडून टाकणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी घ्यायला हवी होती. मात्र, या साºयांनीच मुंडे यांचे चांगले पांग फेडले. मुंडे आज हयात असते, तर त्यांनी कलानी यांच्या विजयावर कोणती प्रतिक्रिया दिली असती? त्यामुळे उल्हासनगरात गोपीनाथ मुंडे मृत्यूपश्चात पराभूत झाले आणि भाजपा जिंकली, असेच या निकालाचे वर्णन करावे लागेल.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या