शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात आयुक्तांनी प्रस्ताव रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडले, पण महापौर ठाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:07 IST

मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी व उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची वसुली वाढविण्यासाठी व कोरोना महामारीमुळे आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र अभय योजना लागू करण्याला आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी नकार देत प्रस्ताव खंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला. खंडित करण्यासाठी पाठविलेला प्रस्ताव शासनाने फेटाळल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी सोमवारी दुपारी महापौर कार्यालयात पत्रकारांना दिली. तसेच अभय योजना लागू करण्याचे संकेत दिले. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरावा. असे आवाहन महापौर अशान यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, नगरसेवक मनोज लासी यांनी उपस्थित होते. 

महापालिका मालमत्ता कर विभागाची एकून थकबाकी ६०० कोटींवर पोहचली असून त्यापैकी १०० कोटी हे अस्तित्वात नसलेल्या मालमत्ता, दुबरा मालमत्तेची नोंद असल्याची माहिती विभागाने दिली. तसेच विभागाने १०० कोटीचे वसुली टार्गेट ठेवले होते. मात्र मालमत्तेची वसुली मार्च महिना लागला तरी ५५ कोटी पेक्षा जास्त नाही. विभागाच्या सुमार कामगिरीवर सर्वस्तरातून टीका झाल्यावर मालमत्ता कर विभागाने मोठया थकबाकीधारकांचे मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्या ऐवजी गृहनिर्माण सोसायटीच्या पाणी पम्पिंग रुमला सील करून पाणी पुरवठा बंद करून नागरिकांचा तसेच राजकीय नेत्यांच्या रोष वाढवून घेतला. उपायुक्त राजपूत यांच्या विरोधात राजकीय नेते एकवटले असून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. 

निष्काशीत केलेल्या मालमत्ताना नोटीस 

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता रुंदीकरण करीत असतांना शेकडो दुकाने व घरे बाधित झाली. त्यापैकी अनेक बांधकामे पूर्णतः बाधित झाल्याने, त्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे. मात्र निष्काशीत झालेल्या बांधकामाला नोटिसा काढल्याचा प्रारूप मालमत्ता कर विभागाने काढल्याने, विभागावर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर