शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

उल्हासनगरला दोन दिवस पाणी

By admin | Updated: March 11, 2016 02:35 IST

एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस

उल्हासनगर : एमआयडीसीची पाणीकपात ६५ टक्क्यांवर गेल्याने दोन दिवस पाणीपुरवठा पूर्ण बंद आणि उरलेल्या चार दिवसांत विभागवार पाणीवाटपामुळे नागरिकांना अवघे दोन दिवस, तेही कमी दाबाने पाणी देण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी तयार केला आहे. या प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नसली, तरी एकंदर पाणीटंचाई पाहता याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नसल्याचे आणि तीव्र टंचाईच्या भागात टँकर पाठवण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी विहिरी, बोअरवेल, हातपंपांवर अवलंबून राहावे लागणार आहे. सध्या टंचाईमुळे शहराच्या पूर्व भागात गुरुवारी आणि शुक्रवारी, तर पश्चिमेत मंगळवारी, शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. त्यामुळे नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन चार दिवसांत पुरवून पाणी कसे वितरीत करायचे, याचा आराखडा तयार केल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. कॅम्प-५ ला शनिवारी व सोमवारी, कॅम्प-४ ला रविवारी व मंगळवारी पाणीपुरवठा करण्याचा विचार सुरू आहे. अतिटंचाईग्रस्त भागात टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. १मुंब्रा येथील पाणीपुरवठ्यामध्ये सुधारणा व्हावी, यासाठी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर शासकीय कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाच्या पदाधिकाऱ्यांनी महापे येथे दिला. मुंब्रा-कौसा भागातील नागरिकांना किमान दैनंदिन गरजा पूर्ण करण्याएवढा पाणीपुरवठा करावा. पाणीकपात चारऐवजी दोन दिवस करावी. २शुक्र वारी पाणीकपात करण्यात येऊ नये, या मागण्यांसाठी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राकाँपाने गुरु वारी एमआयडीसीच्या म्हापे येथील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढला होता. या वेळी कार्यकारी अभियंता प्रकाश चव्हाण यांनी वरील भागातील पाणीकपात चारऐवजी तीन दिवस करण्याचे तसेच दाब वाढविण्याचे आणि शुक्रवारी पाणीकपात रद्द करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले.३दरम्यान, अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून पाणीपुरवठ्यात सुधारणा केली नाही. तर, पूर्वसूचना न देता एमआयडीसी आणि ठामपाच्या मुख्यालयासमोर ढोलताशे वाजवून कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा राकाँपाचे विभागीय अध्यक्ष शमीम खान यांनी दिला. या मोर्चामध्ये किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, येथील बहुतांशी नगरसेवक, नगरसेविका आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.