शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्तचा नाऱ्याची आमदारांकडून पोलखोल

By सदानंद नाईक | Updated: April 19, 2023 18:16 IST

शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला.

उल्हासनगर : शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला. तसेच बैरेक व झोपडपट्टीतील कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे आयलानी म्हणाले.

 उल्हासनगरात महापालिकेच्यां वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला होता. कचरा उचलण्यासाठी गाड्या फिरत आहेत. मात्र बैरेक व झोपडपट्टीच्या गल्लीत या कचरा गाड्या जात नसल्याने, नागरीक कचरा रस्त्यावर अथवा कचरा कुंड्यात टाकत आहेत. त्यामुळे आयुक्तांचा कचरा कुंड्या मुक्त शहराचा नारा फक्त नारा राहिला असून कुंड्या कचऱ्याने ओव्हरफ्लॉ झाल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. बैरेक व झोपडपट्टीतील अरुंद रस्त्यावरून बाईक कचरा गाड्या गेल्या कुठे? असा प्रश्न आमदार आयलानी यांच्यासह भाजपचे जमनुदास पुरस्वानी यांनी केला. 

शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नवीन १६० गाड्यासह मोठ्या गाड्या महापालिकेने खरेदी केल्या आहेत. तसेच कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला ठेकेदाराला देऊनही कचरा उचलला जात नसल्याबाबत आमदार आयलानी यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनिद केणी, एकनाथ पवार यांनी याकडे लक्ष द्यावे. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय टाळावा. असा सल्लाही आमदार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष पुरस्वानी यांनी महापालिकेला दिला.

१ मार्च महिन्या पासून प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई करण्याचे खाजगीकरण केल्याने, महापालिकेवर १० कोटीचा भुर्दंड पडल्याचा आरोप शहरातून होत आहे. एकूणच कचऱ्याच्या ठेक्या बाबत चुपकी साधणारे आमदार आक्रमक झाल्याने, पुढे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.