शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

उल्हासनगरात आयुक्तांनी प्रस्ताव रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडले, पण महापौर ठाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 19:07 IST

मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : मालमत्ता कर विभागासाठी अभय योजना लागू करण्याचा मंजूर प्रस्ताव खंडित करण्यासाठी आयुक्तांनी राज्य शासनाकडे पाठविला होता. मात्र राज्य शासनाने प्रस्ताव खंडित केला नसल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी देऊन अभय योजनेचे संकेत दिले. तसेच आयुक्त डॉ राजा दयानिधी व उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या भूमिकेवर सत्ताधारी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 उल्हासनगर महापालिका मालमत्ता कर विभागाची वसुली वाढविण्यासाठी व कोरोना महामारीमुळे आर्थिक परिस्थिती ढासळलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी अभय योजना प्रस्तावाला मंजुरी दिली. मात्र अभय योजना लागू करण्याला आयुक्त डॉ राजा दयानिधी यांनी नकार देत प्रस्ताव खंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला. खंडित करण्यासाठी पाठविलेला प्रस्ताव शासनाने फेटाळल्याची माहिती महापौर लिलाबाई अशान यांनी सोमवारी दुपारी महापौर कार्यालयात पत्रकारांना दिली. तसेच अभय योजना लागू करण्याचे संकेत दिले. नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरावा. असे आवाहन महापौर अशान यांनी केले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख व नगरसेवक अरुण अशान, नगरसेवक मनोज लासी यांनी उपस्थित होते. 

महापालिका मालमत्ता कर विभागाची एकून थकबाकी ६०० कोटींवर पोहचली असून त्यापैकी १०० कोटी हे अस्तित्वात नसलेल्या मालमत्ता, दुबरा मालमत्तेची नोंद असल्याची माहिती विभागाने दिली. तसेच विभागाने १०० कोटीचे वसुली टार्गेट ठेवले होते. मात्र मालमत्तेची वसुली मार्च महिना लागला तरी ५५ कोटी पेक्षा जास्त नाही. विभागाच्या सुमार कामगिरीवर सर्वस्तरातून टीका झाल्यावर मालमत्ता कर विभागाने मोठया थकबाकीधारकांचे मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्या ऐवजी गृहनिर्माण सोसायटीच्या पाणी पम्पिंग रुमला सील करून पाणी पुरवठा बंद करून नागरिकांचा तसेच राजकीय नेत्यांच्या रोष वाढवून घेतला. उपायुक्त राजपूत यांच्या विरोधात राजकीय नेते एकवटले असून त्यांच्या हकालपट्टीची मागणी होत आहे. 

निष्काशीत केलेल्या मालमत्ताना नोटीस 

शहरातील कल्याण ते अंबरनाथ रस्ता रुंदीकरण करीत असतांना शेकडो दुकाने व घरे बाधित झाली. त्यापैकी अनेक बांधकामे पूर्णतः बाधित झाल्याने, त्यांना पर्यायी जागा देण्याची मागणी होत आहे. मात्र निष्काशीत झालेल्या बांधकामाला नोटिसा काढल्याचा प्रारूप मालमत्ता कर विभागाने काढल्याने, विभागावर सर्वस्तरातून टीकेची झोळ उठली आहे.

टॅग्स :thaneठाणेulhasnagarउल्हासनगर