शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
2
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
3
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
4
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
5
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
6
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
7
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
8
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
9
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
10
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
11
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
12
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
13
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
14
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
15
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
16
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
17
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
18
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
19
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
20
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान

उल्हासनगरला दोन दिवस पाणी

By admin | Updated: March 11, 2016 02:35 IST

एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस

उल्हासनगर : एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस, तेही कमी दाबाने पाणी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसली, तरी एकंदर पाणीटंचाई पाहता याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे आणि तीव्र टंचाईच्या भागात टँकर पाठवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल, हातपंपांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या टंचाईमुळे शहराच्या पूर्व भागात गुरुवारी आणि शुक्रवारी, तर पश्चिमेत मंगळवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन चार दिवसांत पुरवून पाणी कसे वितरीत करायचे, याचा आराखडा तयार केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. कॅम्प-५ ला शनिवारी व सोमवारी, कॅम्प-४ ला रविवारी व मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू आहे. अतिटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. १मुंब्रा येथील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापे येथे दिला. मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना किमान दैनंदिन गरजा पूर्ण करण्याएवढा पाणीपुरवठा करावा. पाणीकपात चारऐवजी दोन दिवस करावी. २शुक्र वारी पाणीकपात करण्यात येऊ नये, या मागण्यांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राकाँपाने गुरु वारी एमआयडीसीच्या म्हापे येथील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या वेळी कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी वरील भागातील पाणीकपात चारऐवजी तीन दिवस करण्याचे तसेच दाब वाढविण्याचे आणि शुक्रवारी पाणीकपात रद्द करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.३दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही. तर, पूर्वसूचना न देता एमआयडीसी आणि ठामपाच्या मुख्यालयासमोर ढोलताशे वाजवून कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी दिला. या मोर्चामध्ये किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, येथील बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.