शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

उल्हासनगरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्के; मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 14:15 IST

सदानंद नाईक  उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के ...

सदानंद नाईक उल्हासनगर : शहरात कोरोना रुग्णाची संख्या ७११४ पेक्षा जास्त झाली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त आहे. तर मृत्यू दर सव्वा २ टक्के पेक्षा कमी आहे. कोरोना पोझीटीव्ह रुग्ण संख्येत घट होत असल्याने समाधान व्यक्त होत असल्या तरी चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याची टीका होत आहे. 

उल्हासनगरात कोरोना रुग्णाच्या संख्या झपाट्याने कमी झाली असून लॉकडाऊन काळात वाढ झाली होती. त्याचा ताण आरोग्य सुविधेवर पडून राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू होऊन आरोग्य विभागाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. तसेच नवनियुक्त आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कारभारावर टीका झाली. मात्र आयुक्तांनी सर्वपक्षीय स्थानिक नेते, नगरसेवक व महापालिका अधिकारी यांना विश्वासात घेऊन विविध उपाययोजना राबवित एक विशेष आराखडा तयार केला. अखेर आयुक्तांच्या पर्यंत्नाला यश येवून पाॅझिटीव्ह कोरोना रुग्णाला ब्रेक लागला. दरम्यान कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६५ टक्के पेक्षा जास्त झाले. तसेच मृत्यू दर सव्वा दोन टक्के पेक्षा कमी झाला आहे. आयुक्तांच्या कामाचे कौतुक शहरातून होत असताना, विशिष्ठ एका अधिकाऱ्यांना महत्त्व दिल्याची टिका सर्वस्तरातून होत आहे.

 शहरात एकून कोरोना रुग्णाची संख्या ७ हजार ११४ पेक्षा जास्त असून त्यापैकी ६ हजार ३७८ रुग्ण कोरोना मुक्त झाले. तर आजपर्यंत १५४ जणाचा मृत्यू झाला. तसेच ५८२ रुग्णावर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्यापैकी फक्त ७० टक्के पेक्षा जास्त रुग्णांना ,सौंम्य व अतिसौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत. तर ८७ रुग्ण होम आयसोलेशन मध्ये असून २७० रुग्णांवर महापालिका क्षैत्राबाहेरील रूग्णालयात उपचार सुरू आहे. एकूणच शहर कोरोना मुक्तिकडे वाटचाल करीत आहे. असे बोलले जात आहे. नागरिकांनी काम असेलतर घरा बाहेर पडा. असे आवाहन महापौर लीलाबाई अशान, सभागृहनेते राजेंद्र चौधरी यांनी केले आहे. दरम्यान कोरोना चाचण्या कमी होत असल्याने, रुग्णाची संख्या कमी असल्याची टिका शहरातून होत आहे. 

चौकट 

शेजारील शहरापेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त

 शेजारील ठाणे, कल्याण, मिरा - भाईंदर, अंबरनाथ आदी पालिके पेक्षा कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण शहरात जास्त आहे. तसेच पोझिटिव्ह रुग्णाची संख्या कमी झाल्याने आरोग्य विभागावरील ताण कमी झाल्याचे चित्र आहे. याबाबतची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली आहे.