शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

उल्हासनगरात नावालाच प्लास्टिक पिशवीबंद, प्लास्टिक पिशवी बनविणाऱ्या कारखान्यांना अभय; काँग्रेसचा आरोप

By सदानंद नाईक | Updated: September 8, 2023 14:45 IST

उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्याचा वापर करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

सदानंद नाईक,  उल्हासनगर : शहरात खुलेआम प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्याची विक्री सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके यांनी करून आयुक्तांना लेखी निवेदन दिले. निवेदनात महादेव कंपाऊंड, गजानन कंपाऊंड, मुरलीधर कंपाऊंड व कॅम्प नं-५ परिसरात प्लास्टिक पिशवी बनविणाऱ्या कारखान्याना अभय कोणाचे असा प्रश्नही उपस्थित केला आहे. 

उल्हासनगर महापालिकेने गेल्या आठवड्यात प्लास्टिक पिशव्याचा वापर करणारे दुकानदार व फेरीवाल्यावर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्रत्यक्षात शहरात प्लास्टिक पिशवीची सर्रासपणे विक्री होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके यांनी केला आहे. प्रतिबंधित प्लास्टिक पिशवीमुळे पाणी व वायू प्रदूषण होत असून पावसाळ्यात प्लास्टिक पिशव्यामुळे नाल्या तुंबून पुराचे पाणी अनेकांच्या घरात गेल्याचा आरोप धडके यांनी केला. शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी महापालिकेने प्लास्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखान्यावर कारवाई करून कारखाने शहरातून हद्दपार करण्याची मागणी धडके यांनी केली आहे. 

शहर काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष असलेले किशोर धडके यांनी शहर पश्चिम मधील महादेव कंपाऊंड, गजानन कंपाऊंड, मुरलीधर कंपाऊंडसह कॅम्प नं-५ परिसरात प्लास्टिक पिशव्या बनविणारे कारखाने व मुख्य मार्केट मध्ये प्लास्टिक पिशवी विक्रेते असल्याचा आरोप केला आहे. महापालिका अश्या कारखान्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न निवेदनात धडके यांनी महापालिका आयुक्तांना विचारला आहे. प्लास्टिक पिशवी प्रकरणी एका राजकीय पक्षाचा व्यापारी नेता महत्वाची भूमिका वठवित असल्याचा आरोपही त्यांनी केला. मोठे माशे सोडून महापालिका हातावर पोट असलेल्या लहान व्यापारी व फेरीववाल्यावर कारवाईचा बडगा उगारत असल्याचे धडके यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरPlastic banप्लॅस्टिक बंदी