शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

उल्हासनगरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:15 IST

सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के ...

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त आहे. तर मृत्यू दर सव्वा २ टक्के पेक्षा कमी आहे. कोरोना पोझीटीव्ह रुग्ण संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असल्या तरी चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची टीका होत आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाच्या संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडून राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू होऊन आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर टीका झाली. मात्र आयुक्तांनी सर्वपक्षीय स्थानिक नेते, नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवित एक विशेष आराखडा तयार केला. अखेर आयुक्तांच्या पर्यंत्नाला यश येवून पाॅझिटीव्ह कोरोना रुग्णाला ब्रेक लागला. दरम्यान कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त झाले. तसेच मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी झाला आहे. आयुक्तांच्या कामाचे कौतुक शहरातून होत असताना, विशिष्ठ एका अधिकाऱ्यांना महत्त्व दिल्याची टिका सर्वस्तरातून होत आहे.

 शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ७ हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी ६ हजार ३७८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर आजपर्यंत १५४ जणाचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी फक्त ७० टक्के पेक्षा जास्त रुग्णांना ,सौंम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. तर ८७ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून २७० रुग्णांवर महापालिका क्षैत्राबाहेरील रूग्णालयात उपचार सुरू आहे. एकूणच शहर कोरोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहे. असे बोलले जात आहे. नागरिकांनी काम असेलतर घरा बाहेर पडा. असे आवाहन महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी केले आहे. दरम्यान कोरोना चाचण्या कमी होत असल्याने, रुग्णाची संख्या कमी असल्याची टिका शहरातून होत आहे. 

चौकट 

शेजारील शहरापेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त

 शेजारील ठाणे, कल्याण, मिरा - भाईंदर, अंबरनाथ आदी पालिके पेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पोझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे. याबाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.