शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

उल्हासनगर कचरा कुंड्या मुक्तचा नाऱ्याची आमदारांकडून पोलखोल

By सदानंद नाईक | Updated: April 19, 2023 18:16 IST

शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला.

उल्हासनगर : शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याच्या नाऱ्याची पोलखोल आमदार कुमार आयलानी यांनी करून शहरात कचरा कुंड्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा आरोप केला. तसेच बैरेक व झोपडपट्टीतील कचरा उचलला जात नसल्याने, कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याचे आयलानी म्हणाले.

 उल्हासनगरात महापालिकेच्यां वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून शहर कचरा कुंड्या मुक्त करण्याचा निर्धार आयुक्त अजीज शेख यांनी केला होता. कचरा उचलण्यासाठी गाड्या फिरत आहेत. मात्र बैरेक व झोपडपट्टीच्या गल्लीत या कचरा गाड्या जात नसल्याने, नागरीक कचरा रस्त्यावर अथवा कचरा कुंड्यात टाकत आहेत. त्यामुळे आयुक्तांचा कचरा कुंड्या मुक्त शहराचा नारा फक्त नारा राहिला असून कुंड्या कचऱ्याने ओव्हरफ्लॉ झाल्याचा आरोप आमदार आयलानी यांनी केला. बैरेक व झोपडपट्टीतील अरुंद रस्त्यावरून बाईक कचरा गाड्या गेल्या कुठे? असा प्रश्न आमदार आयलानी यांच्यासह भाजपचे जमनुदास पुरस्वानी यांनी केला. 

शहरातील कचरा गोळा करण्यासाठी नवीन १६० गाड्यासह मोठ्या गाड्या महापालिकेने खरेदी केल्या आहेत. तसेच कचरा उचलण्याचा ठेका दुप्पट किंमतीला ठेकेदाराला देऊनही कचरा उचलला जात नसल्याबाबत आमदार आयलानी यांनी आश्चर्य व्यक्त केले. महापालिका आयुक्त अजीज शेख, उपायुक्त डॉ सुभाष जाधव, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनिद केणी, एकनाथ पवार यांनी याकडे लक्ष द्यावे. जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशाचा अपव्यय टाळावा. असा सल्लाही आमदार आयलानी व भाजप शहरजिल्हाध्यक्ष पुरस्वानी यांनी महापालिकेला दिला.

१ मार्च महिन्या पासून प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाई करण्याचे खाजगीकरण केल्याने, महापालिकेवर १० कोटीचा भुर्दंड पडल्याचा आरोप शहरातून होत आहे. एकूणच कचऱ्याच्या ठेक्या बाबत चुपकी साधणारे आमदार आक्रमक झाल्याने, पुढे नागरिकांत आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांच्याशी संपर्क साधला असता झाला नाही.